एक्स्प्लोर

Aaditya Thackeray: वर्ल्डकपची फायनल मुंबईबाहेर नेणाऱ्यांनी धडा घ्यावा, कालचं सेलिब्रेशन म्हणजे BCCI ला स्ट्राँग मेसेज, आदित्य ठाकरेंनी डिवचलं!

Team India celebration in Mumbai: विश्वचषक जिंकून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचे शुक्रवारी मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी मरिनड्राईव्ह परिसरात अलोट जनसागर लोटला होता. याठिकाणी अक्षरश: मुंगी शिरायला जागा शिल्लक नव्हती.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाने ट्वेन्टी 20 विश्चचषक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर देशभरातील क्रीडा चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कालच टीम इंडियाचे मायदेशात आगमन झाले होते. टीम इंडियातील (Team India) खेळाडुंनी प्रथम दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर भारतीय संघाचे मुंबईत (Mumbai) आगमन झाले तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत आणि जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे.

भारतीय संघाच्या खेळाडुंनी ज्या ओपन डेक बसमधून काढण्यात आली ती बस गुजरातची असल्याने विरोध संतापले होते. यानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शुक्रवारी एक ट्विट करुन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) टोला लगावला आहे. कालचं मुंबईतील सेलिब्रेशन हा बीसीसीआयसाठी एक ठळक संदेश होता. विश्वचषक स्पर्धेची फायनल कधीही मुंबईबाहेर ठेवू नका, हे बीसीसीआयला कळाले असेल, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्यावर्षी भारतात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना (Ind Vs Aus Final) हा नेहमीप्रमाणे कोलकाता किंवा मुंबईला न  खेळवता अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (PM Modi Stadium) खेळवण्यात आला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता.

गुजरातच्या बसला आम्ही पार्किंगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा: रोहित पवार

काल मुंबईत भारतीय संघाच्या खेळाडुंची ज्या ओपन डेक बसमधून मिरवणूक काढण्यात आली होती, ती बस गुजरातमधून आणण्यात आली होती. यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. मुंबईत बेस्टच्या बसेस असताना गुजरातमधून बस का मागवण्यात आली, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. आमदार रोहित पवार यांनी यावरुन राज्य सरकारवर टीका करताना म्हटले होते की, वर्ल्डकप टीमच्या रॅलीसाठी आलेल्या गुजरातच्या बसला आम्ही चांगली पार्कींगची जागा देऊ. पण, बेस्ट बसचा वापर केला पाहिजे. बीसीसीआयने मोठी आणि चांगली बस आणली असेल, पण आमच्या भावना बेस्टसोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे, टीम इंडियाच्या रॅलीत बेस्टची बस वापरल्यास आम्हाला अधिक आनंद होईल, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

वर्ल्डकप जिंकलोय आपण नाचायला पाहिजे! टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मराठीत बोलतो तेव्हा....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Water will Accumulate :  कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरुRaigad Heavy Rain : रायगडमध्ये ढगफुटी, महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप शिवभक्त थोड्यात बचावलेChembur Sindhi Colony चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हालWestern Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Embed widget