एक्स्प्लोर

Raj Thackeray: राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यामागची 3 प्रमुख कारणं

MNS Gudipadwa rally: मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा मोठा निर्णय, लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे.

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाला उत्सुकता लागलेल्या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार उभे राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेने लोकसभेसाठी उमेदवार रिंगणात न उतरवण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहून दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला आहे.

राज ठाकरे यांनी यावेळी आपली भूमिका मांडताना म्हटले की, सध्याची राजकीय परिस्थिती भीषण आहे. मला या सगळ्या युती-आघाड्यांच्या भानगडीत पडायचे नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी बाजूला राहून एखाद्या राजकीय पक्षाला केवळ बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी मनसैनिकांसह महाराष्ट्रातील मतदारांनाही सावध करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे यांनी म्हटले की, कृपा करुन या व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका. महाराष्ट्रात या राजकीय व्यभिचाराला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण असतील, असा गंभीर इशारा राज ठाकरे यांनी दिला.

नरेंद्र मोदींसारख्या खंबीर नेतृत्वाची देशाला गरज

राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना बिनशर्त पाठिंबा दिला. यामागील भूमिका सांगताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मी काही दिवसांपूर्वी माझ्या घरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मी स्वतंत्रपणे देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली. तेव्हा मी फडणवीसांना स्पष्ट सांगितले की, मला ते सगळं नको, मला या सगळ्या वाटाघाटीच्या भानगडीत पाडू नका. मला विधानपरिषद किंवा राज्यसभाही नको. पण या देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे. ती गरज पूर्ण झाली नाही तर राज ठाकरेचे तोंड आहेत, हे फडणवीस यांना स्पष्टपणे सांगितले. केवळ देशाला खंबीर नेतृत्त्वाची गरज आहे म्हणून काहीही अपेक्षा न ठेवता महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आगामी लोकसभा निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी  भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देत आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. 

विधानसभा निवडणूक ताकदीने लढवण्याची रणनीती

राज ठाकरे यांनी यावेळी मनसैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले. आपल्याला यंदाची विधानसभा निवडणूक ताकदीने लढवायची आहे, असा स्पष्ट संदेश राज ठाकरे यांनी दिला. विधानसभा निवडणुकीसाठी आता सहा ते सात महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे आतापासून तयारी सुरुवात केल्यास मनसेला उमेदवारी निवडीपासून ते साधनसामुग्रीची जुळवाजुळव करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल.

लोकसभेच्या रिंगणात उतरण्यासाठी झालेला उशीर

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी काही महिन्यांपूर्वीच तयारी सुरु केली होती. त्या तुलनेत मनसेच्या गोटात शांतता होती. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे दौरे वगळता लोकसभा निवडणूक लढवण्याच्यादृष्टीने मनसेच्या स्थानिक नेत्यांनी कोणतीही विशेष तयारी केली नव्हती. किंबहुना राज ठाकरे यांच्याकडून तशा स्पष्ट सूचनाही मनसैनिकांना देण्यात आल्या नव्हता. तसेच भाजपशी युतीची चर्चा करण्यात राज ठाकरे यांचा बराच वेळ गेला होता. अमित शाह यांच्याशी बोलणी फिस्कटल्यानंतर राज ठाकरे यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवायचे ठरवले असते तरी उमेदवार निवडीपासून ते बाकीची जुळवाजुळव करण्यासाठी मनसेला फार कमी वेळ मिळाला असता. हा सर्व गोष्टी ध्यानात घेऊन राज ठाकरे यांनी लोकसभेऐवजी विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याला पसंती दिल्याचे दिसत आहे. 

आणखी वाचा

मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून मी टीका केली नाही, राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
Sangram Jagtap: 'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
'वरिष्ठ अधिकारी हिंदू समाजाच्या लोकांना लक्ष करताय, त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवताय'; धीरज परदेशी प्रकरणात संग्राम जगतापांचा खळबळजनक आरोप
Sunetra Pawar On Chakan MIDC Pune: चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
चाकण MIDC च्या प्रश्नावरुन शरद पवारांची टीका, देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर; आता सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Manoj Jarange: 'बावनकुळे साहेब तुम्ही मराठ्यांच्या नादाला लागलात म्हणून तुमच्यावर रडकुंडीला येण्याची वेळ; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही' : मनोज जरांगे पाटील
'बावनकुळे साहेब तुम्ही व्यथित झालात, आईचं नाव घेतलं याचं आम्हालाही वाईट वाटलं; एकदा माफ केलं, इथून पुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही; मनोज जरांगे नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget