एक्स्प्लोर

Tanaji Sawant: तानाजी सावंतांची वट कामी आली, पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने चक्रं फिरवली, ऋषिराज सावंतांचं विमान बँकॉकला लँड न होताच माघारी फिरलं

Tanaji Sawant: एखादी हायप्रोफाईल केस असली की पोलीस किती वेगाने काम करु शकतात, याचा प्रत्यय तानाजी सावंत यांच्या मुलाच्या प्रकरणात आला. तानाजी सावंतांच्या मुलाचं विमान हवेतून माघारी

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणात मनी आणि मसल पॉवर अशा दोन्ही गोष्टी पदरी बाळगणारे नेते म्हणून ख्याती असलेले शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत सध्या अचानक चर्चेत आले आहेत. यासाठी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांची बँकॉकवारी कारणीभूत ठरली आहे. ऋषिराज सावंत हे सोमवारी पुणे विमानतळावरुन आपल्या मित्रांसोबत बँकॉकला (bangkok trip) रवाना झाले होते.  दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ऋषिराज सावंत (Rishiraj Sawant) कोणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडले. त्यानंतर चार्टर्ड फ्लाईटने बँकॉकच्या दिशेने रवाना झाले. मात्र, ऋषिराज अचानक घरातून गायब झाल्याने त्यांचे अपहरण झाले असावे, असा संशय तानाजी सावंत यांना आला. यानंतर तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे पोलीस आयुक्तांना यांना फोन लावून सगळा प्रकार सांगितला. तोपर्यंत पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची बातमी समजली होती. 

हायप्रोफाईल केस असल्यामुळे पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये ऋषिराज सावंत यांचा माग काढलाच पण ऋषिराज सावंत यांचे बँकॉकला जाणारे विमान अर्ध्या वाटेतूनच माघारी फिरवण्यात आले. हे विमान अंदमान-निकोबारपर्यंत पोहोचले होते.  एटीसीने चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाला विमान परत पुण्याला घेऊन येण्यास सांगण्यात आले. त्यामुळे हे चार्टर्ड प्लेन आधी चेन्नईला नेण्यात आले तिथून हे विमान रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल झाले.  हा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटात शोभेल असा होता. एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा किती जलद पद्धतीने काम करु शकते आणि वेळ पडल्यास विमान हवेतूनही माघारी फिरवू  शकते, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला. अर्थात या घटनेमुळे मंत्रिमंडळ किंवा प्रशासनात कोणत्या महत्त्वाच्या स्थानी नसतानाही तानाजी सावंत यांची वट किती आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पुणे पोलिसांनी वाऱ्याच्या वेगाने कारवाई केली

एरवी एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती अपहरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास त्याला 24 तासांसाठी थांबण्यास सांगितले जाते. व्यक्ती बेपत्ता होऊन 24 तास उलटल्याशिवाय तक्रार घेतली जात नाही. मात्र, तानाजी सावंत यांनी दुपारी साडेचार वाजता आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली अन् पुणे पोलिसांनी अक्षरश: वाऱ्याच्या वेगाने काम करत ऋषिराज सावंत यांचा माग काढला. ऋषिराज सावंत बँकॉकच्या विमानात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळ प्रशासनाशी बोलून अवघ्या पाच तासांमध्ये चार्टर्ड प्लेन माघारी आणले. पुणे पोलिसांची ही कार्यतत्परता अगदी दृष्ट लागण्यासारखी होती.

आणखी वाचा

मुलाचं अपहरण नाही, तो चार्टर प्लेनने मित्रासोबत बाहेर गेला; तानाजी सावंत यांचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्या

5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
फडणवीस आणि शिंदेमुळेच उपोषणाची वेळ, जरांगे पाटलांचा आरोप, म्हणाले, सिरसाटांचा आडमुठेपणा शिंदेंना नडणार 
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget