Aditi Tatkare:  सध्या सोशल मीडियाचा अनेक नेटकऱ्यांकडून गैर वापर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे मजकूर देखील पोस्ट केले जात आहेत. अशातच आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात समाज माध्यमांचा वापर हा अपरिहार्य असला तरी सामाजिक शांततेला धक्का लागणार नाही आणि सामाजिक सलोखा जपला जाईल याची दक्षता घ्यावी, असे राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) म्हणाल्या आहेत. 


'डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी'तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मिरॅकल इव्हेंट यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या मराठी सोशल मीडिया संमेलनामध्ये 'राजकारणातला सोशल मीडिया' या विषयावर त्या बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत. या कार्यक्रमात आमदार रोहित पवार, देवेंद्र भुयार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम सहभागी झाले होते. 


यावेळी बोलताना तटकरे म्हणाल्या की,  समाजमाध्यमांचा वापर व्यक्तिमत्वाला साजेसा असावा. समाज माध्यमाद्वारे वेगाने संदेश पोहोचत असले तरी प्रत्यक्ष आणि थेट संवादाला पर्याय नाही. यावेळी आमदार देवेंद्र भुयार, रोहित पवार, सिद्धार्थ शिरोळे, योगेश कदम यांनी ते कशा प्रकारे समाज माध्यमांचा वापर करतात तसेच समाज माध्यमांचा वापर करत असताना त्यांना आलेले अनुभव सांगितले आहेत.


महत्त्वाच्या बातम्या: