एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav: शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर लोकांना तत्वज्ञान सांगताना देवेंद्र फडणवीसांना लाज वाटत नाही: भास्कर जाधव

Sindhudurg news: राजकोट किल्ल्यावरील झालेल्या घटनेवरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचे सरकारवर टीकास्त्र. पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रात वेगवेगळ्या नद्यांचं जल आणि माती आणून भूमिपूजन केले. पुतळा उभारला का?

रत्नागिरी: ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्याठिकाणी राज्यकर्त्यांनी  शरमेने माना खाली घालून बसायला पाहिजे. लोकांना तत्वज्ञान सांगणारे देवेंद्र फडणवीस यांनाही या घटनेबद्दल काहीही वाटत नाही, अशी  खरमरीत टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. राजकोट येथील घटनेमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य मातीमोल ठरवले गेले. केवळ राज्यात नव्हे तर देशातील आणि जगातील शिवप्रेमींमध्ये झालेल्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील राज्यकर्ते नालायक आहेत. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेबाबत त्यांना लाजलज्जा, शरम  काहीही नाही, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले. ते बुधवारी रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी भास्कर जाधव यांनी राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेवरुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार आगपाखड केली. 2019 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच घाईघाईने शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभारण्यात आला होता. समुद्रकिनाऱ्यावर जोरदार हवा येणार हे सरकारला माहिती नव्हते का?, असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केला. याशिवाय, विरोधी पक्षाचे लोक घटनास्थळी येत असतील तर त्यांना अडवण्याचे कारण काय? भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर केवळ राजकारणासाठीच केला जातो. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे प्रस्तावित स्मारक हे त्याचे उदाहरण आहे. 2019 सालच्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मुंबईतील अरबी समुद्रात वेगवेगळ्या नद्यांचं जल आणि माती आणून भूमिपूजन केले. तो पुतळा उभारला गेला का? राजकोट किल्ल्यावरील पुतळाही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच उभा केला ना? किल्ले प्रतापगडावरील काँग्रेस सरकारच्या काळात 70 वर्षांपूर्वी बांधलेला अश्वारुढ पुतळा 125 किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्यामध्ये देखील दिमाखात उभा आहे. मात्र, आठ महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा 45 किलोमीटर ताशी वेगाच्या वाऱ्याने पडत असेल तर त्याला काय म्हणावे, असा सवालही भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

या घटनेची जबाबदारी आता कोणी घेणार नाही. कारण, लोकसभेला मतं मिळवण्यासाठी शिवरायांचा पुतळा उभारला. तो पुतळा उभारणारा आपटे नावाच्या माणसाने त्यापूर्वी किती पुतळे बनवले होते, किती साईजचे बनवले होते, जागेचा अभ्यास कोणी केला होता?, कोण इतिहासकार होते? फक्त आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करुन मतं मिळवण्याची रणनीती होती. ही मतं मिळाली पण आता पुतळा कोसळल्याची जबाबदारी कोण घेणार? कोणीच घ्यायला तयार नाही. हे सगळं लपवण्यासाठी राजकोट किल्ल्यावर नंगानाच केला जात आहे, यामुळे भाजप पक्ष आणखी नागवा होत आहे, अशी टीकाही भास्कर जाधव यांनी केली.

आणखी वाचा

राणे साहेब नेहमी आक्रमक असतात, ती त्यांची बोलण्याची पद्धत आहे; कोणाला धमक्या देतील असं वाटत नाही : देवेंद्र फडणवीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
MVA Seat Sharing for Mumbai: मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 सप्टेंबर 2024 : ABP MajhaMVA Seat Sharing : मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत EXCLUSIVE माहिती, 6 जागांवरून रस्सीखेचीची शक्यताChhatrapati Sambhajinagar Accident : 10 वर्षांनी मुल झालं...बारसं करुन घरी जाताना अपघातMajha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषीमंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार
Eknath Khadse on Majha Katta : भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
भाजपमध्ये घरवापसी करण्याचा निर्णय का घेतला होता? एकनाथ खडसेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण; म्हणाले...
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
मोठी बातमी! आयकर विभागाचा दणका, देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे कर्मचारी संकटात, लाखो रुपयांच्या नोटिसा
MVA Seat Sharing for Mumbai: मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
मविआच्या मुंबईतील जागावाटपाबाबत एक्स्लुझिव्ह माहिती, कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार?
Gold Silver Price : सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! एकाच दिवसात चांदी तब्बल 4400 रुपयांनी तर सोनं 1000 रुपयांची महाग 
सोन्या चांदीला पुन्हा झळाळी! एकाच दिवसात चांदी तब्बल 4400 रुपयांनी तर सोनं 1000 रुपयांची महाग 
Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 
Dasara Melava 2024 : दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार? शिंदे गटाने शिवाजी पार्कवरचा दावा सोडला? 
Nashik News: राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
राज्यातील 700 द्राक्ष उत्पादकांना व्यापाऱ्यांनी कोट्यवधींचा चुना लावला, अगतिक शेतकऱ्यांची अजित पवारांकडे धाव
Devendra Fadnavis : वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन
Embed widget