एक्स्प्लोर

काँग्रेस पक्ष म्हणजे वास्तव्यापासून दूर गेलेला पक्ष, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

Radhakrishna Vikhe Patil On Congress: ''काँग्रेस पक्ष म्हणजे वास्तव्यापासून दूर गेलेला पक्ष आहे. देशाच्या धोरणाशी पूर्ण विसंगत धोरणे राबवता- राबवता काँग्रेस पक्षाची काय दयनीय अवस्था झाली आहे: राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil On Congress: ''काँग्रेस पक्ष म्हणजे वास्तव्यापासून दूर गेलेला पक्ष आहे. देशाच्या धोरणाशी पूर्ण विसंगत धोरणे राबवता- राबवता काँग्रेस पक्षाची काय दयनीय अवस्था झाली आहे. हे सर्वजण पाहत आहेत'', असं म्हणत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, ''देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत, त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगती ही प्रचंड वेगाने होत आहे. आपल्या आजूबाजूचे देश श्रीलंका आणि पाकिस्तान यांची काय अवस्था झाली आहे, हे आपण पाहतो. मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला दूरदृष्टी नेतृत्व मिळालं आहे.''

राहुल गांधी यांच्या पदयात्रेबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांची पदयात्रा देशाला नवीन नाही. राजकीय पक्षांनी पदयात्रा काढणं हा त्यांचा अधिकारच आहे.  मात्र राहुल गांधी पदयात्रा कोणत्या मुद्द्यावर काढणार? ज्या पक्षाचं याआधी राज्यात सरकार होतं त्यावेळी इंधनाचे दर कमी करता आले नाही. बेरोजगारी संदर्भामध्ये कुठलंही काम झालं नाही. मग राहुल गांधी कोणत्या मुद्द्यावर पदयात्रा काढणार? असा सवाल करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला.

राज्यातील काँग्रेस नेत्यांवर देखील राधाकृष्ण विखे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, गेल्या सरकारच्या काळात काँग्रेसचे नेते हे सत्तेत गेले. त्यावेळी त्यांच्याकडे पक्षाचा अजेंडा नव्हता. तर त्यांच्याकडे स्वतःचा अजेंडा होता. सरकारमध्ये असताना एवढी अपमानित वागणूक पक्षाला मिळाली, तरी देखील गुळाच्या ढेपेला चिकटलेल्या मुंगळ्यांसारखे हे सत्तेत बसून राहिले. 

वाळू तस्करी संदर्भामध्ये बोलताना राज्यात येत्या एक महिन्याच्या आत एक सर्वंकष धोरण आणण्याचे माझे नियोजन असल्याचे राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. वाळू तस्करीमुळे गावात दहशत निर्माण करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, गुंडगिरी ही वाढत आहे. त्यामुळे लवकरच या संदर्भामध्ये एक धोरण आणण्याचा माझा विचार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच राज्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती कधी होणार याबाबत बोलताना लवकरच या संदर्भामध्ये निर्णय होईल मात्र पालकमंत्री नसल्याने सरकारचा कोणतही काम थांबलेलं नाही, असं विखे पाटील यांनी स्पष्ट केलं. ते पुढे म्हणाल, सध्या राज्यातील विरोधी पक्ष हा सरकार वरती वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत आहे. त्यावर बोलताना सत्ता गेल्याने त्यांना वैफल्य आल्याचं राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.

 

 

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget