एक्स्प्लोर

Prakash Ambedkar & PM Modi: मोदी, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी कुठेत, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? प्रकाश आंबेडकरांचा खरमरीत सवाल

Pahalgam attack: पहलगाम हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांना दहशतवाद्यांनी ठार मारले होते. त्यानंतर हे दहशतवादी पळाले होते. अजूनपर्यंत या दहशतवाद्यांचा पत्ता लागलेला नाही.

Pahalgam attack: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचे आयोजन केले जात असताना आता वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना लक्ष्य केले आहे. प्रकाश आंबडेकर यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामधून प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारला आहे. "मोदी, पहलगाम हल्ल्यासाठी (Pahalgam Terror attack) जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? तब्बल महिनाभर उलटून गेला आहे. तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही, असे प्रकाश आंबेडकरांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.  

एप्रिल महिन्यात 22 तारखेला पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला होता. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी सहा पर्यटक महाराष्ट्रातील होते. दहशतवाद्यांनी फक्त पुरुषांना गोळ्या घातल्या होत्या. बहुतांश पर्यटकांच्या डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यानंतर भारतीय सैन्याने 7 एप्रिलला 'ऑपरेशन सिंदूर' राबवून याचा बदला घेतला होता. यावेळी पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ क्षेपणास्त्रांचा मारा करुन उद्ध्वस्त करण्यात आले होते. यामध्ये नियंत्रण रेषेपासून 100 किलोमीटर आत असणाऱ्या बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या मुख्यालयाचाही समावेश होता. भारतीय सैन्याच्या या एअर स्ट्राईकमध्ये तब्बल 100 दहशतवादी ठार झाले होते. 


Amit Thackeray : भारत-पाक युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयी जल्लोष टाळा: अमित ठाकरे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहले आहे. या पत्रात अमित ठाकरे यांनी म्हटले आहे की, सध्या काही ठिकाणी विजयाचं प्रतीक म्हणून जे उपक्रम राबवले जात आहेत, त्याबाबत समाजात भावनिक संभ्रम आहे. ही परिस्थिती विजयाची नसून ‘ceasefire’ (युद्धविराम) आहे. आणि म्हणूनच, ज्या घटनेत आपल्या शूर जवानांनी प्राणत्याग केला, त्याच काळात साजरे होणारे उत्सव अनेकांच्या मनाला वेदना देणारे आहेत. मा. मोदीजी, आपल्याकडून आजही देशवासियांना हा विश्वास आहे की, आपण सैनिकांच्या योगदानाबाबत संवेदनशील आणि कृतज्ञ आहात. आणि म्हणूनच, या पत्राद्वारे एक मनापासूनची विनंती करतो की, युद्धाचा निकाल अजून स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा, आणि देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा, असे अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा

आपला विजय झालेला नाही, शस्त्रसंधी झालीय, भारतीय जवानांच्या प्राणत्यागानंतरचा जल्लोष मनाला वेदना देणारा; अमित ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणालाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले? शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
Vidhan Parishad Election 2026 Eknath Shinde Shivsena: ठाण्यातून क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी?, रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता; विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र
ठाण्यातून क्षितीज ठाकूर यांना उमेदवारी?, रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता; विधान परिषदेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंचं पुन्हा धक्कातंत्र
Padma Award: महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड
महाराष्ट्रातील 8 मान्यवरांचा दिल्लीत सन्मान; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्याहस्ते पद्म पुरस्कार, हेमा मालिनींच्या हाती धर्मेंद्र यांचा अवॉर्ड

व्हिडीओ

Petrol Diesel Shortage : दरवाढीने धास्ती, टंचाईची भीती; दरवाढीचा चौकार, जनता बेजार Special Report
Onion Farmer Crises : गाळला घाम, मिळेना दाम; कांदा उत्पादक रडकुंडीला Special Report
Alandi Mandir Vastav 283 : पैशाचं 'ते' पोतं, माऊलींच्या गाभाऱ्यातील चोरीची कहाणी
Shivraj Motegaonkar Update : मोटेगावकरचा ईडीकडून क्लास, एवढी मालमत्ती कशी जमवली? Special Report
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींचा तर्क, कुठला संदर्भ? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde and Amit Shah meet: एकनाथ शिंदे कोणलाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले, शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कोणलाही सुगावा लागू न देता गुपचूप अमित शाहांना भेटले, शिक्षणसम्राट सोबत, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Maharashtra Heat Stroke: विदर्भात भयंकर उष्णतेने टोक गाठलं, एकाचवेळी 500 वटवाघुळं मेली, हवामान खात्याचा रेड अलर्ट
Vidhan Parishad Election 2026: एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
शिंदेंची नाराजी दूर करण्यासाठी फडणवीसांकडून दोन नेत्यांवर जबाबदारी; विधान परिषदेच्या निवडणुकीआधी महायुतीमध्ये काय घडतंय?
IPL 2026 RCB vs GT :  बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
बंगळुरु विरुद्ध गुजरात, मॅच कोण जिंकणार? गुजरात आणि बंगळुरुचे 5 खेळाडू ठरवणार निकाल
Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय 'आशिकी गर्ल'?
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Maharashtra Live blog updates: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे माल वाहतूक करणाऱ्या चालकांना फटका
Tamil Nadu AIDMK : अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
अण्णाद्रमुकला मोठा धक्का, तीन बंडखोर आमदारांचे राजीनामे, TVK मध्ये प्रवेश करण्याची शक्यता
IPL 2026 : ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट? आकडेवारी काय सांगते?
ना विराट, ना रजत पाटीदार आरसीबीचा 'हा' हुकमी एक्का नाही चालला तर बंगळुरुवर मोठं संकट?
Embed widget