एक्स्प्लोर

Narendra Modi : दहशतवादाला गाढलं, अशक्य त्या सर्व गोष्टी शक्य करून दाखवल्या, यापुढे माझा प्रत्येक क्षण भारतासाठी; शिवाजी पार्कमधून मोदींची गॅरंटी

Narendra Modi Mumbai Shivaji Park Speech : येत्या काळात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. 

मुंबई : ज्यांना राम मंदिर निर्माण होणं अशक्य वाटत होतं, ज्यांना 370 कलम हटवणं अशक्य वाटत होतं, त्यांच्या सर्व अशक्यतांना मी गाढून टाकलंय आणि नवीन भारत उभा केलाय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. गेल्या दहा वर्षात देशाला पाचव्या क्रमांकावर घेऊन गेलो, येत्या काळात भारत हा जगातील तिसरी अर्थव्यवस्था असणार आहे असा विश्वासही नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. मुंबईतील शिवाजी पार्क येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा आयोजित केली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी बोलत होते. 

काय म्हणाले नरेंद्र मोदी? 

नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणाची सुरूवात जय भवानी, जय शिवाजी अशी केली. ते म्हणाले की, मुंबई हे शहर फक्त स्वप्न दाखवत नाही तर स्वप्न जगतं. काहीतरी करून दाखवणाऱ्यांना मुंबईने कधीही निराश नाही केलं. या शहरासाठीच्या 2047 सालचे ड्रीम घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. आपल्याला एक संकल्प करून विकसित भारत घडवायचा आहे. त्यामध्ये मुंबईचं योगदान मोठं असेल. 

भारतासोबत स्वतंत्र झालेले अनेक देश हे भारताच्या पुढे गेलेत. कमी भारतीयांमध्ये नव्हती तर इथल्या सरकारमध्ये होती. मी असे काही पंतप्रधान पाहिलेत की, त्यांनी लाल किल्ल्यावरून भारतीयांना आळशी म्हटलं आहे. ते देशाला कधीही पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत. स्वातंत्र्यानंतर गांधींजींनी सांगितलं होतं की काँग्रेस बरखास्त करा. तसं असतं तर देश किमान पाच दशकं पुढे असता. या सत्ताधाऱ्यांनी देशाची पाच दशकं ही वाया घालवली. 

सन 2014 मध्ये ज्यावेळी काँग्रेस गेली, त्यावेळी भाजप सत्तेत आलं त्यावेळी देश जगातला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली. येत्या काही काळात देश जगातली सर्वात मोठी तिसरी आर्थिक ताकद असणार आहे ही मोदींची गॅरंटी आहे.  

मी तुमच्या मुलांना एक विकसित भारत देऊन जाणार आहे. त्यासाठी मी 24 तास देशासाठी काम करणार आहे. निराशेच्या गर्तेमध्ये असलेल्या लोकांमध्ये आशा निर्माण करणे हे काही चणे खाण्याचं काम नाही. 

राम मंदिर बनणार नाही, ते अशक्य आहे असं लोकांना वाटायचं. गेल्या 500 वर्षात जे काही झालं नाही ते मोदीने करून दाखवलं. 

काश्मीरमधून 370 कलम हटवणं हे अनेकांना अशक्य वाटत होतं, आज त्या अशक्यतेला मी गाढून टाकलंय. 

काँग्रेसने गेल्या 60 वर्षांमध्ये महिलांना आरक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं, पण मी ते करून दाखवलं. 

ज्यांना स्वाभिमानानं जगायचं असेल त्यांनी घराबाहेर पडावं आणि मतदान करावं असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. मतदानाला बाहेर पडताना आधी झालेले बाँब धमाका आठवा आणि मतदान करा. मोदीला बळकट करण्यासाठी मतदान करा असं आवाहन नरेंद्र मोदींनी केलं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
Embed widget