एक्स्प्लोर

Raju Shetti: आमची तिसरी नाही पहिली आघाडी! जरांगेंशी संभाजी राजेंची चर्चा सुरू; राज्यात पुन्हा एक आघाडी होण्यावर राजू शेट्टींनी सांगितलं

Raju Shetti: सध्या राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये राजकारण चालू की टोळी युद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे. जनता या दोघांच्याही कारभाराला वैतागल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.

पुणे: राज्यातील चळवळीमधील सर्व पक्षांना एकत्रित करून एक महाआघाडी उभी करायची तयारी सुरू झालेली असून 19 तारखेला याची पहिली बैठक होणार आहे. याबाबतची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. आज पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला भेट देण्यासाठी आले असता राजू शेट्टींनी एबीपी माझाशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. सध्या राज्यात महायुती व महाविकास आघाडीमध्ये राजकारण चालू की टोळी युद्ध असा प्रश्न जनतेला पडला आहे. जनता या दोघांच्याही कारभाराला वैतागल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. आमची आघाडी तिसरी नाहीतर पहिली आघाडी असल्याचे सांगताना मनोज जरांगे ही यात सामील होतील असा विश्वास राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी व्यक्त केला आहे. 

निवडणुका जवळ येतील तशा प्रकारच्या राजकीय जोडण्या होत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी सरकार येऊन गेले.  दोन्ही सरकारांचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेला बघितलेला आहे. एकमेकांवर गलिच्छ पातळीवर आरोप प्रत्यारोप करणे ,पक्ष फोडणे ,बघून घेण्याची भाषा करणे याच्या व्यतिरिक्त गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये काही झालेला नाही असा टोला त्यांनी यावेळी लगावला. हे राजकारण आहे की, टोळी युद्ध आहे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सांगितले आहे. 

अशा परिस्थितीमध्ये चळवळीचे पार्श्वभूमी असणारे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये जे छोटे मोठे पक्ष आणि सामाजिक संघटना चळवळी करत असतात, अशा सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एकत्रित करून आम्ही महाआघाडी उभारण्याचा प्रयत्न करतोय असे शेट्टी यांनी यावेळी सांगितले. आमची तिसरी आघाडी नाही तर आमची पहिली आघाडी आहे ते यावेळी म्हणाले. सगळ्या मतदार संघांमध्ये सक्षम आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देवून आम्ही पर्याय देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

ज्यांच्याकडे मतदारसंघाचा आणि राज्याचा विकास करण्याचं व्हिजन आहे अशा चेहऱ्यांना आमची सगळी चळवळीची पुण्याई पाठीशी लावून आम्ही निवडणुकीला उभा  करणार आहोत. ना आम्ही जातीच्या धर्माच्या किंवा भावनिक मुद्द्याच्या निवडणुका लढवणार नाही तर प्रश्नावर धोरणावर आम्ही निवडणुका लढवणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. या महाआघाडीत  शेतकरी चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष काम करणारे माजी आमदार वामनराव चटप आणि त्यांची शेतकरी संघटना, माजी आमदार शंकरराव धोंडगे व त्यांची महाराष्ट्र विकास समिती, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना,आमदार बच्चु कडू, संभाजी राजे असे सगळे आम्ही एकत्रित येण्यासंदर्भात चर्चा चालू असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

त्या संदर्भातली एक बैठक पुण्यामध्ये 19 तारखेला होणार असून मराठा आरक्षणासाठी चळवळ करणारे मनोज जरांगे पाटील हेही आमच्यावर यावे त्यासाठी आमचे प्रयत्न चालू असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती युवराज संभाजी राजे हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करत असून एक व्यापक आघाडी महाराष्ट्रामध्ये उभी राहिलेली तुम्हाला दिसेल असे शेट्टी यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या गलिच्छ आणि घाणेरड्या राजकारणाला कंटाळलेले असून त्याचं उत्तर आता निवडणुकीमध्ये जनता देणार याची आम्हाला खात्री असल्याचा विश्वास राजू शेट्टी यांनी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News : शेजाऱ्यांशी वादाच्या रागातून 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
रागाच्या भरात 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं,तिच्याच घरी सुटकेसमध्ये मृतदेह लपवला, पोलिसांकडून आरोपीला बेड्या
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Embed widget