Narendra Modi, Interview : "मी नेहमी सांगतो की, हे नामदार आहेत. आम्ही कामदार आहोत. त्यामुळे आमच्या नशिबात शिव्या-शाप आणि अपमान लिहिलेला आहे. हे राजकारणात आल्यानंतर म्हणतोय असं नाही. मी लहानपणापासून अशा प्रकारचे आयुष्य जगत आलो आहे. सामान्य आयुष्यातही मी अनेक अपमान सहन केले आहेत. त्यामुळे आम्ही सहन करु, असं मानतो. मी कप-प्लेट धुवायचो. माझ्या छोट्याशा दुकानात चहा पिणाराही मला खवळायचा. गार चहा दिला तर कानाखाली मारायचा", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 


नरेंद्र मोदी म्हणाले, बिहारमध्ये नोकरीच्या बदल्यात जमिन हे कांड झाले. जमिन कोणाची होती, हे माहिती आहे. आता जमिन कोणची आहे, हे देखील माहिती आहे. त्याच्याच कुटुंबातील व्यक्तीला नोकरी मिळाली आहे. हे देखील माहिती आहे. मी शोधायला सांगितले की, त्यांना जमिन परत दिली जाऊ शकते का? 


 ईडीने 2200 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत


पुढे बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, देश विचारायचा माशांना पकडता, पण मगरीला हात घालत नाहीत. आता ईडी किंवा सीबीआय हे काम करत आहे, तर त्यांचा सार्वजनिक सन्मान झाला पाहिजे. कॅमेरासमोर नोटांचे डोंगर दिसतात. याला तुम्ही नाकारु कसे शकता. 2004 ते 2014 पर्यंत 34 लाख रुपये ईडीने जप्त केले होते. 2014 ते 2024 ईडीने 2200 कोटी रुपये ईडीने जप्त केले आहेत. 70 टेम्पो लागतील उचलून घ्यायला. आता हे सर्व देश पाहात आहे. आता तुम्ही शिव्या देऊ शकत नाही. चुकीचे झालंय असं म्हणू शकत नाहीत. आता मोठे मोठे लोक जेलमध्ये आहेत. कोण असेल कोण नसेल हे ना मला माहिती आहे, ना माझ्या यंत्रणेला माहिती आहे. ते फक्त कागदांना आणि फाईलींना माहिती आहे. ज्याने पाप केले आहे, त्यांना माहिती आहे आपला नंबर लागणार आहे.  


2002 मध्ये माझी ब्युरोक्रसी संपूर्णपणे माझ्याविरोधात होती


2002 मध्ये माझी ब्युरोक्रसी संपूर्णपणे माझ्याविरोधात होती. त्यांना वाटतच नव्हते मी विजयी होऊ शकतो. आचारसंहिता सुरु झाली की, या सिस्टिमच्या व्हॅकेशन सुरु होतात. मी यावेळी पाहातोय. माझी संपूर्ण काम करत आहे. मी सर्वांना मोठा टास्क दिलेला आहे. ते असं काम करतात जणू आजच सरकार बनले असावे. याचा अर्थ असा की, माझी टीम संपू्र्ण उत्साहाने काम करत आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 





इतर महत्वाच्या बातम्या 


Narendra Modi: निकालादिवशी माझ्या खोलीत कोणालाही एंट्री नसते; मोदींनी सांगितला 2002 मधील निवडणुकीचा किस्सा