एक्स्प्लोर

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: राजकारण करुन प्रो गोविंदा स्पर्धेतून वगळल्याचा जय जवानचा आरोप; आता पुर्वेश सरनाईक म्हणाले...

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: प्रो-गोविंदा स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने नाराजी व्यक्त केली आहे.

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025 मुंबई: सरनाईकांकडून (Pratap Sarnaik) दरवर्षी प्रो गोविंदा ही स्पर्धा खेळवली जाते. यंदा 7, 8 आणि 9 ऑगस्ट रोजी प्रो गोविंदा स्पर्धा (Pro Govinda 2025) रंगणार आहे. मात्र या स्पर्धेआधीच प्रो गोविंदाची चर्चा रंगली आहे. प्रो-गोविंदा स्पर्धेत संधी न दिल्यामुळे जय जवान गोविंदा पथकाने (Jai Jawan Govinda Pathak) नाराजी व्यक्त केली आहे. आयोजकांनी राजकारण करुन आम्हाला बाहेर काढल्याचा आरोपही जय जवान पथकानं केला आहे. याच जय जवान गोविंदा पथकाने मुंबईत झालेल्या ठाकरेंच्या विजयी मेळाव्यात थर लावून सलामी दिली होती. त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सलामी देणं नडलं की काय, अशी चर्चा रंगली आहे. मात्र जय जवानच्या या आरोपावर आता प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी प्रत्युत्तर दिलंय.

प्रो गोविंदा सीझन 3 च्या नोंदणी प्रक्रियेत राज्यभरातून एकूण 127 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला. खेळाच्या नियमानुसार जे सर्वात पहिले ३२ संघ नोंदणी करतील त्यांना या स्पर्धेत स्थान दिले जाईल, असे स्पष्ट केले होते. तरी देखील राजकारण करून आयोजकांनी आम्हाला बाद केले अशी बदनामी जय जवान गोविंदा पथक करत आहे. या त्यांच्या आरोपात काहीच तथ्य नाही. निवड प्रक्रिया ही केवळ नियमांनुसार केली जाते, अशी स्पष्ट भूमिका प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी मांडली. 

सर्व प्रथम नोंदणी केलेल्या 32 संघांना सीझन 3 मध्ये खेळण्याची संधी-

प्रो गोविंदा सीझन 3 साठी नोंदणी केलेले संघ हे दापोली, रत्नागिरी, सांगली, वसई, विरार,पालघर, मुंबई, ठाणे असे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत. सर्व प्रथम नोंदणी केलेल्या 32 संघांना सीझन 3 मध्ये खेळण्याची संधी देण्यात आली. जय जवान गोविंदा पथक जो आमच्यावर आरोप करत आहेत, त्यांचा नोंदणी प्रक्रियेतील क्रमांक 41 स्थानावर होता. मागील वर्षी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बालवीर गोविंदा पथक 37 व्या क्रमांकावर होता असे अनेक गोविंदा पथकं आहेत जी यापूर्वी प्रो गोविंदामध्ये सहभागी झाली होती. पण ती यावेळी पहिल्या 32 संघांत नोंदणी न करू शकल्यामुळे यंदाच्या सीझन 3 मध्ये सहभागी होऊ शकली नाहीत, अशी माहितीही पुर्वेश सरनाईकांनी दिली.

सर्वांना समान संधी देण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात-

जय जवान पथकाने 5 जुलै 2025 रोजी एका कार्यक्रमात मानवी मनोरे सादर केल्यामुळे स्पर्धेतून वगळण्यात आले, असा दावा केला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाली होती आणि 28 जून रोजी 16 संघांची पहिली यादीही जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे, हा आरोप पूर्णपणे खोटा व दिशाभूल करणारा आहे, असे पुर्वेश सरनाईक यांना स्पष्ट केले. राज्यभरातून अनेक लहान-मोठ्या गोविंदा पथकांना प्रो गोविंदा सीझन 3 मध्ये आपले कौशल्य दाखवण्याची सुवर्ण संधी मिळत आहे. आम्ही कोणत्याही पथकाच्या भावना दुखावू इच्छित नाही, परंतु सर्वांना समान संधी देण्यासाठी काही नियम काटेकोरपणे पाळावे लागतात, असंही पुर्वेश सरनाईक म्हणाले.

संबंधित बातमी:

Jai Jawan Govinda Pathak Pro Govinda 2025: ठाकरे बंधूंना सलामी देणं जय जवानला नडलं?; जय जवान प्रो गोविंदातून बाहेर; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Special Report Srinagar Blast : श्रीनगरमध्ये स्फोटामुळे खळबळ,अपघाती स्फोट टाळता आला नसता?
Special Report Army Mono Rail चीनच्या सीमेवर,भारताची मोनो;16 हजार फुटांवर लष्करांच्या मदतीला मोनोरेल
Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी
Embed widget