ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करण्याची सरकारची मागणी
Obc Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करावे, अशी सरकराची मागणी आहे.

Obc Reservation: ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. 92 नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करावे, अशी सरकराची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला हिरवा कंदील दाखवला. पण हा निकाल देताना 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीत हे आरक्षण लागू होणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होत. कोर्टाचं म्हणणं होत की, ज्यावेळी आम्ही हा निकाल दिला, त्यावेळी ज्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तिथे आरक्षण लागू करता येणार नाही. पण यावरूनच राज्य सरकारने पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.
सुप्रीम कोर्टात निकालात पुनर्विलोकनाची याचिका राज्य सरकारकडून दाखल करण्यात आली आहे. सरकारचं म्हणणं आहे की, ज्यावेळी कोर्टाने निकाल दिला, त्यावेळी कुठलं ही नोटिफिकेशन या निवडणुकीचं निघालं नव्हतं, हा सरकारचा दावा. त्यामुळे कोर्टाने याचा विचार करावा. राज्य सरकराने जो निर्णय घेतला आहे त्यानुसार, या 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू होणार आहे. मग यात ओबीसी आरक्षण लागू होणार नसेल तर हा एक प्रकारे अन्याय आणि विरोधाभास ठरेल. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. उद्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. जर सरकराची ही मागणी लागू झाली तर शिंदे फडणवीस सरकारचा मोठा विजय ठरेल.
काय आहे नेमकं प्रकरण?
राज्य निवडणूक आयोगाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती.
पुणे (Pune), सातारा, सांगली(Sangli), सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे (Dhule), नंदुरबार, जळगाव (jalgaon), अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड (Beed), उस्मानाबाद, लातूर (Latur), अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.
संबंधित बातमी:























