एक्स्प्लोर

एकतर भैय्याजी जोशी चिल्लर म्हणा, नाहीतर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अनाजीपंत म्हणत उद्धव ठाकरे कडाडले

भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचं की काय ते शिंपडून गेले आहेत. आता, हिंदुस्तान पाकिस्तान विषय काढलेला नाही.

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी (Marathi) भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ माजला आहे. मुंबईत विविध भाषा आणि प्रांताचे लोक राहतात. त्यामुळे, मुंबईत अनेक भाषा आहेत, मुंबईची एक भाषा नाही. घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मुंबईत राहणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केलं होतं. त्यानंतर, मराठी भाषेचा अवमान केल्यावरुन अधिवेशन सभागृहात देखील हा मुद्दा उपस्थित झाला. महाविकास आघाडीच्या विशेषत: ठाकरेंच्या शिवसेना आमदारांनी या मुद्द्यावरुन सरकारला प्रश्न केले. त्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरुन तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर आहे हे मुख्यमंत्र्‍यांनी जाहीर करावं किंवा भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. 

भैय्याजी जोशी यांनी काल विधान केलं आणि गोमूत्र म्हणायचं की काय ते शिंपडून गेले आहेत. आता, हिंदुस्तान पाकिस्तान विषय काढलेला नाही. मग बटेंगे तो कटेंगे आणि तिकडे मराठा-मराठेत्तर वाटणी करायची आणि राज्य करायचे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठीसंदर्भातील वक्तव्यावरुन तीव्र संताप व्यक्त केला. अनाजीपंतांनी तामिळनाडू आणि अहमदाबादमध्ये हे बोलून दाखवावं आणि परत येऊन दाखवावं, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले. मराठी माणूस मतं देणारच आहे, जातंय कुठे असा प्रश्न त्यांना पडतोय का. भाषावार प्रांतरचना झाली आता गल्लीवार प्रांत रचना करत आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला. शिवरायांबद्दल अवमानग्रस्त बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस असल्याचं म्हटलं. मग, आता भैय्याची जोशी चिल्लर माणूस आहे असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करुन दाखवावं नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीच उद्धव ठाकरेंनी केली आहे. मराठी भाषा आली नाही तरी चालेल म्हणणाऱ्यावर कारवाई करुन दाखवावी. नाहीतर मान्य करावं भाजप आणि संघाचा हा छुपा अजेंडा आहे, अशा शब्दात ठाकरे कडाडल्याचं पाहायला मिळालं. 

लोकमान्य टिळकांचा दिला संदर्भ

राज्य सरकारला विचारतोय तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण लोकमान्य टिळक यांनी त्यावेळी ब्रिटीश सरकारला प्रश्न विचारला होता, अग्रलेख लिहिला होता. तो मराठीतच लिहिला होता, सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, असं त्यांनी मराठीतच म्हटलं होतं याची आठवण देखील उद्धव ठाकरेंनी करुन दिली.  

काय म्हणाले होते भैय्याजी जोशी

मुंबईच्या विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भैय्याजी जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मुंबईच्या विविधतेतील एकतेवर भाष्य केलं. मुंबईत विविध राज्य, प्रांत आणि भाषा बोलणारे नागरिक राहतात. मुंबईत अनेक भाषा आहेत आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असे वक्तव्य भैय्याजी जोशी यांनी केले होते. त्यानंतर, आता त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेष म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सभागृहात या वक्तव्यावरुन गदारोळ माजल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंनी देखील याच मुद्द्यावरुन फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. 

हेही वाचा

Video: शिक्षणमंत्र्यांवर भडकले नाथाभाऊ; शाळा अन् संस्थाचालकांच्या प्रश्नावरुन तारांकीत प्रश्न, म्हणाले, इमारती विकून टाका

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; पुण्यातील खळबळजनक घटना
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...; तुकाराम तुकाराम मुंढें स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंढेंचा घणाघात
Dhurandhar BO Day 10: 'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?
'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?

व्हिडीओ

Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; पुण्यातील खळबळजनक घटना
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...; तुकाराम तुकाराम मुंढें स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंढेंचा घणाघात
Dhurandhar BO Day 10: 'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?
'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
Embed widget