एक्स्प्लोर

Eknath Shinde and Devendra Fadnavis : राज्यातील पाकिस्तानच्या नागरिकांवरून शिंदे आणि फडणवीसांचं परस्परविरोधी वक्तव्य; आता खुद्द गृहमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...

Eknath Shinde and Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत, असे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले होते. आता यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis : पाकिस्तानी नागरिकांवरून राज्यातील महायुती सरकारमध्ये समन्वयाचा आभाव दिसून आला. केंद्र सरकारने भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 27 एप्रिलपर्यंत देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. महाराष्ट्रातही अनेक पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या व्हिसावर आले आहेत. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले होते की, महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया देत, राज्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकही बेपत्ता नाही, असे स्पष्ट केले होते. आता दोन्ही नेत्यांच्या परस्परविरोधी वक्तव्यांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.  

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आता अचूक आकडा लवकरच पोलीस विभाग घोषित करेल. पण, जे पाकिस्तानी नागरिक भारतात बाहेर गेले पाहिजे, अशा सगळ्या नागरिकांची ओळख पटली आहे. त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांना बाहेर जायला सांगण्यात आले आहे. पण केंद्र सरकारने दिलेल्या आदेशानुसार कोणीही नागरिक असा नाही की, जो आम्हाला सापडला नाही, असे त्यांनी म्हटले.  

सगळ्यांची ओळख पटली 

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानी नागरिकांच्या आकडेवारीत मोठा संभ्रम निर्माण झाला. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीच्या आधारावर मंत्री बोलत असतात. त्यामुळेच मी आपल्यासमोर गृहमंत्री म्हणून माहिती दिली आहे. मी पुन्हा आपल्याला सांगतो की, जे पाकिस्तानी नागरिक भारताबाहेर जायला पाहिजे, अशा सगळ्यांची ओळख पटलेली आहे. 

पोलीस आकडेवारी लवकरच जाहीर करतील

महाराष्ट्रातील 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना माझं सांगणं आहे की, तुम्ही जिथे कुठे असाल तिथून चालते व्हा. पाकिस्तानी नागरिकांनी आमचा देश सोडून निघून जावं. अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवर ठोकतील, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काही वेळा अनेक प्रकारच्या माहितीच्या आधारे वक्तव्य केले जातात. पण मी सांगू इच्छितो की, जे पाकिस्तानी नागरिक केंद्र सरकारच्या आदेशानुसार देश सोडून जायला हवे, अशा सगळ्यांची ओळख पटलेली आहे. त्यांना भारताबाहेर पाठवण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. याबाबत आकडेवारी लवकरच पोलीस जाहीर करतील. संभ्रम यामुळे निर्माण होतो की, पाकिस्तानी नागरिक म्हणजे अनेक सिंधी लोक लाँग टर्म व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत. त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केले आहेत. त्यांनी भारत सोडण्याचं काहीच कारण नाही. केवळ मर्यादित कालावधीचा व्हिसा घेऊन भारतात आलेल्या नागरिकांना 48 तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. याबाबतची राज्य सरकारने आपली जबाबदारी पार पाडली आहे. उर्वरित काम काही वेळात पूर्ण होईल. अनेक पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात होते, त्यांची ओळख पटवून त्यांना माघारी पाठवलं आहे, असे त्यांनी सांगितले. 

वडेट्टीवारांच्या वक्तव्याचा फडणवीसांकडून समाचार 

अतिरेक्यांना धर्म विचारण्यासाठी वेळ नाही, असे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केले होते. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचे वक्तव्य करून जे मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवले. नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितले. तिथे वडेट्टीवार होते का? हे इथे बसून अशा प्रकारचे वक्तव्य करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळताय, हे अतिशय वाईट आहे, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

India Vs Pakistan War: पाकिस्तानच्या मदतीला पहिला देश मैदानात, दारुगोळ्याने भरलेली विमानं अन् फायटर जेट्स मदतीला धाडली

महत्त्वाच्या बातम्या

सोलापूर विधानपरिषद निवडणूक! 616 पैकी मला 550 मतं मिळतील, राजेंद्र राऊतांनी व्यक्त केला विश्वास 
सोलापूर विधानपरिषद निवडणूक! 616 पैकी मला 550 मतं मिळतील, राजेंद्र राऊतांनी व्यक्त केला विश्वास 
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2026 | शुक्रवार
Narayan Rane : बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
बाळ मानेंना सिरीयस घेऊ नका, विश्वास टाकायची गरज नाही; नारायण राणेंकडून घरचा आहेर, काय काय म्हणाले?
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
न्यू चंदीगड कसोटीत गिल विरुद्ध अफगाणिस्तान! संपूर्ण अफगाण संघापेक्षा जास्त धावा अन् एकट्या सिराजच्या 10 पटींहून अधिक विकेट
Trinamool Congress: पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
पक्षात दोन तुकडे झाल्यानंतरही तृणमल काँग्रेसच्या ममता बॅनर्जींचा तगडा निर्णय; फुटीर आमदारांना थेट संदेश दिल्याची चर्चा
Mumbai Mangroves : मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
मुंबईकरांनो सावधान! पुरापासून वाचवणारी 'कांदळवने' धोक्यात; एकाच प्रकल्पासाठी 45,000 झाडांवर चालणार कुऱ्हाड
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
कर्नाटकात अवघ्या 48 तासांमध्येच भूकंप, सीएम डीकेंच्या निष्ठावंत शिलेदाराचाच मंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा; 'संकटमोचक' डीके म्हणाले...
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
शेअर बाजारात 99 टक्के बोगस कमाई, 15 लाख कोटींचा ढपला अन् याच राजेश एक्सपोर्ट्समध्ये LICची 10.8 टक्के हिस्सेदारी! देशातील महाघोटाळा असल्याची चर्चा
Share Market : सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला सर्वाधिक फटका
सेन्सेक्स निफ्टी मध्ये आठवड्यात घसरण,आदित्य इन्फोटेक सर्वाधिक फायद्यात, नॅटको फार्माला फटका
Embed widget