एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : पराभवाची जबाबदारी स्वीकारली ते उपमुख्यमंत्रीपदावरून मुक्त करण्याची विनंती; देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेमधील मोठे मुद्दे

Devendra Fadanvis PC Major Points : संविधान बदलाचा विरोधकांनी जो नॅरेटिव्ह तयार केला तो आम्हाला बदलता आला नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात भाजप आणि महायुतीला मिळालेल्या कमी जागांची जबाबदारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली आहे. भाजपच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, यापुढे आता पक्ष संघटनेच्या कामाकडे लक्ष द्यायचं आहे, त्यामुळे आपल्याला उपमुख्यमंत्रिपदावरून मुक्त करावं (Devendra Fadanvis Ready To Resignation) अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय नेतृत्वाला केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेनंतर आता भाजपसह महायुतीमध्येही खळबळ उडाल्याचं दिसतंय. 

लोकसभेच्या निकालानंतर आता राज्यात राजकीय भूकंपाला सुरूवात झाल्याचं दिसतंय. त्याची सुरूवात भाजपमधून झाली आहे. महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर काही ठिकाणी समन्वय नसल्याचा फटका आपल्याला बसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. तसेच विरोधकांनी संविधान बदलण्याचं खोटं नॅरेटिव्ह तयार केलं आणि त्याचा फटका महायुतीला बसल्याचा दावा त्यांनी केला. 

सरकारमधून मोकळं करण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे केली आहे. पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पक्षासाठी काम करण्यासाठी सरकारमधून मोकळं होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त दाखवली. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे."

महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. अपेक्षेपेक्षा खूप कमी जागा मिळाल्या. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होतीच, त्यासोबतच नरेटिव्हसोबत करावी लागली. त्यामध्ये संविधान बदलणार असा नरेटिव्ह तयार करण्यात आला. हा नरेटिव्ह आम्हाला थांबवता आला नाही. त्याला आम्ही उत्तर देऊ शकलो नाही, त्याचा आम्हाला फटका बसला, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

काल लोकसभा निवडणुकांचे निकाल आले. मी देशभरातील भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आभार मानतो. पंडित नेहरूंच्या नंतर पुन्हा एकदा जनतेने तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मोदींना आशीर्वाद दिला. पहिल्यांदा ओरिसामध्ये पहिल्यांदा भाजप नेतृत्वात सरकार बनणार आहे. भाजप आणि एनडीए घटक पक्ष मिळून सरकार बनणार. 

राज्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. आम्हाला खूप कमी जागा मिळालेल्या आहेत. महाविकास आघाडिला राज्यात 2 लाख मते आमच्या पेक्षा जास्त मिळाली. मुंबईत दोन लाख मतं आम्हाला जास्त मिळालेली आहेत. काही जागा आम्ही 2000 हजार पेक्षा कमी मतानी हरलो. ही निवडणूक घासून झाली. पण भाजपला राज्यात लोकांनी नाकारले अशी परिस्थिती नाही. सम समान मते मिळाली आहेत.

आज आम्ही बसून निवडणुकीचा आढावा घेतला आहे. याबाबत आम्ही दिवसभर बैठक घेऊ. निवडणुकीत कोणते मुद्दे होते याचा आम्ही विचार केला. काही ठिकाणी अँटिइंकबन्सी दिसली. 

भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेले आहे. मुंबईच्या अध्यक्षाने स्वतः लक्ष घातले. मी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन करतो. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचा आहे. मला सरकारमधून मोकळ करावे अशी मी विंनती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी पक्षासाठी काम करेन. 

काही ठिकाणी कांदा आणि सोयाबिनचा प्रश्न होता, कापसाचाही प्रश्न होत. त्यामुळे काही ठिकाणी सरकारविरोधात अँटिइन्कम्बन्सी होती.   

जनतेने दिलेले जनादेश माणून आम्ही पुढील तयारी कऱण्याचा निर्णय घेतला. ज्यांना जास्त जागा मिळाल्या. त्यांचं अभिनंदन करतो.

ही बातमी वाचा : 

 

एबीपी माझामध्ये असोसिएट प्रोड्युसर म्हणून गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Crime Special Report : दिल्ली ॲसिड हल्ला प्रकरणात मोठा खुलासा, कुणी रचला बनाव?
Gangaram Gavankar : ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर अनंतात विलीन
MCA Election Row: 'असा कोणताही ठराव मंजूर नाही', MCA निवडणुकीवरून 28 Clubs आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला
BEST Fleet: '...आधीच्या सरकारने Best ला West केले', DCM Eknath Shinde यांचा मागील सरकारवर निशाणा
CNAP Mandate: 'आता मोबाईलवर दिसणार कॉलरचे खरे नाव', Spam Calls आणि फसवणुकीला बसणार चाप!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार,  टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
देशात CNAP सेवा सुरू होणार; अनोळखी कॉलचं टेन्शन जाणार, टेलिकॉम कंपन्यांना सरकारचे निर्देश
Hyderabad Balloon Flights : हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
हैदराबादहून बलून उड्डाण प्रयोग; जळगाव, बीड, नागपूर, सोलापूरसह काही जिल्ह्यांवर उपकरणे पडण्याची शक्यता, नागरिकांना सूचना जारी
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
पतंजली विश्वविद्यालयात 'स्वस्थ धरा' विषयावर राष्ट्रीय संमेलन, नाबार्ड-पतंजलीच्या सहकार्यानं जैविक शेती वाढणार
Cyclone Montha : चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
चक्रीवादळाची निर्मिती कशी होते? चक्रीवादळाला नाव कसे दिले जाते? मोंथा शब्दाचा अर्थ काय?
Mohammad Shami : मोहम्मद शमीचा सलग दुसऱ्या रणजी सामन्यात धमाका, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, आगरकरसह निवड समितीचं टेन्शन वाढलं
मोहम्मद शमीचा धडाका कायम, गुजरात विरुद्ध 8 विकेट घेतल्या, निवड समितीला दमदार कामगिरीतून उत्तर
Rashmika Mandanna: 8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
8 तासांच्या शिफ्टवरून दीपिकानंतर आता  रश्मिका मंदानाने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, इंडस्ट्रीने...  
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
गुडन्यूज! पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये स्वस्तात घर; म्हाडाच्या 4186 सदनिकांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचं आणखी एक पाऊल
आठव्या वेतन आयोगात किती सदस्य असणार? वेतन आयोग कधीपासून लागू होणार? केंद्राचा आणखी एक मोठा निर्णय
Embed widget