एक्स्प्लोर

Nagpur Politics : महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल; भाजप युवा मोर्चाचा आरोप

Nagpur News Update : महाविकास आघाडीकडून आपलं अपयश लपविण्यासाठी राज्य सरकारवर आरोप करण्यात येत असून याद्वारे राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाने मविआचा निषेध नोंदविला.

Nagpur News Update : महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. गेल्या तीन महिन्यात ही प्रक्रिया झालेली नाही. मात्र राज्य सरकारची बदनामी करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP) सरचिटणीस शिवाणी दाणी यांनी केला. राज्यातील विरोधी पक्षाकडून गुंतवणूक राज्याच्या बाहेर जात असल्याचा भ्रम प्रसरवला जात असल्याचा निषेध म्हणून नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून विरोधी पक्षातील नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन करत निदर्शने करण्यात आली.

नागपूरच्या आयटी पार्कमध्ये भाजप युवा मोर्चातर्फे ही निदर्शने करण्यात आली. शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्यासह शहरातील शेकडो युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातील गुंतवणूक महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेली. मात्र विरोधी पक्षाचे नेते हे गुंतवणूक बाहेर गेल्याचा आरोप राज्य सरकारवर करत आहेत आणि जनतेमध्ये भ्रम पसरवत आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन केले असे भारतीय जनता युवा मोर्चा (Yuva Morcha) कडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळविण्यात येत असल्याचा आरोप सतत विरोधकांकडून करण्यात येत असून गुजरात येथे निवडणुका असल्याने महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातमध्ये जात असल्याचेही आरोप राज्य सरकारवर करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील लगेच पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. 

'मविआच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न'

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला. त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचं गुंतवणूकदार म्हणायचे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडलं जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्प हा आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करणारच असाही विश्वास त्यांनी सोमवारी घेतलेल्या परिषदेत दिला. फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. टाटा एअरबसच्या बाबतीत हीच गोष्ट लागू असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.

"याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणे अपेक्षित"

 दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं. "जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं आहे. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.  

महत्त्वाची बातमी

Nagpur Double decker flyover : 700 कोटी झाले खर्च, आता काम पूर्ण करण्यासाठी 50 कोटीही नाही; 8 महिन्यांपासून काम बंद

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
खासदार ओमराजेंच्या निवासस्थानी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, मंत्री प्रताप सरनाईक आल्यानंतर घडली घटना, वादाचं नेमकं कारण काय?
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget