एक्स्प्लोर

तीन तीन शिवजयंत्या साजऱ्या होतात, ही महाराजांची अवहेलना नाही का? उदयनराजेंचा हल्लाबोल

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहे, जिथे राजेशाही आहे. त्यावेळी त्यांनी विचार केला असता राजेशाही अस्तित्वात ठेवायची, तर आजही देशात राजेशाही असती, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहे, जिथे राजेशाही आहे. त्यावेळी त्यांनी विचार केला असता राजेशाही अस्तित्वात ठेवायची, तर आजही देशात राजेशाही असती. मात्र सर्वात आधी राज्य कारभारात लोकांचा समावेश व्हावा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा. त्यांचं प्रतिनिधत्व असावं म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, ''आज तीन शिवजयंती साजरी केली जाते, ही अवहेलना नाही का महाराजांची, श्रेय वादासाठी काही करत असतील तर मला काही बोलायचे नाही.''

तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांनी याच मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली.

सर्वधर्म समभावची व्याख्या आता बदली आहे का? : उदयनराजे भोसले

उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रत्येक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. आदर्श मानतात. मात्र मला आणि अनेक नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की, सर्वधर्म समभावची व्याख्या आता बदली आहे का? सर्वधर्म समभाव म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि समाजातील विविध धर्मातील लोकांमध्ये फूट पडायचं काम करायचं, हे कितपत योग्य आहे. ते म्हणाले, आज ठिकठिकाणी जेव्हा शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार सांगता,  तेव्हा प्रत्येक पक्षात सर्व जाती धर्माचे लोक असले पाहिजे. अजेंडा काही असू दे, तुम्ही महाराजांचे विचार आचरणात आणत नाही, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी का घ्याचं.

उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, आधी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश हे एक खंड होतं. त्याआधी शिवाजी महाराज जन्माला आले होते. त्यावेळी काय झालं, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश  वेगळा झाला. आज असंच चालत राहिलं, तेव्हा तीन तुकडे झाले. आता प्रत्येकजण आपल्या धर्माचा विचार करत राहिला तर समाजात तेढ निर्माण होईल. तेव्हा तीन तुकडे झाले. आता किती होतील. ते पुढे म्हणाले, प्रत्येक राज्य हे वेगळं देश होणार आहे का? मी नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे. याच विचारणे देशाला अखंड ठेवलं आहे. आज जगभरात आपल्याला सर्वात मोठी लोकशाही म्हणून पाहिलं जात. मात्र महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर काय होईल? असं ते म्हणाले आहेत.

  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
Sunil Tatkare : विलिनीकरणाला माझा विरोध नव्हता, मला त्या गोष्टीची माहिती होती, सुनील तटकरेंचं दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर मोठं वक्तव्य
विलिनीकरण करु पण सुनेत्रा वहिनींना नेता निवडा असं त्यांच्यातील कोणी म्हटलं नाही : सुनील तटकरे
बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, लक्ष्मण हाकेंची भूमिका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण? 
बारामतीची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, लक्ष्मण हाकेंची भूमिका, सुनेत्रा पवारांच्या विरोधात कोण? 
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप
NCP: राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बदनामीसाठी रोहित पवारांनी एजन्सीला 5 कोटींचं पॅकेज दिलंय; सूरज चव्हाणांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report
Ashok Kharat Daughter Marriage : लग्नपत्रिका खरातच्या मुलीची मांदियाळी नेत्यांची Special Report
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Sunil Tatkare Coffee With Kaushik : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा राग तटकरेंवरच का?
Suraj Chavhan On Rohit Pawar : राष्ट्रवादी पक्षाला अडचणीत आणण्यासाठी रोहित पवारांना 5 कोटी दिलेत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Tatkare : भोंदू अशोक खरात प्रकरण, रुपाली चाकणकरांचा राजीनामा आणि एसआयटी चौकशी, सुनील तटकरेंनी काय म्हटलं?
भोंदू अशोक खरातची भेट, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याचं प्रकरण, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?
America : अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
अमेरिकेला चार देशांकडून धक्का, लष्करी विमानं उतरवण्यास विरोध, डोनाल्ड ट्रम्प नाराज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
हा विद्रोह माझ्या मातीसाठी, राजा शिवाजी सिनेमाच्या टीझरने अंगावर काटा, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, अभिषेक बच्चनसह दिग्गजांची फौज
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
अबुधाबीच्या कंपनीनं भारतीय कंपनीसाठी तिजोरी उघडली, सम्मान कॅपिटलमध्ये मालकी हक्क मिळवण्यासाठी 8800 कोटी मोजले
Ashwini Bhide : अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
अश्विनी भिडेंच्या नियुक्तीमागे राजकारण रंगलं, फडणवीसांचा पुन्हा एकदा शिंदेंना शह, महापालिकेवर वरचष्मा कायम
Donald Trump : इराण विरोधातील युद्धात अमेरिका एकाकी, डोनाल्ड ट्रम्प यांच्या संतापाचा भडका, UK आणि फ्रान्सला धडा शिकवण्याचा इशारा
तुम्ही तुमचं तेल मिळवा, अमेरिका तुम्हाला साथ द्यायला बांधील नाही, डोनाल्ड ट्रम्प UK आणि फ्रान्सवर भडकले
Sakal Hindu Samaj : रामनवमीला शोभायात्रा रोखल्याचा पोलिसांवर आरोप, सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
रामनवमीला शोभा यात्रा रोखल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजाचं चेंबूरमध्ये आंदोलन, पोलिसांकडून आंदोलक ताब्यात
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
RBI चा एअरटेल पेमेंटस बँकेला दणका, तब्बल 31 लाखांचा दंड ठोठावला, कारवाई कोणत्या कारणामुळं झाली?
Embed widget