एक्स्प्लोर

Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..

रायगडमध्ये अंबादास दानवेंनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

Raigad: शिवसेनेची खरी ओळख असणारे घोषवाक्य म्हणजे ' जय शिवाजी, जय भावानी '. मात्र, जुना काळ गेला आता 'जय भवानी जय शिवाजी बोलायचं आणि मत मिळवायची दिवस गेले.' असं वक्तव्य थेट  विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी कर्जत येथे संवाद मेळाव्यात शिवसैनिकांसमोर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरेंची शिवसेना आता बदलली आहे हे कुठे तरी अधोरेखित होताना दिसत असून शिवसेनेची जुनी ओळख पुसून काही तरी नवं आणण्याचा प्रयत्न होतोय का?अशी चर्चा रंगली आहे.राज्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून धूसफूस सुरु आहे. रायगड नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.  तर दुसरीकडे आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी उबाठा गट सक्रीय होत असल्याचं दिसून येत आहे. (Maharashtra Politics)

काय म्हणाले अंबादास दानवे?

रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे  ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मेळावा गुरुवारी (29 जानेवारी) पार पडला.विधानसभेच्या निवडणुकीत पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य निर्माण व्हावे यासाठी या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं.या संवाद मेळाव्यासाठी विधापरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थीत होते.यावेळी अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना अनेक कानमंत्र दिले. पण बोलण्याच्या ओघात शिवसेनेची खरी ओळख असणारे घोषवाक्य म्हणजे ' जय शिवाजी, जय भावानी ' याबाबत अजब वक्तव्य करत राजकारणाची बदललेली परिभाषा व्यक्त केली. आणि आता जय शिवाजी जय भवानी बोलून मते घ्यायचे दिवस गेले असे म्हणत उपस्थितांना कानमंत्र दिला. यावरून ठाकरेंची शिवसेना आता बदलली आहे हे कुठे तरी अधोरेखित होताना दिसत असून शिवसेनेची जुनी ओळख पुसून काही तरी नवं आणण्याचा प्रयत्न होतोय का?अशी चर्चा रंगली आहे. 

स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी उबाठा सक्रीय

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून मोठी धूसफूस सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केल्यानंतर  लगेच दुसऱ्या दिवशी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आल्याने राजकारणाला वेग आला आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे. दरम्यान, रायगडमध्ये अंबादास दानवेंनी केलेल्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.  महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भातील सुनावणी आता 25 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्या सुनावणीनंतर निवडणुका जाहीर होणं अपेक्षित आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील मराठी मतदारांशी भेट घेतली. दिल्लीकरांच्या वतीनं देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्वाच्या मागण्या करण्यात आल्यात.तुम्ही आमच्या दिल्लीकराचे पालकमंत्री व्हा,सोन्या चांदीचा व्यवसाय करणाऱ्या गलाई समाजाच्या काही समस्या आहेत. त्यांना प्रशासनाकडून त्रास होतो त्यांच्या समस्यांवर लक्ष द्यावं…दिल्लीत मराठी संस्कृती सांगणारी मंदीर आहेत. या मंदिरांकडे लक्ष द्यावं,दिल्लीतील दोन मराठी शाळा आहेत. या शाळांना मदत करता आली तर कृपया मदत करावीछत्रपती शिवाजी महाराज स्मारक यांचं दिल्लीत एक मोठं स्मारक तयार करावं…दिल्लीत मराठी कला संस्कृत वाढवण्यासाठी एक महामंडळ स्थापन करावीदिल्लीतील महाराष्ट्र सदनाचा महाराष्ट्रातील जनतेला उपयोग व्हावा यासाठी प्रयत्न करावा अशा मागण्या करण्यात आल्यात.

हेही वाचा:

मग युती कधी? उद्धव ठाकरेंसमोर मिलिंद नार्वेकरांची गुगली, मी सुद्धा या सुवर्णक्षणाची वाट पाहतोय, चंद्रकांत पाटील यांचा सिक्सर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

व्हिडीओ

Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance  : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indigo Crisis: पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
पुण्यात आजही 42 विमानं रद्द, मुंबई-पुणे तिकिटाची किंमत एक लाख, व्हीआयपींना मुंबई विमानतळावरच रात्र काढण्याची वेळ; प्रवाशांचे प्रचंड हाल
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवारांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न, लग्नाचे फोटो समोर
Ahilyanagar Crime: भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
भाजपच्या माजी नगरसेवकाचा लग्नासाठी तगादा, जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?
Nanded Crime: सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
सक्षमचं कुटुंब अन् आचलच्या जीवाला धोका, नांदेडमधील भयानक प्रकारानंतर पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
Maharashtra Live blog: परळी नगर नगरपरिषदेसमोर राडा घालणे पडले महागात, 20 जणांविरोधात गुन्हा दाख
IND vs SA :दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत विजय मिळवून देखील तिसऱ्या वनडेत दोघांना बाहेर ठेवणार? कारणं समोर
दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडेत भारतावर विजय मिळवून देखील तिसऱ्या वनडेत दोघांना बाहेर ठेवणार? कारणं समोर
Jay Pawar Rutuja Patil Marriage : अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
अजित पवार यांचे पुत्र जय पवार-ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न, लग्नाचे फोटो समोर
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Embed widget