एक्स्प्लोर

Ambadas Danve : मुंडेंच्या चेलेचपाट्यांनी देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्रींना मान्य आहे का? अंबादास दानवेंचा प्रहार

Ambadas Danve on Namdev Shastri : धनंजय मुंडे यांना भगवानगडाचा पाठिंबा मिळाल्यानंतर अंबादास दानवे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Ambadas Danve on Namdev Shastri : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) मागील दीड महिन्यापासून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर आरोप असून विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच गुरुवारी धनंजय मुंडे हे भगवानगडावर दाखल झाले होते. शुक्रवारी (दि. 31) नामदेव शास्त्री महाराज (Namdev Shastri Maharaj) यांनी धनंजय मुंडे यांना भक्कमपणे पाठिंबा दर्शविला. धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणूनबुजून गुन्हेगार ठरवले जात आहे, असे त्यांनी म्हटले. आता नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 

अंबादास दानवे म्हणाले की, संतांनी आशीर्वाद दिला पाहिजे, पण तो गुन्हेगारांना नाही. संत सर्व जाती-धर्माचे असतात. कोणत्याही एका जातीपातीचे नसतात. त्या पद्धतीने संतांनी आशीर्वाद दिले पाहिजे. धनंजय मुंडे यांच्या चेलेचपाट्यांनी संतोष देशमुखांचा खून पाडला, तो शास्त्री यांना मान्य आहे का? हा माझा सवाल आहे. मी व्यक्तिगत बोलत नाही. पण, कोणत्याही गुन्हेगारांची पाठराखण संतांनी करणे चुकीचे आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. 

महाराष्ट्राचा भ्रमनिरास झालाय

आज शनिवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे. याबाबत विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे. खरं तर बिहार आणि आंध्र प्रदेशने ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी वेगवेगळ्या विकासाचे प्रकल्प घेऊन गेले. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री यांनी पळीभर पाण्यामध्ये म्हणजे चुल्लू भर पाण्यामध्ये डुबून जीव द्यावा. महाराष्ट्राच्या वाट्याला काही नाही. महाराष्ट्राचा भ्रमनिरास झाला आहे, असे त्यांनी म्हटले. 

जनतेला आधार न देणारे सरकार

अंबादास दानवे पुढे म्हणाले की,  त्याच-त्याच घोषणा 2014 पासून हे सरकार करत आहे. नुसत्या घोषणा आहेत. कृषी क्षेत्राबाबत ज्या घोषणा केल्यात त्या योग्य नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेच्या वाट्याला या बजेटमधून काही आलेलं नाही. फक्त घोषणांचा पाऊस आणि घोषणांचा सुकाळ या बजेटमध्ये आहे.  मागच्या काळामध्ये ज्या तरतुदी झाल्या त्यावेळी "सप्तऋषी" म्हणून घोषणा गेल्या वेळेस केली होती. मात्र या घोषणेतून कोणत्या सप्तऋषीचा विकास झाला हे सांगितलं पाहिजे. आता मोठं नाव देऊन चार इंजिन असं सांगण्यात आलं. मात्र या चार इंजिनमध्ये कसं काम करणार? निर्यात वाढ कशी करणार? कांद्याची निर्यात वाढ, सोयाबीनची निर्यात वाढ कशी करणार? याबाबत काही सांगितलं गेलं नाही.  जनतेला, शेतकऱ्यांना, युवकांना कोणताही आधार न देणारे हे सरकार आहे. बारा लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 10 टक्के टॅक्स भरावा लागणार आहे. घोषणा वेगळी केली. मात्र, बारा लाखापर्यंत दहा टक्के टॅक्स भरावा लागणार आहे, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा

Beed : नामदेव शास्त्रींच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा खल, धनंजय देशमुख पुराव्यांसकट जाणार भगवानगडावर, मस्साजोग प्रकरणाला नवे वळण

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DK Shivkumar: 'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
'मी या पदावर कायम राहू शकत नाही' काँग्रेसच्या पराभवाची मालिका थांबेना अन् आता कर्नाटकमध्ये डीके शिवकुमारांच्या वक्तव्यांनी भूवया उंचावल्या!
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
राज्यपालांनी विधानसभेतील मंजूर विधेयकांना विलंब करू नयेत, दिलेली डेडलाईन हटवली; सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठाने निर्णय बदलला
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांपुढे ठरलं तरीही फोडाफोडी सुरूच; शिवसेनेनं भाजपचा उमेदवार फोडला, नगरसेवकपदाचा अर्ज मागे
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
मुख्यमंत्र्यांचा मामेभाऊ नगरपरिषदेत बिनविरोध, रवि राणांचा थेट फोन; देवेंद्र फडणवीस म्हणाले अभिनंदन
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
गुंडांना जामीन अन् नेत्यांना जमीन; पुण्यातील व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा गृहमंत्र्यांना सवाल
Shaurya Patil: माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
माझ्या मुलाला पण असाच त्रास, मी माझ्या मुलाला घेऊन जीवन संपवण्याचा विचार केला; शौर्य पाटीलच्या शाळेतील पालकांचा शिक्षकांवर सनसनाटी आरोप
Kalyan Crime News: ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
ट्रेनमध्ये धक्का लागताच हिंदी-मराठी बोलण्यावरुन वाद; 4-5 जणांकडून मारहाण, कल्याणमधील अर्णव खैरेने घरी येऊन जीवन संपवलं!
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
सांगलीच्या शौर्य पाटीलचा दिल्लीत आयुष्याचा शेवट; प्राचार्या आणि शिक्षिकांच्या जाचाला कंटाळत टोकाचं पाऊल
Embed widget