एक्स्प्लोर

Vasai Virar : राजकीय साठमारीत वसईकर तहानलेले! मविआच्या काळात सूर्या पाणीपुरवठेला निधी, पण...

Vasai Virar Water Supply : वसई-विरारकरांसाठीच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेला निधी मिळूनही राजकारणात काम पूर्ण होत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

वसई :  विरार- एमएमआरडीएच्या सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत 1200 कोटी रुपये खर्च झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून 50 टक्के निधी (529.93 कोटी) या योजनेवर खर्च झालेला आहे. त्यातून मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठीचे 87 टक्के काम पूर्ण झालेले आहे. तर वसई-विरार महापालिकेला तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 70 ते 80 दशलक्ष लिटर पाण्यासाठीचे 100 टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र विद्यमान सरकारच्या प्रभावाखाली एमएमआरडीएकडून जाणीवपूर्वक हे पाणी देण्यास विलंब केला जात असल्याची वसई-विरारकरांची भावना आहे. त्यामुळेच वसईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 11 सप्टेंबर रोजी एमएमआरडीए मुंबई-वांद्रे कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे.

सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला मिळणाऱ्या 185 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी जून 2023 अखेर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महापालिकेसोबतच्या 21 जून 2023च्या बैठकीत दिले होते. मात्र एमएमआरडीच्या दिरंगाईमुळेच हे पाणी उपलब्ध होत नसल्याने वसई-विरारकरांनी संताप व्यक्त केलेला आहे.

उपलब्ध पाणी शहरात आणण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण करून उच्च दाब चाचणी घेण्यास एमएमआरडीएने कळविले होते. त्यानंतर काशिद-कोपर येथील संतुलन टाकीतून पाणी उपलब्ध करून नवीन अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण आणि जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देशही एमएमआरडीएने दिले होते. त्यानुसार वसई-विरार महापालिकेने 31 जुलै 2023 रोजी जलदाब चाचणी तसेच जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण आणि जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र सप्टेंबरअखेर आला तरी एमएमआरडीएकडून ही आश्वासनपूर्ती झालेली नाही. परिणामी शहरातील 24 लाख लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईला  सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पंकज देशमुख यांनी केला आहे. 

एमएमआरडीएच्या सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणी देण्याकरता जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेतून वसई-विरार महापालिका क्षेत्राला 185 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. तर उर्वरित 218 दशलक्ष लिटर पाणी हे मीरा-भाईंदर महापालिकेला प्राप्त होणार आहे. 1329.01 कोटींची ही योजना असून 3 ऑगस्ट 2017 रोजी या कामासाठीचे कार्यादेश निघालेले होते. मात्र काही कारणास्तव ही योजना रेंगाळल्याने या कामासाठी आता मे 2024 पर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटले?

या वर्षी अतिरिक्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यात गढूळपणा आहे. त्यामुळेच पाणी देण्यास विलंब लागत आहे. पाणी शुद्ध करताना वॉटर ट्रिटमेंट प्लांटवर ताण येत आहे. पाऊस कमी झाला, पाण्यातील गढूळपणा कमी झाला की, वसई-विरारकरता तात्काळ पाणी उपलब्ध करून देता येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे उपअभियंता आकाश कदम यांनी दिली. 

वसई-विरार महापालिकेने काय म्हटले?

वसई-विरार महापालिकेने 4 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै असा सातत्याने एमएमआरडीए प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला आहे. पालिकेला उपलब्ध होणारे 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी वितरित करण्यासाठीची कार्यवाही एमएमआरडीए प्रशासनाच्या निर्देशांनुसार पूर्ण करण्यात आलेली आहे, असे या पत्रांतून कळविण्यात आलेले होते. एमएमआरडीएने पाणी उपलब्ध करून दिल्यास महापालिका मासवण येथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटमधून (200 एमएलडी) हे पाणी शुद्ध करून घेऊ शकेल, असे वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
रेलिंग तुटून दोन पर्यटक दरीत कोसळले, पालघरच्या जव्हारमधील दाभोसा धबधब्यावर धक्कादायक घटना 
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
शेअर मार्केटमध्ये लॉस, 32 कोटी रुपयांसाठी बिझनेस 'पार्टनर'चीच दिली सुपारी; उद्योगपतीवर गोळ्या झाडणाऱ्या 7 जणांना अटक
Virar News: धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
धक्कादायक! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् अडीच-तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं नवजात बाळ; विरारमधील रुग्णालयावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
Virar News: कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी
कौटुंबिक आघाताने आयुष्य पूर्णपणे बदलले, आता दिसेल त्याला मारते, नको नको ते करते; विरारमधील महिलेची वेदनादायी कहाणी

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget