एक्स्प्लोर

Vasai Virar : राजकीय साठमारीत वसईकर तहानलेले! मविआच्या काळात सूर्या पाणीपुरवठेला निधी, पण...

Vasai Virar Water Supply : वसई-विरारकरांसाठीच्या सूर्या पाणीपुरवठा योजनेला निधी मिळूनही राजकारणात काम पूर्ण होत नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे.

वसई :  विरार- एमएमआरडीएच्या सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेवर आतापर्यंत 1200 कोटी रुपये खर्च झाले आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष प्रयत्नांतून 50 टक्के निधी (529.93 कोटी) या योजनेवर खर्च झालेला आहे. त्यातून मीरा-भाईंदर व वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रासाठीचे 87 टक्के काम पूर्ण झालेले आहे. तर वसई-विरार महापालिकेला तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या 70 ते 80 दशलक्ष लिटर पाण्यासाठीचे 100 टक्के काम पूर्ण झालेले आहे. मात्र विद्यमान सरकारच्या प्रभावाखाली एमएमआरडीएकडून जाणीवपूर्वक हे पाणी देण्यास विलंब केला जात असल्याची वसई-विरारकरांची भावना आहे. त्यामुळेच वसईकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 11 सप्टेंबर रोजी एमएमआरडीए मुंबई-वांद्रे कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे.

सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून वसई-विरार महापालिकेला मिळणाऱ्या 185 दशलक्ष लिटर पाण्यापैकी 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी जून 2023 अखेर उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महापालिकेसोबतच्या 21 जून 2023च्या बैठकीत दिले होते. मात्र एमएमआरडीच्या दिरंगाईमुळेच हे पाणी उपलब्ध होत नसल्याने वसई-विरारकरांनी संताप व्यक्त केलेला आहे.

उपलब्ध पाणी शहरात आणण्याच्या दृष्टीने महापालिकेमार्फत टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम पूर्ण करून उच्च दाब चाचणी घेण्यास एमएमआरडीएने कळविले होते. त्यानंतर काशिद-कोपर येथील संतुलन टाकीतून पाणी उपलब्ध करून नवीन अंथरण्यात आलेल्या जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण आणि जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया करण्याचे निर्देशही एमएमआरडीएने दिले होते. त्यानुसार वसई-विरार महापालिकेने 31 जुलै 2023 रोजी जलदाब चाचणी तसेच जलवाहिनीचे निर्जंतुकीकरण आणि जलवाहिनी स्वच्छ करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र सप्टेंबरअखेर आला तरी एमएमआरडीएकडून ही आश्वासनपूर्ती झालेली नाही. परिणामी शहरातील 24 लाख लोकसंख्येला तीव्र पाणीटंचाईला  सामोरे जावे लागत आहे, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख पंकज देशमुख यांनी केला आहे. 

एमएमआरडीएच्या सूर्या (403 दशलक्ष लिटर) पाणी पुरवठा योजनेतून मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राला पाणी देण्याकरता जलवाहिनीचे काम प्रगतीपथावर आहे. या योजनेतून वसई-विरार महापालिका क्षेत्राला 185 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. तर उर्वरित 218 दशलक्ष लिटर पाणी हे मीरा-भाईंदर महापालिकेला प्राप्त होणार आहे. 1329.01 कोटींची ही योजना असून 3 ऑगस्ट 2017 रोजी या कामासाठीचे कार्यादेश निघालेले होते. मात्र काही कारणास्तव ही योजना रेंगाळल्याने या कामासाठी आता मे 2024 पर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे.

एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटले?

या वर्षी अतिरिक्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्यात गढूळपणा आहे. त्यामुळेच पाणी देण्यास विलंब लागत आहे. पाणी शुद्ध करताना वॉटर ट्रिटमेंट प्लांटवर ताण येत आहे. पाऊस कमी झाला, पाण्यातील गढूळपणा कमी झाला की, वसई-विरारकरता तात्काळ पाणी उपलब्ध करून देता येईल, अशी माहिती एमएमआरडीएचे उपअभियंता आकाश कदम यांनी दिली. 

वसई-विरार महापालिकेने काय म्हटले?

वसई-विरार महापालिकेने 4 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै असा सातत्याने एमएमआरडीए प्रशासनासोबत पत्रव्यवहार केलेला आहे. पालिकेला उपलब्ध होणारे 70 ते 80 दशलक्ष लिटर पाणी वितरित करण्यासाठीची कार्यवाही एमएमआरडीए प्रशासनाच्या निर्देशांनुसार पूर्ण करण्यात आलेली आहे, असे या पत्रांतून कळविण्यात आलेले होते. एमएमआरडीएने पाणी उपलब्ध करून दिल्यास महापालिका मासवण येथील वॉटर ट्रिटमेंट प्लांटमधून (200 एमएलडी) हे पाणी शुद्ध करून घेऊ शकेल, असे वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
Embed widget