एक्स्प्लोर

Hitendra Thakur : निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले

Election Commission Voter List Case : पालघरमध्ये एकाच महिलेचे मतदारयादीत सहा ठिकाणी नाव असल्याचं समोर आलं. त्यावरुन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.

पालघर : निवडणूक आयोगाला मतदारयादीत घोळ घालून निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनीच ग्रामपंचायतीपासून आमदार-खासदार पदाचे उमेदवार जाहीर करावेत, निवडणुकीचा प्रश्न उरणार नाही अशी संतप्त टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. हितेंद्र ठाकून यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत.

अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादीतील घोळाबाबत आयोगावर टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पालघरच्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे एका मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार उघड झाला. याच मुद्द्यावरून ठाकूर यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.

आयोगानेच उमेदवार जाहीर करावेत

अशा प्रकारचे असंख्य घोळ मतदारयादीत आहेत. आम्ही हे प्रकार वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. लोकसभा आणि विधानसभेत अशाच प्रकारे परिवर्तन झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मतदाराच्या घोळावर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, "जर निवडणूक आयोगाकडूनच अशी निष्क्रियता राहणार असेल, तर यापुढे कोणत्याही निवडणुका घेण्याची गरज नाही. थेट ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदारापर्यंतचे उमेदवार आयोगानेच घोषित करावेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा सदस्य कोण किंवा आमदार कोण हा निवडणुकीचा प्रश्नच राहणार नाही.”

वसई मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा पराभवाचा धक्का बसला. भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. निवडणूक यादीतील झालेल्या फेरफारीमुळे हा पराभव झाल्याचा सूर हितेंद्र ठाकूर यांनी आळवला आहे.

नालासोपाऱ्यात सुषमा गुप्ताचे सहा वेळा नाव

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी मतदार याद्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे देशभरात मोठं वादळ निर्माण झालं. काँग्रेसनं निवडणूक आयोगाच्या मुख्यालायवर मोर्चाही काढला. मात्र महाराष्ट्रातल्या दोन शहरांमधून मतदार यादी घोटाळ्याची प्रकरण समोर आली आहेत. यातलं प्रकरण आहे मुंबईजवळच्या नालासोपाऱ्यातलं. तर दुसरं चंद्रपूरच्या घुग्घुसमधलं

नालासोपाऱ्यातील 39 वर्षीय महिला सुषमा गुप्ता या महिलेचं नाव मतदार यादीत तब्बल सहा वेळा आढळून आलं. महत्त्वाचं म्हणजे महिलेचा मतदार क्रमांकही वेगवेगळा आहे. सोशल मीडियात या मतदार यादीची माहिती व्हायरल झाली आणि निवडणूक आयोगानं तातडीनं याची दखल घेत माहिती घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Palghar Rain: पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला, मृतदेहासह कुटुंबाला चार तास छतावर बसण्याची वेळ; पालघरमधील मन सुन्न करणारी घटना!
पुराच्या पाण्याने अखेरचा निरोपही रोखला, मृतदेहासह कुटुंबाला चार तास छतावर बसण्याची वेळ; पालघरमधील मन सुन्न करणारी घटना!
Raigad Rain : ​​मुसळधार पावसाची दाहकता; हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; तर पालघरमध्ये लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात
​मुसळधार पावसाची दाहकता; हरिहरेश्वरच्या समुद्रकिनारी आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह; तर पालघरमध्ये लहान चिमुकल्यांसह आठ जण चार तास पुराच्या विळख्यात
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
पाण्यात बुडालेली जनता दिसली नाही, आता हेल्मेट पाहताय; ट्रॅफिक पोलिसाच्या दंडात्मक कारवाईवर वसई-विरारकर संतापले
Vasai Virar Rain : पावसाच्या तांडवात मानवतेचा हात; चादरीच्या स्ट्रेचरवरून तरुणीला नेलं रुग्णालयात; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं
पावसाच्या तांडवात मानवतेचा हात; चादरीच्या स्ट्रेचरवरून तरुणीला नेलं रुग्णालयात; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget