एक्स्प्लोर

Dada Bhuse on Maha patrakar parishad : "जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न"; दादा भूसेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Nashik News : अध्यक्षांनी कायदे, नियम, वस्तुस्थितीवर न्यायनिवाडा केला. जनतेची दिशाभूल करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात, असा टोला दादा भुसे यांनी लगावला. 

Dada Bhuse on Maha patrakar parishad नाशिक : अध्यक्षांनी जो न्यायनिवाडा केला, त्यात कायदे, नियम आणि वस्तुस्थितीवर न्यायनिवाडा केला. जनतेची दिशाभूल करण्यासाठी त्यांचे रोज केविलवाणे प्रयत्न सुरू असतात, असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी उद्धव ठाकरेंना महा पत्रकार परिषदेवरून (Maha Patrakar Parishad) लगावला. 

सोमवारी नाशिकला 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या (National Youth Festival) समारोपाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना दादा भुसे बोलत होते. ते म्हणाले की, न्यायनिवाड्याला दोन बाजू असू शकतात. ज्याला मान्य नाही, त्याला दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु जनतेत संभ्रम करणे आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे लोकशाहीला अभिप्रेत नाही. 

उद्या सर्वोच्च न्यायालयावरही प्रश्नचिन्ह निर्माण करणार का?

तुम्ही उद्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) गेले आणि त्यांच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणार का? असा सवाल दादा भुसे यांनी उपस्थित केला. या अगोदरही उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, हे उचित नसल्याचेदेखील ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदींचे शेतकऱ्यांकडे लक्ष

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्ज माफ होतात. पण शेतकऱ्यांची कर्ज माफ होत नाही. देशात चुकीची आर्थिक धोरण राबवली जात आहेत, अशी टीका केली. यावर दादा भुसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकऱ्यांकडे लक्ष आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजना, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशा अनेक योजना राबवण्यात येत आहे.  

विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली

मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर गेले आहेत. या वरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. यावर दादा भुसे यांनी विचारले असता ते म्हणाले की, विरोधकांच्या पोटात आता गोळा उठला आहे. महाराष्ट्रात विकास कामांचे जे प्रकल्प आहे, ते बघून जागतिक पातळीवरील गुंतवणूक होईल. दावोस वरून आल्यानंतर किती हजारो कोटींचे करार संपन्न झाले, याची माहिती मुख्यमंत्री देतील. त्याअगोदरच विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आपल्या राज्याचे नाव कमी होईल, यासाठी हे लोक खालच्या पातळीवर आले असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 

यांच्या बुद्धीची कीव वाटते

जितेंद्र आव्हाड यांनी राम कोणत्या जातीचे होते, ते बहुजन होते की नाही. तसेच मटन म्हणजे काय. यावर पुन्हा एकदा भाष्य केले. यावर दादा भुसे यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, मतांच्या लाचारीसाठी माणूस किती खालच्या पातळीवर जातो. यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. यांची फक्त सुंता बाकी राहलीय, अशी टीका त्यांनी केली. 

आणखी वाचा 

उद्धव ठाकरेंची महापत्रकार परिषद, आता मोदींनी पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत दाखवावी :संजय राऊत

 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget