एक्स्प्लोर

Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळांनी राष्ट्रवादी सोडून रिपब्लिकन पक्षात यावं, मंत्री रामदास आठवले यांची ऑफर

Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

Nashik Ramdas Athwale : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची रास्त भूमिका असून जास्तीत जास्त पदाधिकारी मराठा समाजातील आहेत, भुजबळ नेहमीच शरद पवार यांच्या मागे ताकदीने उभे राहिले. त्यांना जर वाटत असेल की, अन्याय होत आहे, तर छगन भुजबळ यांनी बाहेर पडावे आणि रिपब्लिकन पक्षात यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना केले आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांना प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी केली होती. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे आज नाशिक (Nashik) शहरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. दलित पँथरला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सुवर्ण महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन येत्या 10 जुलै रोजी नाशिकमध्ये होईल. नाशिक शहरातील कालिदास कलामंदिरात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक लोकांचे मत आहे की, दलित पँथर संघटन पुन्हा सुरू व्हावे. याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असेही आठवले यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान नुकतीच पाटणा (Patana) येथे विरोधकांची बैठक पार पडली. याबाबत आठवले म्हणाले की, विरोधक पक्षांना शुभेच्छा असून त्यांनी एकत्र यावे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्त येथे भेट दिली. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे मुस्लिम विरोधी नाही, अशी भावना तयार झाली आहे. पीएम नरेंद्र मोदी जगातील एक नंबरचे पॉप्युलर नेते आहेत. त्यामुळे विरोधकांनी कितीही कांगावा केला, तरी NDA चे सरकार येईल.2024 मध्ये आम्ही 350 पेक्षा जास्त जागा जिंकू, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारी करत आहेत. भाजपने देखील मित्र पक्षाशी बोलणी सुरु असून बैठका देखील पार पडत आहेत. यावर आठवले म्हणाले की, मित्रपक्षाला सोबत घेऊन भाजपा जात आहे. NDA च्या प्रत्येक मीटिंगला आम्ही जातो. मात्र महाराष्ट्रात अशा मीटिंग होत नाही. भाजप पक्षाची भूमिका समजून घेतली पाहिजे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आम्हाला जागा मिळावी, मित्र पक्षाला जागा मिळावी, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त करत स्थानिक पातळीवर भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी बोलवलं पाहिजे, असे आवाहन देखील त्यांनी केले. इगतपुरी परिसरात दोन दिवसांपूर्वी घटना घडली. यावर आठवले म्हणाले की मला वाटतं की, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिलेले आहे. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे. या प्रकरणात गोमांस होते का, याची तपासणी करावी. याबाबत फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. 

खायचं असल्यास तेलंगणात जाऊन खावं... 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र बीआरएस पक्षाचा बोलबाला असून आज पक्षाचे मंत्रिमंडळ थेट विठ्ठल दरबारी दर्शन घेऊन आले. आठवले म्हणाले की, तेलंगणा मध्ये BJP आणि TDP एकत्र येऊन केसीआर यांची सत्ता घालवण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्या पक्षाने महाराष्ट्रात फारसा फरक पडणार नाही. पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर आहे. त्यांना सुद्धा दर्शनाला यायचा अधिकार आहे. मात्र तिथले पावित्र्य राखले जावे, असे आवाहन आहे. मात्र नॉनव्हेज देणे अत्यंत चुकीचे असून पंढरीचा अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे. खायचे असेल तर त्यांनी तेलंगणामध्ये जाऊन खावं. एकादशीच्या दिवशी नॉन व्हेज खाणे, अशा प्रकारे हा अपमान असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे बीआरएस हा पक्ष भाजपची बी टीम असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आठवले म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार आहे. तो त्यांचा स्वतंत्र पक्ष असून त्यामुळे बी टीम आहे, असं म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांना प्रत्युत्तर 

दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेब कबरीवर भेट दिली. यावर आठवले म्हणाले की, त्या ठिकाणी जाणे अयोग्य आहे. आंबेडकरी चळवळ मुस्लिमांना पाठिंबा देणारी आहे, औरंगजेब याला पाठींबा देणारी नाही. मुस्लिम समाजाला आवाहन आहे की, आमचं सरकार आपल्यासाठी देखील कामे करत आहे. नागरिकांचे संरक्षण करणे, आमची जबाबदारी आहे. त्यांनी मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे, त्याला आमचा विरोध आहे. त्याचबरोबर राज्यात कुठेही दंगली झाल्या नाही. हिंदू-मुस्लिम समाजाचा दंगा कुठेही झाला नाही. केवळ पोलीस आणि आंदोलनकर्ते यांच्यात वाद झाला.त्यामुळे ते म्हणतात की, दंगा थांबला, पण दंगा झालाच नव्हता, असे स्पष्टीकरण रामदास आठवेल यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्यानंतर दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् थेट पोटात गोळ्या झाडल्या; नाशिकमधील 'त्या' प्रकरणाचं धक्कादायक कारण समोर
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: 15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
15 वर्षांच्या लिव्ह-इनचा भयानक शेवट; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराचा काटा काढला, बॉडी 18 तास घरात ठेवली अन्..., नाशिक हादरलं!
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Embed widget