एक्स्प्लोर

2024 ला मोदींना पायउतार करा अन् ही व्यवस्था बदला,  प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

नाशिकमध्ये धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बौद्ध अनुयायांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Prakash Ambedkar Speech: देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपला नाही, मात्र आपल्याला खासदार निवडून देण्याचा अधिकार आहे. निवडून गेलेल्याने पंतप्रधान ठरवायचा ही व्यवस्था आहे. आणि हीच व्यवस्था आता बदलायला हवी. व्यवस्थेचा भाग म्हणून खासदार निवडण्याचं काम आपलं असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

नाशिकमध्ये धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बौद्ध अनुयायांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते यावेळी म्हणाले, घटनेने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आता राहणार नाही, कारण आता नवीन कायदा येत आहे. या देशात आंतरधर्मीय- आंतरजातीय लग्न समाजाने स्वीकारले आहेत. मात्र विकृती समाजात आहे, ती नाकारता येणार नाही. पण याला धरून शासन आता सामाजिक कायदा, त्या संबंधित कायदा आता गठीत होत आहे. 

सध्या देशात पंतप्रधानांच्या तोडीचा माणूसच नाही. त्यामुळेच दुर्दैवाने आपण सगळे त्याला बळी पडत आहोत. आपल्यावर बिंबवले जात आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार दुसरा नाही, आपल्या मेंदूचा ताबा घेतला जातोय. आता खासदार नका निवडू, आता पंतप्रधान निवडा. उद्या दुसरा कोणी आला, तर त्याला पंतप्रधान म्हणून निवडून देणार का? या देशात उतरंडीची व्यवस्था आहे, तो पर्यंत न्हावी, कुंभार, चांभार यांना मत देणार नाही. त्यामुळे तुमची पंतप्रधान होण्याची कायमची संधी गेली. खासदाराला निवडण्याचा अधिकार काढून घेतला जातोय. आणि तुम्हाला बंदिस्त करण्याचं काम केलं जातंय. म्हणूनच आरएसएस संविधान बदलण्याची भाषा करत असल्याचे ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, कुठल्याही पक्षाचा प्रमुख ईडीच्या चौकशीत आहेत. राहुल गांधींना पाठीमागे उभं राहायला लावलं आणि मागे नाही राहिला तर जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जाते. मग त्याला उभं राहावंच लागेल. मी सांगेल तसं नाचा. नाही तर जेलचे दरवाजे खुले आहे. हा लढा सर्वांना लढावा लागेल. राजकीय व्यक्ती लढे लढतील असं नाही. जनतेला आता लढावं लागेल, हा लढा पेटवून ठेवावा लागेल, असं आवाहन त्यांनी  केले. 

नरेंद्र मोदींवर टीकास्त्र...

नरेंद्र मोदींना चोर म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2014 ला सत्ता बदलात सगळ्यात मोठा हात मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांचा आहे. नोटबंदी केल्यानंतर आता नोटा रद्द केल्याची केस चालू झाली. कोर्टाने सांगितले की पंतप्रधानांपेक्षा जास्त आम्हाला अधिकार आहे. एखादी नोट चुरगळली तर कोण बदलतं तर रिझर्व्ह बँक बदलते, म्हणून पंतप्रधानांना जावं लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जरी असला तरी त्याला कायदा असतो. रिझर्व्ह बँकेला सांगून नोटा बदलाव्या लागतात आणि तोच मुद्दा सुप्रीम कोर्टने घेतला. नोटा बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. 

2024 च्या तयारीला लागा...
2024 च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे आता ज्याला मोदींना जेलमध्ये बघायचं असेल त्यांनी कामाला लागा. 2024 ला मोदी विरोधी सरकार सत्तेत येईल, कामाला लागा. त्यामुळे हे जर बदलायचं असेल तर 2024 आपल्या हातात आहे. एक तर आपण हारु किंवा ते हरतील, असा कडक इशारा यावेळी त्यांनी दिला. 

चीनला एवढं जवळ का करत आहेत? 
मोदी सरकारवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, मोदी सरकारने राफेलमध्ये पैसे खाल्ले, पूर्णपणे खाल्ले हे आम्ही म्हणत नाही. कंपनीने ऑडिटमध्ये लिहिले आहे, मिडल मॅनने पैसे घेतले. तर दुसरीकडे 56 इंचाची छाती चायनामध्ये 14 इंचाची होते.   2500 चौमी एरिया पुन्हा चायनाने घेतला आहे. मोदी आणि चायनाचं काय प्रेम आहे माहीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 pm 28 February 2025Job Majha : भारतीय डाक विभागात नोकरीची संधी, एकूण किती जागा? शैक्षणिक पात्रता काय? 28 Feb 2025Datta Gade Police Custody | नराधम दत्ता गाडेला १२ दिवसांची पोलीस कोठडी, सहमतीने शारीरिक संबंध झाल्याचा आरोपीच्या वकिलांचा दावाDatta Gade News | नराधम दत्ता गाडेला कोर्टासमोर केलं हजर, काल मध्यरात्री आरोपीला बेड्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! N आणि L विभागातील पाणीपुरवठा 15 तासांसाठी बंद
Temperature Update: उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच उष्णतेनं अंगाची लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान सूर्य आग ओकणार, हवामान विभागानं दिला इशारा 
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
तेलंगणा बोगदा दुर्घटनेतील कामगार वाचण्याची शक्यता कमीच रेल्वेचे पथकही बचावकार्यात गुंतले; 22 फेब्रुवारीपासून 8 मजूर अडकून पडले
Chhagan Bhujbal : प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
प्रत्येक माणसामध्ये पोलीस दडलेला असतो, पण आजकाल लोक फोटो काढतात अन् निघून जातात; पुण्यातील घटनेवर नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?
Indrajit Sawant : सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
सावंत माजलाय, थोड्या दिवसांचा पाहुणा, घरी जाऊन खात्मा करु; प्रशांत कोरटकर पोलिसांना अजून सापडत नसताना आता इतिहासकार इंद्रजित सावंतांना पुन्हा धमकी
Sanjay Raut : तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
तर यांना रस्त्यावर ठोकले पाहिजे; संजय राऊतांनी कदम आणि सावकारेंना फटकारलं; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनी...
Uttarakhand Badrinath Massive Avalanche : उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
उत्तराखंडमध्ये महामार्गावर हिमस्खलनात 57 मजूर अडकले; 16 मजुरांना बाहेर काढण्यात यश
Nagpur Crime News: नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल 
नागपुरातील कुख्यात गुन्हेगारांसोबतच्या इन्स्टाग्राम रिल्समध्ये गजा मारणे; सायबर पोलिसांकडून दखल, गुन्हा दाखल
Embed widget