एक्स्प्लोर

2024 ला मोदींना पायउतार करा अन् ही व्यवस्था बदला,  प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

नाशिकमध्ये धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बौद्ध अनुयायांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Prakash Ambedkar Speech: देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपला नाही, मात्र आपल्याला खासदार निवडून देण्याचा अधिकार आहे. निवडून गेलेल्याने पंतप्रधान ठरवायचा ही व्यवस्था आहे. आणि हीच व्यवस्था आता बदलायला हवी. व्यवस्थेचा भाग म्हणून खासदार निवडण्याचं काम आपलं असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले. 

नाशिकमध्ये धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बौद्ध अनुयायांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते यावेळी म्हणाले, घटनेने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आता राहणार नाही, कारण आता नवीन कायदा येत आहे. या देशात आंतरधर्मीय- आंतरजातीय लग्न समाजाने स्वीकारले आहेत. मात्र विकृती समाजात आहे, ती नाकारता येणार नाही. पण याला धरून शासन आता सामाजिक कायदा, त्या संबंधित कायदा आता गठीत होत आहे. 

सध्या देशात पंतप्रधानांच्या तोडीचा माणूसच नाही. त्यामुळेच दुर्दैवाने आपण सगळे त्याला बळी पडत आहोत. आपल्यावर बिंबवले जात आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार दुसरा नाही, आपल्या मेंदूचा ताबा घेतला जातोय. आता खासदार नका निवडू, आता पंतप्रधान निवडा. उद्या दुसरा कोणी आला, तर त्याला पंतप्रधान म्हणून निवडून देणार का? या देशात उतरंडीची व्यवस्था आहे, तो पर्यंत न्हावी, कुंभार, चांभार यांना मत देणार नाही. त्यामुळे तुमची पंतप्रधान होण्याची कायमची संधी गेली. खासदाराला निवडण्याचा अधिकार काढून घेतला जातोय. आणि तुम्हाला बंदिस्त करण्याचं काम केलं जातंय. म्हणूनच आरएसएस संविधान बदलण्याची भाषा करत असल्याचे ते म्हणाले. 

ते पुढे म्हणाले, कुठल्याही पक्षाचा प्रमुख ईडीच्या चौकशीत आहेत. राहुल गांधींना पाठीमागे उभं राहायला लावलं आणि मागे नाही राहिला तर जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जाते. मग त्याला उभं राहावंच लागेल. मी सांगेल तसं नाचा. नाही तर जेलचे दरवाजे खुले आहे. हा लढा सर्वांना लढावा लागेल. राजकीय व्यक्ती लढे लढतील असं नाही. जनतेला आता लढावं लागेल, हा लढा पेटवून ठेवावा लागेल, असं आवाहन त्यांनी  केले. 

नरेंद्र मोदींवर टीकास्त्र...

नरेंद्र मोदींना चोर म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2014 ला सत्ता बदलात सगळ्यात मोठा हात मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांचा आहे. नोटबंदी केल्यानंतर आता नोटा रद्द केल्याची केस चालू झाली. कोर्टाने सांगितले की पंतप्रधानांपेक्षा जास्त आम्हाला अधिकार आहे. एखादी नोट चुरगळली तर कोण बदलतं तर रिझर्व्ह बँक बदलते, म्हणून पंतप्रधानांना जावं लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जरी असला तरी त्याला कायदा असतो. रिझर्व्ह बँकेला सांगून नोटा बदलाव्या लागतात आणि तोच मुद्दा सुप्रीम कोर्टने घेतला. नोटा बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे. 

2024 च्या तयारीला लागा...
2024 च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे आता ज्याला मोदींना जेलमध्ये बघायचं असेल त्यांनी कामाला लागा. 2024 ला मोदी विरोधी सरकार सत्तेत येईल, कामाला लागा. त्यामुळे हे जर बदलायचं असेल तर 2024 आपल्या हातात आहे. एक तर आपण हारु किंवा ते हरतील, असा कडक इशारा यावेळी त्यांनी दिला. 

चीनला एवढं जवळ का करत आहेत? 
मोदी सरकारवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, मोदी सरकारने राफेलमध्ये पैसे खाल्ले, पूर्णपणे खाल्ले हे आम्ही म्हणत नाही. कंपनीने ऑडिटमध्ये लिहिले आहे, मिडल मॅनने पैसे घेतले. तर दुसरीकडे 56 इंचाची छाती चायनामध्ये 14 इंचाची होते.   2500 चौमी एरिया पुन्हा चायनाने घेतला आहे. मोदी आणि चायनाचं काय प्रेम आहे माहीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
Imtiaz Jaleel: मोठी बातमी: माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर? निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर? निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेलीय'; महाजन-सामंत नाशिकमध्ये असतानाच गोकुळ गीतेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
'जाहीर पाठिंबा देण्याचा विषयच येत नाही, निवडणूक खूप पुढे गेलीय'; महाजन-सामंत नाशिकमध्ये असतानाच गोकुळ गीतेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde : खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
खासदार श्रीकांत शिंदेंनाही आवरला नाही खानदेशी पुरणपोळीचा मोह; नंदुरबारमध्ये घेतला पारंपरिक चवीचा आस्वाद!
Khan Sir Coaching Class Case: खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
खान सरांना अटक करण्यासाठी पाटण्यात छापा; कायदा आणि सुव्यवस्थेवर पोलीस अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, सर म्हणाले, 'यांना माझ्या फोटोला हार घालायचा होता..'
Polymer Currency:  रिझर्व्ह बँक प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार असल्याच्या चर्चा, गव्हर्नर संजय म्हलोत्रा अपडेट देत म्हणाले...
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Embed widget