एक्स्प्लोर

Nashik Sanjay Raut : साडेतीनशे वर्षांपूर्वी दिल्लीतून संकट आलं होत, पुन्हा महाराष्ट्रावर तेच संकट आलंय, संजय राऊतांचा इशारा

Nashik Sanjay Raut : हर हर महादेवची गर्जना, हातात भवानी तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी केले.

Nashik Sanjay Raut : आपल्या महाराष्ट्रावर 350 वर्षांपूर्वी औरंगजेबाचे (Aurangajeb), अफजलखानाचे (Afjalkhan), शायिस्तेखानाचे, निजामशाहीचे संकट होते, हे संकट देखील दिल्लीवरून (Delhi) आले होते. आज तेच संकट इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रावर येत आहे. हर हर महादेव या गर्जनेसह पेटून उठून हातात भवानी तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन संजय राऊत (sanjay Raut) यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना केले.

संजय राऊत हे आज नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून सिन्नर तालुक्यातील एका मंदिराच्या सोहळ्यासाठी ते सिन्नरमध्ये आहेत. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी सुनील बागुल यांच्याबरोबर एक अनोळखी गृहस्थ माझ्याकडे आल्यानंतर माझ्यासमोर कीर्तन सुरू केले. मला म्हटले मंदिर बघण्यासाठी तुम्हाला यायलाच पाहिजे. मी कोणताही विचार न करता म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका, नक्की येईन. त्यानंतर बबन महाराजांनी आमंत्रण दिलं. या ठिकाणी आल्यावर असं वाटलं की एखाद्या पवित्र श्रद्धास्थानी आलो आहे. माझ्यावर, आमच्या पक्षावर, महाराष्ट्रावर जे संकट आले आहे, त्याला थोपवण्याची ऊर्जा, प्रेरणा या श्रद्धास्थानात असल्याचे दिसते, असे राऊत म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले की, व्यासपीठावर बसलेले अनेकजण बुवा बाबांचे भक्त आहेत. आजपासून मला अस वाटतंय की मी इथे अधूनमधून येऊन प्रेरणा घेत जाईन. उद्धव ठाकरे यांना इथं बोलवायला पाहिजे, असे आपण म्हणालात. पण आज जे संकट आहे, ते दूर झाल्यावर आम्ही सगळेच इथे येऊ, आम्हाला गुवाहाटीला जायची गरज नाही. आम्हाला तिकडे जाऊन जादूटोणा करण्याची गरज नाही, आम्हाला रेडे शोधण्याची गरज नाही, या महाराष्ट्रात माथा टेकवण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी इतकी पवित्र जागा असताना, याशिवाय दुसरी जागा दिसत नाही. ज्या संख्येने आपण इथं जमलेलो आहोत, आपण प्रत्येकाने या देवस्थानाचा अनुभव घेतलेला आहे. आज या महाराष्ट्राला कोणती गरज असेल तर बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना टिकवण्याची ते काम आपण सर्व करणार असल्याचे सांगत शिवसैनिकांना एकप्रकारे आवाहन केले. 

350 वर्षांनी महाराष्ट्रावर संकट 

यावेळी सद्यस्थितच्या राजकारणावर ते म्हणाले की ,आपल्या महाराष्ट्रावर 350 वर्षांपूर्वी औरंगजेबाचे, अफजलखानाचे, शायिस्तेखानाचे, निजामशाहीचे संकट होते, हे संकट देखील दिल्लीवरून आले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून, जाती-पातीच्या भिंती तोडून सगळे आपण मराठी आहोत, महाराष्ट्राचे आहोत म्हणून लढत राहिलो, हे हिंदवी स्वराज्य स्थापन केल. आज तेच संकट इतक्या वर्षांनी आपल्या महाराष्ट्रावर येत आहे . हर हर महादेव या गर्जनेसह पेटून उठून हातात भवानी तलवार घेऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन ठामपणे उभे राहायचे आहे, असे आवाहन संजय राऊत यांनी ठाकरे गटातील शिवसैनिकांना केले.

अमित शाहांना महाराष्ट्र कळणार नाही... 

तुम्ही कामात प्राण आणि आत्मा ओतलात, तर ते काम थांबत नाही, श्रद्धेतून निर्माण झालेली कामे असून इथं व्यापाऱ्याला स्थान नाही, अनेकदा आपण एखाद्या देवस्थानाला जागृत देवस्थान का म्हणतो तर मंदिरातील मूर्तीला लाखो लोकांनी श्रद्धेने हात लावलेला असतो. त्यातून त्या मूर्तीमध्ये जागरूकता येते. बुवाजी महाराजांचे स्थान तसेच असून हजारो लाखो लोक दर्शनासाठी येत असतात. त्यातून त्या मूर्तीमध्ये व आपल्यामध्ये ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असते. सत्ता येते सत्ता जाते, जर अशा देवस्थानाकडे लाखो लोक येतात, अशा ठिकाणी रस्ता असणे आवश्यक आहे. मात्र मी आभारी आहे, आपण मला आमंत्रण दिले, राजकारणामध्ये ऊन सावल्यांचा खेळ सुरू असतो. या मंदिराचे घुमट, कळस हाच आपला महाराष्ट्र आहे, आणि हा महाराष्ट्र अमित शहाला कळणार नाही, असा टोला यावेळी संजय राऊत यांनी लागलेला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha : 6 AM : 1JULY 2024MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Embed widget