एक्स्प्लोर

मोठा गाजावाजा करुन सुरू केलेली किसान रेल्वे गेल्या पाच महिन्यांपासून बंद, शेती मालाची वाहतूक बंद पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा नवी बाजारपेठ मिळावी या हेतून रेल्वे मंत्रालयाने  8 ऑगस्ट 2020 देवळाली रेल्वे स्थानकातून पहिली किसान रेल्वे सुरु केली होती.

नाशिक : देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा गाजावाजा करून सुरू केलेली किसान रेल्वे (Kisan Railway) मागील पाच महिन्यापासून बंद आहे.  कोळशाच्या तुटवड्याचे कारण सांगून रेल्वे बंद करण्यात आली आहे. रेल्वे बंद झाल्यानं  कोट्यवधी रुपयांची उलाढाल  ठप्प झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांच्या मालाला उठाव मिळावा नवी बाजारपेठ मिळावी या हेतून रेल्वे मंत्रालयाने  8 ऑगस्ट 2020 देवळाली रेल्वे स्थानकातून पहिली किसान रेल्वे सुरु केली होती. नाशिकसह आजूबाजूच्या गावातील, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल इतर राज्यात कमी खर्चात, कमी वेळात पुरवठा करणारी रेल्वे सुरु झाल्याने आस्मानी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. सुरवातीच्या काळात मिळालेल्या प्रतिसादानंतर आठवड्यातून एक दिवस धावणारी रेल्वे पुढे चार दिवस सुरु करण्याचा निर्णय झाला. 

दिवसाला नभुसावळ वैभागातून साधारणतः 500 टन मालाची वाहतूक केली जात होती. वाहतुकीच्या भाड्यापोटी रेल्वेला 20 लाख रुपयाचे भाडेही दररोज मिळत होते. 20 महिने शेतकरी व्यापाऱ्यांच्या प्रतिसादामुळे रेल्वे धावत होती मात्र अचानक रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आणि 13 एप्रिल 2022 पासून आजपर्यंत शेतमालाची वाहतूक करणारी रेल्वे सेवा ठप्प आहे.  उन्हाळ्याच्या दिवसात मार्च एप्रिल महिन्यात राज्यात देशात कोळशाचा तुटवडा जाणवत होता त्यावेळी कोळसा वाहतूक आणि इतर कारण सांगून रेल्वे बंद करण्यात आल्याचा आरोप नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी केलाय. आतामात्र कोळसा तुटवडा जाणवत नाही कुठेही ओरड नाही तरीही रेल्वे सुरु होत नसल्यानं नाराजी व्यक्त केली  आहे.

किसान रेल्वे नाशिकच्या देवळालीपासून बिहारच्या पटनापर्यंत जात होती तिथून आजुबाजूंच्या शहरात नाशिकसह महाराष्ट्रातील शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध होत होती. किसान ट्रेन आठवड्यातून चार दिवस देवळालीतून सुटत होती. 22 बोग्यांपैकी देवळालीला आठ, नाशिकरोडला चार, लासलागावला दोव, मनमाडला आठ राखीव होत्या. एक बोगीतून 24 टन माल जातो. एका किलोला 2.20 पैसे भाडे आहे. असे 50 हजार भाडे एका बोगीचे होते. उर्वरीत 50 हजार केंद्राचे अनुदान असते. त्यामुळे शेतक-याला फायदा व्हायचा. आता प्रवाशी गाडीतून माल पाठविण्यासाठी किलोला 6.50 रुपये भाडे मोजावे लागतात. त्यातही माल जाण्याची शास्वती नाही. किसान रेल्वेमधून दिवसाला अडीचशे पाचशे टन माल जातो तेथे प्रवाशी गाडीतून पंधरा टनच माल जातो. त्यामुले शासनाचा महसूलही बुडाला आणि  शेतकऱ्यांचे नुकसानही होत आहे. 

 राज्यातून भाजीपाला, कांदा, द्राक्षे, डाळिंब, संत्रीची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत होती. रस्ता मार्गाने वाहतूक करता किलोमागे 10 ते 12 रुपये लागायचे.  रेल्वेमुळे तोच खर्च अवघ्या चार रुपयावर आला होता त्यात दोन रुपये अनुदानही मिळत होते. म्हणजे प्रत्यक्षात शेतकऱ्याला किलोमागे दोन रुपये खर्च येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही रेल्वे वरदान ठरली होती. शेतीमाल नाशवंत असल्यानं कमी वेळात कमी खर्चात बाजार पेठ उपलब्ध होत असल्यानं शेतकऱ्यांना उत्पन्नात वाढ होत होत होती. मात्र आता बाजर भाव पडले आहेत. कांद्यासह इतर भाजीपाला शेतात खराब होत असल्याने बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करत आहे.

तीन दिवसापूर्वी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नाशिकला आले होते. त्यावेळी नाशिकच्या खासदारांनी किसान रेल्वे सुरु करण्याची मागणी केली. मात्र त्यावर अद्याप काहीच पावलं टाकली नाहीत. मुळात कोळसा तुटवडा, कोळसा वाहतूक आणि किसान रेल्वे बंद करण्याचा सबंध तरी काय असा सवाल उपस्थित होत आहे.  त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही त्यामुळे पपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेली ही ड्रीम रेल्वे पुन्हा कधी धावणार असा सवाल उपस्थित होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?

व्हिडीओ

Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील 10 महत्वाचे मुद्दे, ठाकरे बंधूंनी सगळं सांगितलं!
Raj Thackeray: कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठाय; आमची युती झालीय हे आम्ही जाहीर करतोय, मुंबईत महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार! उद्धव साक्षीने राज ठाकरेंची 'मनसे' गर्जना
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
आमचं ठरलंय नंतर आता कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं! सतेज पाटलांकडून हलगी तापवायला सुरुवात, प्रचारात 100 कोटींचे रस्तेच केंद्रस्थानी राहण्याची चिन्हे
Kalyani Komkar: 'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
'प्लिज असं नका करू, त्यांना तिकीट देऊ नका', आयुष कोमकरच्या आईचा 'तो' भावनिक VIDEO समोर, आंदेकर टोळीला पक्षाकडून तिकीट मिळणार की नाही?
Rohit Pawar: मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
मुंबईत एकत्र लढण्याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'वेट अँड वॉच'; दोन दिवसात निर्णय न झाल्यास...; रोहित पवार स्पष्टच बोलले
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
'उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे' हे भाजप-शिंदे गटाचं काम, भाजप आमदार पराग शहानं भर रस्त्यात मराठी रिक्षावाल्याला मारलं ते दिसत नाही का? संजय राऊतांचा हल्लाबोल
BlueBird Block 2 Satellite: 'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
'इस्रो'कडून आजवरचा सर्वाधिक ताकदीचा अमेरिकन 'बाहुबली' रॉकेट लाॅन्च! पृथ्वीवर कुठूनही व्हिडिओ कॉल करता येणार
Thane Mahangarpalika Election 2026: ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार, ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला
ठाकरे गट-मनसेचा ठाण्यातील जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला; ठाकरे गट 50-55, मनसे 31-34, शरद पवार गट 35-40 जागांवर लढणार
Embed widget