एक्स्प्लोर

"अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू अन् पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू" : देवेंद्र फडणवीस

Nashik News : 2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल, असे वक्तव्य de

Devendra Fadnavis नाशिक : 67 लाख टँकर आपण भरू शकतो एवढं काम झालं आहे.  हे अल निनोचे (El Nino) वर्ष आहे, अडचण येणारच, पाणी कमी आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे. 2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाशिकमध्ये केले. 

जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन टप्पा 2 अंतर्गत जलरथ उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नाशिकच्या कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा हॉल येथे पार पडला. यावेळी मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते.

700 कोटींचा जनसहभाग लाभला

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला अतिशय आनंद आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात आपले जलरथ जाणार आहे आणि याची सुरुवात नाशिकमधून होत आहे. आज मोठ्या पाणी टंचाईतून आपल्याला सामोरे जावे लागते आहे. आज कितीही खोल बोरवेल गेले तरी पाणी लागत नाही. जलसंधारणाला आपण महत्व दिले नाही. अर्ध्या महाराष्ट्रात जलसंधारणाशिवाय आपण काम करू शकत नाही.  जलयुक्त शिवारच्या पहिल्या टप्प्यात खूप मोठं काम आपण केलं. पाण्याचे सायन्स लोकांना समजले. 700 कोटींचा जनसहभाग आपल्याला लाभला, असे फडणवीस यांनी म्हटले आझे.  

अखेर आपली योजना यशस्वी

ज्यावेळेस औरंगाबाद खंडपीठात एक याचिका झाली. जलयुक्त शिवार चुकीचा आहे असे म्हणत इतर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर एक समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने मराठवाडा दौरा करून भूजल परिस्थितीची गणना केली आणि त्या अहवालात अभूतपूर्व पाणीवाढ झाल्याचे सांगितले. अखेर आपली योजना यशस्वी असल्याचे समोर आले आहे. 

बुलढाण्यात याआधी दुष्काळ पडायचा आता बागायती शेती

बुलढाण्यात याआधी दुष्काळ पडायचा तिथे आता बागायती शेती आहे. यासाठी बीजीएस, नाम तसेच रविशंकरजी यांचे विशेष योगदान आहे.  अमीर खानच्या पाणी फाउंडेशनने स्पर्धा सुरू केली आणि पाण्याबाबत खूप मोठे काम झाले आहे. हे खरं आहे की सरकार गेल्यानंतर चौकशी लावण्यात आल्या पण काहीच झाले नाही, असेही ते यावेळी म्हणाले. 

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करता येईल

 67 लाख टँकर आपण भरू शकतो एवढं काम झालं आहे.  हे अल निनोचे वर्ष आहे, अडचण येणारच, पाणी कमी आहे आणि हे एक मोठं आव्हान आहे. यावर्षी 24 हजार गावांमध्ये आपण काम करणार आहोत. गाळमुक्त आणि इतर कामे आपण करणार आहोत. 3.2 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. 267 लाख टँकर इतका पाणीसाठा आपण तयार करणार आहेत.  2023-24 या अल निनोच्या आव्हानात्मक काळात संधीत रूपांतर करू आणि पुढील पावसात थेंब न थेंब आपण साचवू, ज्यामुळे पुढे शेतकऱ्यांना मदत होईल. या स्ट्रक्चरमुळे पुढे महाराष्ट्र दुष्काळ मुक्त करता येईल, असे ते म्हणाले. 

...तर पुढे खूप फायदा होईल

पाऊस कमी पडला तर काय? विहिरींचा पुनर्भरणा केला तर पुढे खूप फायदा होईल. जलजीवन मिशनला जलसंधारणची साथ मिळणे गरजेचे आहे.  नाशिक जिल्ह्यात 40 टक्के पाऊस कमी पडला पण हे आव्हान स्वीकारून पुढे जावं लागेल, सर्व जिल्ह्यात काम करू. जलरथ अभियान यशस्वी करूयात, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Gulabrao Patil : "फडणवीस साहेब असा माणूस आहे की, आम्हाला ओढून आणलं अन् घड्याळही बंद केलं" : गुलाबराव पाटील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली

व्हिडीओ

Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
उद्धव ठाकरेंचा अमित शाहांवर पटलवार; भ्रष्टाचारी लोकांना 'पांघरुनात घेतलास तू' म्हणत फडणवीसांनाही प्रत्त्युत्तर
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
अखेर अण्णा हजारे उपोषण करणार, तारीखही ठरली; 2 वर्षे होऊनही अंमलबजावणी नाही, मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget