एक्स्प्लोर

Nashik Crime : नाशिकच्या गंजमाळ परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी, दगड फेकीत पोलीस बचावले! 

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या परिसरात दोन गटात तुंबळ (Crime) हाणामारीची घटना समोर आली आहे.

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढत असून वारंवार खुनाच्या (Murder), चोरीच्या, हाणामारीच्या घटना समोर येत आहेत. अशातच शहरातील दाटीवाटीचा परिसर असलेल्या परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना समोर आली आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) तात्काळ कुमक पाठवून तासाभरानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. 

नाशिकच्या गंजमाळ परिसरात (Nashik Ganjmal) दोन गटात तुफान हाणामारीची घटना समोर आली असून एकमेकांवर दगडफेक केल्याने काही वेळ परिसरात दहशत पसरली होती. मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस पथक पाठविले. जवळपास तासाभरानंतर हा वाद सोडविण्यात पोलिसांना यश आले. दगडफेकीची घटना आणि रस्त्यावर जमलेल्या गर्दीने वाहतुक कोंडी निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. तर दगडफेकीत एका रिक्षाचेही नुकसान झाल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर पोलिसांच्या तासाभराच्या प्रयत्नानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

नाशिक शहरातील गंजमाळ पंचशील नगर भागात दोन गटात मागील भांडणाची कुरापत काढून दोन गटात हाणामारीची घटना झाली. या हल्ल्यात दोन्ही बाजूंच्या गटांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून संशयितांचा शोध सुरू असून सात जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या राड्याने व्यावसायिकानी दुकाने त्वरित बंद केली तर परिसरात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण कायम होते. 

दरम्यान दोन्ही गटातील नागरिकांनी परस्पर विरोधी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे काही वेळ पोलीस ठाण्यात देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. किरकोळ कारणावरून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीचे दगडफेकीत रूपांतर झाले. यावेळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त तांबे, संजय बारकुंड, सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले होते. 
त्यामुळे गंजमाळसह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनांना आळा बसावा अशी मागणी .. 
दरम्यान गंजमाळ परिसरात यापूर्वी देखीलदोन गटात अनेकदा वाद झाल्याचे समोर आले आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांना आळा बसावा. यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असताना त्यांच्यासमोर संशयितांकडून मोठ्या प्रमाणावर वाद घालत एकमेकांवर दगडफेक केली जात असल्याने पोलिसांना काही काळ सुरक्षित जागेवर जावे लागले.  भद्रकाली पोलिसांनी दोन्ही गटातल्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare :'डॉ. Neelam Gorhe मातोश्रीवर पडीक असायच्या, सर्वात जास्त कमाई त्यांनीच केली असावी'Ambadas Danve On Neelam Gorhe : ही नीलम गोऱ्हेंची नमकहरामी, आरोपानंतर दानवेंची सडकून टीकाNeelam Gorhe on Uddhav Thackeray : दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्या की एक पद, गोऱ्हेंचा ठाकरेंवर आरोप!Budget Session : 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, 10 मार्चला अजित पवार मांडणार अर्थसंकल्प

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Telangana Tunnel Accident : तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
तेलंगणा बोगदा दुर्घटना, 8 मजुरांसाठी बचाव कार्य सुरू सुरुच; हाक दिली, पण प्रतिसाद नाही, पाणी चिखल काढण्यासाठी हेव्ही पंप मागवला
Old kasara Ghat : मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
मुंबई-नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सहा दिवस जुना कसारा घाट बंद, पर्यायी मार्ग कोणता?
Jitendra Awhad : त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
त्यावेळी दुसर्‍याच दिवशी अपात्रतेची अधिसूचना काढली! जितेंद्र आव्हाडांनी राहुल नार्वेकरांना इतिहासाची आठवण करून लिहिलं पत्र
Bacchu Kadu: ...तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
....तर कोणाचाही पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, पण लाचारी आमच्यात नाही; बच्चू कडू स्पष्टच बोलले, काँग्रेस- भाजपवरही 'प्रहार'   
Nashik Crime : सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
सोनाराच्या दुकानात तिघांकडून दिवसाढवळ्या दरोडा, टोळीचा म्होरक्या हरियाणात लपल्याची टीप, नाशिक पोलिसांचे पथक पोहोचले अन्...
Shashi Tharoor on Congress : जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
जिथं अज्ञानात आनंद मिळतो, तिथं शहाणपणा दाखवणं मूर्खपणाचं लक्षण! काँग्रेस आणि शशी थरुरांमध्ये चाललंय तरी काय?
Jitendra Awhad : सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
सुनील केदार, राहुल गांधींना एक न्याय, सत्ताधारी माणिकराव कोकाटेंना वेगळा न्याय का? जितेंद्र आव्हाड आक्रमक
National Education Policy : काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
काल कमल हसन म्हणाले, लोकांनी तमिळ भाषेसाठी लोकांनी जीव दिलाय, खेळ करू नका; आता सीएम स्टॅलिन म्हणाले, 'केंद्र सरकारने 10 हजार कोटी दिले तरी...'
Embed widget