एक्स्प्लोर

ABP Majha Exclusive : अयोध्या विमानतळावर नाशिकच्या कलावंतांचा कलाविष्कार; 305 फुटांच्या कॅनव्हास पेंटिंगची देशभरात चर्चा

Exclusive Nashik News : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याकडे देशभराचे लक्ष लागले आहे. अयोध्या विमानतळावर 305 फूट भव्य कॅनव्हास पेंटिंग साकारली आहे.

Exclusive Nashik News : अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या भव्य लोकार्पण सोहळ्याकडे संपूर्ण देशभराचे लक्ष लागले आहे. अयोध्यानगरी राममय झाली असून नुकतेच उद्घाटन झालेले महर्षी वाल्मिकी विमानतळही अनोख्या वास्तुकलेमुळे देशभरात चर्चेत आहे. विमानतळामध्ये भिंतीवरील दर्शनी भागात साकारण्यात आलेली 305 फूट भव्य आणि सुंदर अशी रामाच्या जीवनचरित्रावर आधारित कॅनव्हास पेंटिंग सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

विशेष म्हणजे ही कलाकृती साकारणारे हात हे मराठी आहेत. नाशिकच्या आनंद सोनवणे (Anand Sonawane), विवेक सोनवणे (Vivek Sonawane), प्रवीण वाघमारे (Pravin Waghmare) आणि सचिन कालूस्कर (Sachin Kaluskar) या चारही मराठी कलाकारांनी जवळपास आठ महिने मेहनत घेत कलामकारी आणि पट्टाचित्र शैलीतून हा कलाविष्कार तयार केला आहे. 

रामायणातील जीवनपट उलगडणार

रामाच्या जन्मापासून ते रावण दहन करून राम अयोध्येत परतल्यानंतरच्या क्षणापर्यंतचे सर्व काही प्रसंग दाखवण्याचा त्यांनी १४ विभागातून हुबेहूब प्रयत्न केला आहे. तसेच दुसऱ्या भिंतींवर हनुमानाच्या जीवनचरित्रावर आधारित कॅनव्हास पेंटिंग देखील त्यांनी साकारली आहे. 

अयोध्येत सेवा करण्याची संधी मिळणं हे आमचे भाग्य

हे सर्व काही सोपं नव्हतं, प्रत्येक पेंटिंगच्या छोट्या छोट्या गोष्टींवर अगदी पंतप्रधान कार्यालयापासून ते अयोध्या मंदिर संस्थानचे लक्ष होते असे हे कलाकार सांगतात. श्रीरामांच्या अयोध्येत सेवा करण्याची संधी मिळणं हे आमचे भाग्य आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा स्वतः आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर या पेंटिंगचे फोटो टाकले तेव्हा खूप समाधान वाटले, आनंद झाला अशी भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केली आहे. 

काम करण्यासाठी उर्जा मिळाली

यावेळी आनंद सोनवणे म्हणाले की, अनुभव हा अतिशय सुंदर होता. अयोध्येच नाव आज जगभरात पोहोचले आहे. प्रभू श्रीरामाच्या जन्मभूमीत आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाल्याने आम्हाला सर्वांनीच शाब्बासकी दिली. यामुळे काम करण्यासाठी उर्जा मिळाली. मात्र आपण हे काम पूर्ण करू शकू की नाही याबाबत भीती देखील वाटली होती. आम्ही हे काम अखेर पूर्ण केले. 

अशी झाली निवड

भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून साधारण 7 ते  8 गटांना कामाचे विभाजन करण्यात आले होते. त्यांनी आम्हाला विचारले की, तुम्ही कोणत्या प्रकारचे डिझाईन देऊ शकतात. त्यानंतर आम्ही त्यांना आमच्याकडील डिझाईन सादर केली. डिझाईनची प्रक्रिया सुमारे सात ते आठ महिने चालली. पंतप्रधान कार्यालय, राम मंदिर ट्रस्ट, अयोध्येतील महंत यांच्याकडून सहमती आल्यानंतर आम्हाला मंत्रालयातून फोन आला की तुमचे डिझाईन निवडण्यात आले आहेत.  त्यानंतर डिझाईनमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले. अत्यंत बारकाईने हे काम केले गेले.  

अन् साकारली 305 फूट भव्यदिव्य कॅन्व्हास पेंटिंग

विवेक सोनवणे म्हणाले की, आपण अयोध्या विमानतळावर गेल्यावर लगेचच समोर 305 फूट भव्यदिव्य अशी श्री रामाच्या जीवनचरित्रावर आधारित कॅनव्हास पेंटिंग दिसेल. या मध्ये आम्ही 14 विभाग केले आहेत. रामाच्या जन्मापासून ते रावण दहन करून राम अयोध्येत परतल्यानंतरच्या क्षणापर्यंतचे पेंटिंग येथे रेखाटण्यात आले आहे. अयोध्या हे एक धार्मिक शहर म्हणून आता विकसित होत आहे. त्यामुळे भारतीय पौराणिक कथांचा अभ्यास करून आम्ही हे पेंटिंग साकारले आहे.

आणखी वाचा 

Uddhav Thackeray : 22 जानेवारीला नाशकातील काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार : उद्धव ठाकरे

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget