एक्स्प्लोर

‘त्या’ प्रश्नावर उद्धव ठाकरे भडकले!

एका दिवसाच्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली. याचविषयी सवाल उपस्थित केल्यानं उद्धव ठाकरेंना मात्र भलताच राग आला.

  मुंबई : 25 वर्षापासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. तरीही प्रत्येक पावसात मुंबई पाण्याखाली जाते. मुंबईकरांची दैना होते. लोकांचा जीव जातो आणि काही लोक बेपत्ताही होतात. अर्थात हे सगळं होऊ नये म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. नालेसफाई, रस्तेदुरुस्ती केली जाते. तरीही यावर्षी काल एका दिवसाच्या पावसात मुंबई पाण्याखाली गेली. याचविषयी सवाल उपस्थित केल्यानं उद्धव ठाकरेंना मात्र भलताच राग आला. ‘मुंबईत नीट कामं झाली आहेत. आता तुम्ही फक्त पावसाला येऊ नको असं सांगा’, असं अजब उत्तर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं. उद्धव ठाकरेंचा पारा का चढला? प्रश्न : पाऊस जास्त पडल्यानं मुंबई पाण्याखाली गेली? हेच उत्तर किती वेळा ऐकायला मिळणार आहे? उद्धव ठाकरेंचं उत्तर : तुम्ही पाऊस थांबवा, तुम्ही पाऊस थांबवा... हेच उत्तर आहे. मग तुमचा उपाय सांगा, पाऊस कसा थांबवायचा?, आम्ही काय केलं ते मी सांगतो. तुम्ही असं समजू नका की, मुंबईचा ठेका तुम्ही घेतलेला आहे. हे कृपा करुन समजू नका. आम्ही सुद्धा जनतेला बांधिल आहोत. तुम्ही म्हणजे जनता असं समजू नका. जनतेची सेवा करतो म्हणूनच जनतेनं वारंवार आम्हाला आशीर्वाद दिले आहेत. जनतेची सेवा कशी करायची आहे ती आम्ही करतो आहोत. असं अजिबात समजू नका की, आमचा आणि जनतेचा अजिबात संपर्क नाही. तुमच्याही पेक्षा जास्त आमच्या शिवसैनिकाचा संपर्क जास्त आहे. तो काल जेवढा घराघरात गेला तेवढे तुम्ही गेले नव्हतात. दरम्यान, नेहमीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी त्याला तोंड देण्यासाठी पालिकाही सज्ज नाही, हे वास्तव उद्धव ठाकरेंना पचलेलं दिसत नाही. काल (मंगळवार) मुसळधार पावसानं मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. त्यामुळे जवळजवळ संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. याचबाबत आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी पत्रकार परिषद घेतली. VIDEO : संबंधित बातम्या : काल मुंबईवर 9 किलोमीटर उंचीचा ढग होता : उद्धव ठाकरे मुंबईत पावसाची उघडझाप सुरुच, लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर LIVE : मुंबईचा पाऊस; रस्ते, रेल्वे ट्रॅफिक अपडेट्स महापौर म्हणतात, मुंबईच्या अवस्थेला एकटी महापालिका जबाबदार नाही! 26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य? 26 जुलै 2005 आणि 29 ऑगस्ट 2017- काय फरक, काय साम्य? मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू मुंबईच्या पावसाचे 3 बळी, विक्रोळीत 2 घरं कोसळून तिघांचा मृत्यू
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Police Transfer : महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
महाराष्ट्र पोलीस दलात मोठा फेरबदल; IPS शिवाजी राठोड, विनिता साहू यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
कॉकरोच जनता पार्टीवर पहिली कारवाई; प्रचंड लोकप्रियतेनंतर सोशल मीडियावर नेमकं काय घडलं?
Raj Thackeray 2008 Railway Protest Case: 2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?
2008 च्या रेल्वे भरती आंदोलनप्रकरणी राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता; कोर्टाने निकाल देताच काय केलं?
Bandra Railway Station Demolition: वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक
वांद्र्यात अनधिकृत झोपड्यांवर कारवाई सुरु असताना पुरुषांसह महिलांकडून दगडफेक; पोलिसांकडून 15 जणांना अटक

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipake : अभिजीतने चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
चळवळ थांबवावी, राजकारणात जाऊ नये, भारतात येऊन नोकरी करावी, अभिजीतच्या चिंतेनं आई-वडील गहिवरले
Vidhan Parishad Election : परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक, उमेदवाराचा स्थानिक विरुद्ध बाहेरील मुद्दा चर्चेत 
LIC : गुड न्यूज, एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
एलआयसीला चौथ्या तिमाहीत 23467 कोटी रुपयांचा नफा, शेअरधारकांना प्रतिशेअर 10 रुपयांचा लाभांश जाहीर
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
'राजकारणात आहात तर मग...' भाजपवासी झालेल्या खासदार राघव चड्ढांना दिल्ली हायकोर्टाचा तगडा झटका! प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Bank Layoff: कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
कर्मचारी कपातीचं वारं बँकिंग क्षेत्रातही, 7000 नोकऱ्या संपवण्याचा 'या' बँकेचा निर्णय, एआय आणि रोबोटची मदत घेणार
Cockroach Janta Party : कॉकरोच जनता पार्टीचे नवे एक्स अकाऊंट सुरु, अभिजीत दीपकेची माहिती, योगेंद्र यादव यांचं CJP बद्दल मोठं वक्तव्य
2 लाख फॉलोअर्स असलेलं एक्स अकाऊंट बंद, अभिजीत दीपकेकडून CJP चं नवं खातं सुरु
Cockroach Janta Party: धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची पहिली राजकीय मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
 धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, कॉकरोच जनता पार्टीची मागणी, नव्या एक्स खात्यावर चार शब्दांची पोस्ट
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
जागतिक पातळीवर पंतप्रधान 'रिजेक्ट माल' ठरतायेत, त्यांच्यामुळं भारताची मान शर्मेनं खाली, नाना पटोलेंचा हल्लाबोल 
Embed widget