एक्स्प्लोर

आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेतली असताना आजोबा या वयात का चढले बोहल्यावर

आयुष्यभर ब्रम्हचारी राहणार असल्याची शपथ घेणारे ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील हे 66व्या वर्षी बोहल्यावर चढले आहेत. मात्र, त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला? हे आम्ही जाणून घेतला.

नवी मुंबई : तरुणपणी साखरपुडा मोडला म्हणून आयुष्यभर लग्न न करता ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटील यांनी अखेर 66व्या वर्षी लग्न केलं. आयुष्यभर लग्न कर म्हणून मागे लागलेल्या नातलगांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या माधव पाटील यांचे कोरोनाने डोळे उघडले. फक्त स्वतःचाच विचार न करता अर्धांगिनीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून ज्या आजोबांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची टिंगल टवाळीही केली जात आहे. शेरोशायरी करून लग्न केलेल्या आजोबांची टर उडवली जात आहे. त्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माधव पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता करतात. रायगड मधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, म्हातारपणी लग्न केल्यामुळे ते आणखीचं प्रसिद्ध होत आहेत.

..अन् आयुष्यभर अविवाहित राहण्याची निर्णय आयुष्यभर लग्नच न करणाऱ्या माधव पाटलांनी वयाच्या 66व्या वर्षी का लग्न केले असेल, याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माधव पाटील यांचे वयाच्या तिशीत लग्न ठरले होते. साखरपुढाही वाजत गाजत झाला होता. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि झालेला साखरपुढा मोडला. यानंतर मात्र लग्न या व्यवस्थेवरील विश्वास उडालेल्या माधव पाटील यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. वय वाढत होतं, घरात एकूलता एक मुलगा होता. घरात सूनबाई येईल, कामाला हातभार लागेल, खानदानाला वारस मिळेल, अशा सर्व प्रकारे माधव पाटलांना सांगूनही ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. अखेर कोरोनाने माधव पाटलांचे डोळे उघडले.

..म्हणून माधव पाटील या वयात बोहल्यावर

घरात गेली 7 महिने काढणाऱ्या माधव पाटलांना एकांत खाऊ लागला. सहचारीनी असावी अशी भावना त्यांना जाणवू लागली. आईचे वय 88 वर्ष, स्वतःचे वय 66 वर्ष. त्यामुळे घरात सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे अखेर माधव पाटील यांनी 66व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संजना यांच्याशी पहिलेच लग्न झाले असले तरी संजना यांचे दुसरे लग्न आहे. घटस्पोटीत असलेल्या संजना यांचे वय 45 असून त्यांच्या माहेरी भावाचे कोरोनाने निधन झाल्याने आधार हारपला होता. त्यांनाही उतार वयात आधाराची गरज असल्याने आपल्या पेक्षा 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजोबांच्या वयातील व्यक्तीशी लग्न का करतेस याबाबत त्यांना नातेवाईक, मित्रमंडळी यांनी हिनवले. पण त्यांनी याची परवा न करता उतार वयात साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली.

सोशल मीडियावर सध्या टिकेचे, टिंगल-टवाळीचे, मजाक-मस्तीचे कारण झालेल्या माधव पाटील आणि संजना पाटील यांना त्याची परवा नाही. समाजासाठी 35-40 वर्ष खर्च करून पत्रकारीता, समाजकारण, राजकारण करून शेवटी पदरात टिकाच पडत असेल तर ती झेलायला समर्थ असल्याचे माधव पाटील सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update School Holiday :  हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget