एक्स्प्लोर

आयुष्यभर ब्रम्हचारी राहण्याची शपथ घेतली असताना आजोबा या वयात का चढले बोहल्यावर

आयुष्यभर ब्रम्हचारी राहणार असल्याची शपथ घेणारे ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील हे 66व्या वर्षी बोहल्यावर चढले आहेत. मात्र, त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला? हे आम्ही जाणून घेतला.

नवी मुंबई : तरुणपणी साखरपुडा मोडला म्हणून आयुष्यभर लग्न न करता ब्रम्हचारी राहिलेल्या माधव पाटील यांनी अखेर 66व्या वर्षी लग्न केलं. आयुष्यभर लग्न कर म्हणून मागे लागलेल्या नातलगांचे न ऐकता आपल्या निर्णयावर ठाम राहिलेल्या माधव पाटील यांचे कोरोनाने डोळे उघडले. फक्त स्वतःचाच विचार न करता अर्धांगिनीच्या कुटुंबालाही माधव पाटील यांनी न्याय दिला आहे.

गेल्या महिनाभरापासून ज्या आजोबांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांची टिंगल टवाळीही केली जात आहे. शेरोशायरी करून लग्न केलेल्या आजोबांची टर उडवली जात आहे. त्या आजोबांच्या वयाच्या असलेल्या माधव पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केला. उरण तालुक्यातील बामणडोंगरी गावात राहणारे माधव पाटील गेल्या 35 वर्षांपासून पत्रकारिता करतात. रायगड मधील ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, म्हातारपणी लग्न केल्यामुळे ते आणखीचं प्रसिद्ध होत आहेत.

..अन् आयुष्यभर अविवाहित राहण्याची निर्णय आयुष्यभर लग्नच न करणाऱ्या माधव पाटलांनी वयाच्या 66व्या वर्षी का लग्न केले असेल, याबाबत आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. माधव पाटील यांचे वयाच्या तिशीत लग्न ठरले होते. साखरपुढाही वाजत गाजत झाला होता. मात्र, कुठेतरी माशी शिंकली आणि झालेला साखरपुढा मोडला. यानंतर मात्र लग्न या व्यवस्थेवरील विश्वास उडालेल्या माधव पाटील यांनी लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. वय वाढत होतं, घरात एकूलता एक मुलगा होता. घरात सूनबाई येईल, कामाला हातभार लागेल, खानदानाला वारस मिळेल, अशा सर्व प्रकारे माधव पाटलांना सांगूनही ते लग्नासाठी राजी झाले नाहीत. अखेर कोरोनाने माधव पाटलांचे डोळे उघडले.

..म्हणून माधव पाटील या वयात बोहल्यावर

घरात गेली 7 महिने काढणाऱ्या माधव पाटलांना एकांत खाऊ लागला. सहचारीनी असावी अशी भावना त्यांना जाणवू लागली. आईचे वय 88 वर्ष, स्वतःचे वय 66 वर्ष. त्यामुळे घरात सांभाळणारे कोणीतरी असावे. याची जाणीव झाली. यामुळे अखेर माधव पाटील यांनी 66व्या वर्षी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी संजना यांच्याशी पहिलेच लग्न झाले असले तरी संजना यांचे दुसरे लग्न आहे. घटस्पोटीत असलेल्या संजना यांचे वय 45 असून त्यांच्या माहेरी भावाचे कोरोनाने निधन झाल्याने आधार हारपला होता. त्यांनाही उतार वयात आधाराची गरज असल्याने आपल्या पेक्षा 20 वर्ष वयाने मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजोबांच्या वयातील व्यक्तीशी लग्न का करतेस याबाबत त्यांना नातेवाईक, मित्रमंडळी यांनी हिनवले. पण त्यांनी याची परवा न करता उतार वयात साथ देण्यासाठी लग्नगाठ बांधली.

सोशल मीडियावर सध्या टिकेचे, टिंगल-टवाळीचे, मजाक-मस्तीचे कारण झालेल्या माधव पाटील आणि संजना पाटील यांना त्याची परवा नाही. समाजासाठी 35-40 वर्ष खर्च करून पत्रकारीता, समाजकारण, राजकारण करून शेवटी पदरात टिकाच पडत असेल तर ती झेलायला समर्थ असल्याचे माधव पाटील सांगतात.

महत्त्वाच्या बातम्या

Raigad News : कोकणात जाताय? मग सावधान! पावसामुळे रायगडची नाकाबंदी, दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग 30 तासांपासून बंद
कोकणात जाताय? मग सावधान! पावसामुळे रायगडची नाकाबंदी, दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग 30 तासांपासून बंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा

व्हिडीओ

Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget