एक्स्प्लोर

ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती योजनेच्या जनजागृतीचं काय झालं? हाय कोर्टाचे पालिकेला उत्तर देण्याचे निर्देश

महानगरपालिकेने ओला आणि सुका कचरा विभाजनासोबत त्यातून खत निमिर्तीची योजना सुरु केली खरी मात्र त्याबाबतची जनजागृती करण्यास महापालिकेचे अधिकारी विसरल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मुंबई : महानगरपालिकेने ओला आणि सुका कचरा विभाजनासोबत त्यातून खत निमिर्तीची योजना सुरु केली खरी मात्र त्याबाबतची जनजागृती करण्यास महापालिकेचे अधिकारी विसरले. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत पालिकेला त्याबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. पालिकेनं या योजनेसंदर्भात जनजागृती करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास मुंबईच्या डंम्पिग ग्राउंडवरील कचऱ्याचा भार कधीच कमी होणार नाही आणि आपण एका चांगल्या योजनेपासून वंचित राहू, असे मत हायकोर्टाने यावेळी नोंदवले. 2017 मध्ये पालिकेच्या वतीने 2000 चौरस मीटर क्षेत्रफळ असलेली व्यावसायिक हॉटेलं, मॉल आणि गृह संकुलांसाठी काही नियम बनवले होते. त्यानुसार त्यांच्याच इमारतीत जमणारा सुका आणि ओल्या कचऱ्याची विभागणी करून त्यातील ओल्या कचऱ्याच्या विघटनाद्वारे खत निर्माण करण्याची योजना जाहीर करण्यात आली होती. परंतु, या नियमाबाबत पालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची जनजागृती केली नसल्याचा आरोप करत मुंबईतील रहिवासी अपराजिता अय्यर यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. सोमवारी या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. पालिकेने राबवलेली प्रक्रिया ही योग्य असूनही त्याबाबत योग्य जनजागृती केली नसल्यामुळे मुंबईतले नागरिक त्यापासून अनभिज्ञ आहेत. योजना योग्य रितीने राबविण्यासाठी जनजागृतीसोबतच पालिका अधिकाऱ्यांनी सोसायट्यांमध्ये जाऊन या योजनेबाबत आणि खत बनवण्याच्या प्रक्रियेबाबत नागरिकांना माहिती करून देणे आवश्यक असल्याचेही याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडताना सांगतिले.

महत्त्वाच्या बातम्या

मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
मानखुर्द परिसरात झोपडपट्टी कोसळली, ढिगाऱ्याखाली सापडलेल्या सहा जणांचा मृत्यू, तर काहीजण जखमी
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
वादळी वाऱ्यासह मुसळधार पावासाचा इशारा, मुंबईसह ठाण्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन 
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
धक्कादायक! कचरा फेकण्यासाठी गेला, पाय घसरुन नदीत पडला, भिवंडीत कामवारी नदीत बुडून 10 वर्षीय मुलाचा मृत्यू
मुंबईत पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यामुळं 250 हून अधिक झाडे उन्मळून पडली, दोन जणांचा मृत्यू
मुंबईत पावसाचा हाहाकार! वादळी वाऱ्यामुळं 250 हून अधिक झाडे उन्मळून पडली, दोन जणांचा मृत्यू

व्हिडीओ

Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर
Coffee With Kaushik Sachin Ahir : ठाकरेंना का सोडलं? सचिन अहिरांचे मोठे खुलासे!
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget