एक्स्प्लोर

महायुती सरकारचे नालेसफाई आणि रस्त्यावरील खड्ड्यांचे दावे खोटे, कोट्यवधी रुपये महायुतीच्या नेत्यांच्या खिशात : वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad : मुंबई शहराच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली पैशांची उधळपट्टी केली असून मुंबईकर मात्र पायाभूत सुविधांपासून वंचितच असल्याचा आरोप खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. 

मुंबई : मुंबई तुंबणार नाही असा दावा महायुती सरकारने यावेळीही केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नालेसफाईची पाहणी केली होती पण पहिल्याच पावसाने सरकारचा दावा खोटा ठरवला. आजही अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी शिरते. जी अवस्था नालेसफाईची तीच रस्त्यावरील खड्ड्यांची आहे. मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही असा दावा सरकारने केला पण मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. फक्त कंत्राटदारांचे खिसे भरून मलई खाण्यात महायुती सरकार व्यस्त असून सर्वसामान्य मुंबईकरांचे महायुती सरकारला काहीही देणेघेणे नाही, असा प्रहार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

मुंबईकरांना भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी  खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई न्याय यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जात आहे. बुधवारी ही न्याय यात्रा सायन कोळीवाडा मतदारसंघातून निघाली. सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघातही समस्यांचा डोंगर पहायला मिळाला. या भागात महानगरपालिकेचे सायन हॉस्पिटल आहे पण हॉस्पिटलमध्ये पुरेसे बेड्स उपलब्ध नाहीत. एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार करावे लागतात अशी परिस्थिती आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

नालेसफाई व्यवस्थित झाली नसल्याने झोपडपट्टीत पाणी शिरते तर पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण फिरावे लागते. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. बेस्ट सेवा डबघाईला आली आहे, रस्त्यावरच बस बंद पडतात तर काही वेळेस बस येतही नाहीत. रेशनवर धान्यही मिळत नाही. नालेसफाई व्यवस्थित झालेली नसल्याने झोपडपट्टीत भागात पाणी तुंबते. शौचालये व ड्रेनेज सिस्टिम नसल्याने सेफ्टी टँकमधील घाण गटारात सोडली जाते ज्यातून दुर्गंधी पसरते. या भागातील लोक सोयीसुविधापासून आजही वंचित आहेत. मुंबई महापालिकेतील पैसा सर्वसामान्य मुंबईकरांच्या विकासासाठी खर्च केला जात नाही तर सुशोभिकरणाच्या नावाखाली उधळपट्टी केली जाते, असे प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.

मुंबई काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या न्याय यात्रेत खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नसिम खान, आमदार भाई जगताप, चरण सपरा, रवी राजा, मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश यादव, महासचिव संदीप शुक्ला, तुषार गायकवाड, जिल्हा अध्यक्ष हुकुमराज मेहता, कचरू यादव, ललिता यादव, सुफियान वणु, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, रमेश कांबळे, नवीन शिलववंत, अमित शेट्टी व ईतर नेते आणि पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Sandeep Deshpande On Santosh Dhuri: बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
बाळा नांदगावकर बडवा-कटकारस्थानी, संतोष धुरींचा आरोप; संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget