एक्स्प्लोर

माहुलवासियांच्या समस्या कमी करण्यासाठी उपाययोजना सुरु, राज्य सरकारचं न्यायालयात आश्वासन

सध्या पुनर्वसनाला जागाच उपलब्ध नाही म्हणून तिथं घाटकोपरमधील पालिकेची कारवाईही बंद आहे. उद्या पुन्हा बाकिच्यांचंही पुनर्वसन व्हयचं आहे, त्यांच काय? या शब्दांत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली.

मुंबई : माहुलवासियांच्या हालअपेष्टा लवकरच कमी होतील, असं आश्वासन राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात दिलं आहे. घाटकोपर पाईपलाईनवरील कारवाईनंतरच्या पुनर्वसनात माहुलवासिय झालेल्यांच्या बाबतीत आयआयटी मुंबईनं दिलेल्या अहवालाची दखल घेत तिथं इमारतींची दुरुस्ती, सांडपाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधेची कामं तातडीनं हाती घेतली आहेत. त्याचबरोबर एचपीसीएल आणि बीपीसीएल या नजीकच्या पेट्रोकेमिकल्स प्लांटमधून निघणाऱ्या घातक वायूचं उत्सर्जन कमी करण्यासाठी त्यांना परदेशी बनावटीची अद्ययावत यंत्रणा बसवण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच हा आयआयटीचा अंतिम अहवाल नसल्याचंही यावेळी विशेष सरकारी वकील गिरीष गोडबोले यांनी कोर्टाला सांगितंल. मात्र तरीही जर पर्यायी निवारा हवा असेल तर माहीम चर्च शेजारी 120 चौ. फुटांची 'अर्ध पक्की' घरं किंवा 843 रूपये मासिक भाडं स्वीकारण्याचा राज्य सरकारकडून पर्याय ठेवण्यात आला आहे. यावर याचिकाकर्त्यांनी आम्ही भाडं स्वीकारण्यास तयार आहोत, मात्र मुंबईसारख्या ठिकाणी 843 रूपयांच्या मासिक भाड्यात घर कुठे मिळतं? तेही प्रशासनानं सांगावं. आम्ही उद्याच्या उद्या तिथं जाऊन ताबा घेऊ, असं उत्तर दिलं आहे. यावर माहिमच्या पर्यायाबद्दलही माहुलवासियांनी नाराजी व्यक्त करत आमचं घाटकोपरमध्येच पुनर्वसन करावं अशी कोर्टात मागणी केली. यावर मात्र न्यायमूर्ती अभय ओक यांनी याचिकाकर्त्यांच्या वकीलांची चांगलीच खरडपट्टी काढली. मुंबईसारख्या ठिकाणी तिथल्या तिथं कुठल्याही प्रकल्पबाधितांचं पुनर्वसन शक्य नाही, हे आम्ही वारंवार बजावलं आहे. तरी जर तुम्ही तोच युक्तिवाद करणार असाल तर मग आम्हीही हे प्रकरण त्याच दृष्टीनं हाताळू, असे कोर्टाने म्हटले आहे. माहुलमध्ये तुमचं स्थलांतर करण्याआधीपासून तिथं अनेक लोकं ही स्वेच्छेनं राहत आहेत. पेट्रोकेमिकल्स प्लांट हे नजीकच्या काळात आलेत. तुमच्यावर तिथं राहण्याची जबरदस्ती केली गेली आणि प्रदुषणाची गंभीर समस्या आहे. म्हणून आम्ही तुमचं म्हणणं ऐकून घेतोय. एक प्रदुषणाचा विषय सोडला तर माहुलमध्ये काय समस्या आहे?, पाईपलाईनवरील झोपड्यांच्या बदल्यात तुम्हाला पक्की 225 चौ. फुटांची घरं मिळतायत याचाही विचार करा. सध्या पुनर्वसनाला जागाच उपलब्ध नाही म्हणून तिथं घाटकोपरमधील पालिकेची कारवाईही बंद आहे. उद्या पुन्हा बाकिच्यांचंही पुनर्वसन व्हयचं आहे, त्यांच काय? या शब्दांत हायकोर्टानं याचिकाकर्त्यांची कानउघडणी केली. आयआयटी मुंबईनं हायकोर्टात सादर केलेल्या अहवालात माहुलवासियांच्या हालअपेष्टांची यादीच आपल्या अहवालातून सादर केली आहे. तसेच या सर्वांची तातडीनं सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करणं हाच एकमेव पर्याय असल्याचा निष्कर्ष काढला आहे. यावर राज्य सरकारनं आयआयटीच्या या अहवालावर आपलं उत्तर हायकोर्टात सादर केलं. जनहित मंचतर्फे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या सुरक्षेसंदर्भात याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर निर्धारीत क्षेत्रातील सर्वच्या सर्व झोपड्या तोडण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. घाटकोपरनजीक पाईपलाईनच्या परिसरात घरं गमावलेल्यांना माहुलशिवाय पर्याय नाही अशी माहिती राज्य सरकारनं दिली आहे. मात्र प्रदुषणाच्या मुद्द्यावरून इथल्या रहिवाश्यांनी माहुलऐवजी इतरत्र घरं देण्याची मागणी करत हायकोर्टात धाव घेतली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Embed widget