एक्स्प्लोर

आजपासून केंद्र सरकारच्या 'या' कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आता दररोज 350 लोकलच्या सेवा चालवणार आहेत. या लोकल केवळ जलद लोकलच्या स्थानकांवरच थांबतील.

मुंबई : मुंबई लोकलमध्ये आता केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकत्रितपणे यासंदर्भातली माहिती दिली आहे. यासोबत दोन्ही मार्गांवर आता एकूण 700 लोकल गाड्यांच्या सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 1 जुलैपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील ट्रॅफिकमधून वाट काढत प्रवास न करता लोकलने प्रवास करता येणार आहे.

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी रविवारी (28 जून) ट्वीट करुन केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र रेल्वे अधिकार्‍यांकडे यासंदर्भात कोणतीही माहिती नव्हती. त्यानंतर समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्रालयाने एका पत्राद्वारे राज्य सरकारला हे आदेश दिले होते. मात्र या कर्मचाऱ्यांना परवानगी देण्याच्या आधी रेल्वे प्रशासनाला पूर्वतयारी करणे देखील आवश्यक होते. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार अशा दोन्ही दिवशी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी यांच्यात बैठका झाल्या. नक्की किती वाढीव प्रवासी प्रवास करणार आहेत याची माहिती रेल्वेने राज्य सरकारकडे मागितली होती. राज्य सरकारने ही माहिती गोळा करुन रेल्वेला दिल्यानंतर केंद्र सरकारच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली.

केंद्र सरकारच्या कोणत्या विभागातील कर्मचाऱ्यांना परवानगी

केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणारे कर्मचारी, इन्कम टॅक्स विभाग, जीएसटी विभाग, कस्टम विभाग, भारतीय पोस्ट, राष्ट्रीयीकृत बँका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, न्याय विभाग आणि राजभवनातील कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच संरक्षण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. त्यामुळे नक्कीच लोकलने प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. या सर्व प्रवाशांना आपले ओळखपत्र दाखवून रेल्वे स्थानकांमध्ये प्रवेश दिला जाईल.

दुसरीकडे प्रवाशांची संख्या वाढल्याने पश्चिम आणि मध्य रेल्वेला देखील आपल्या लोकल गाड्यांच्या फेऱ्यांची संख्या वाढवावी लागत आहे. याआधी मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वेवर मिळून 200 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जायच्या. मात्र आता त्या वाढवून थेट 350 लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येतील. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर 202 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जायच्या, त्यात देखील वाढ करुन आता 350 लोकलच्या फेऱ्या एका दिवसात चालवल्या जातील. या सर्व लोकल केवळ जलद लोकलच्या स्थानकांवर थांबतील. स्थानकात येणाऱ्या प्रत्येकाला एकमेकांपासून सुरक्षित अंतर ठेवावे लागेल. तिकीट काऊंटरवर देखील सुरक्षित अंतर ठेवून तिकीट किंवा पास काढावे लागतील. सामान्य नागरिकांना अजूनही लोकल प्रवास करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांनी स्थानकात जाऊ नये आणि गर्दी करु नये, असं आवाहन मध्य आणि पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget