पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडांची कत्तल, मनसेची महापालिका आयुक्तांकडे तक्रार
जाहिरातीच्या होर्डिंगला अडथळा निर्माण होतो म्हणून अवैधरित्या झाडं कापल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातच ही कत्तल झाल्याचं मनसेनं म्हटलं आहे.
![पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडांची कत्तल, मनसेची महापालिका आयुक्तांकडे तक्रार tree cutting Environment Minister Aditya Thackerays constituency in worli पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडांची कत्तल, मनसेची महापालिका आयुक्तांकडे तक्रार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/01/22195802/Aditya-PC.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईत झाडांची लागवड आणि झाडांचं संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघ वरळीतच झाडं तोडली गेल्याचा आरोप मनसेनं केलं आहे. जाहिरातीच्या होर्डिंगला अडथळा निर्माण होतो म्हणून अवैधरित्या झाडं कापल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
वरळी सी फेस नजिकच्या मुंबई महापालिकेच्या शाळेजवळ, तसेच कावेरी सहकारी सोसायटीच्या आवारातील झाडं कापण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसेच परिसरातील इतर झाडंही इंजेक्शन देऊन मारले जात असल्याचा दावाही मनसेनं केला आहे. याबाबत मनसेनं मुंबई महापालिका आयुक्त आणि उद्यान अधीक्षकांना तक्रारीचं पत्र देखील दिलं आहे.
विशेष म्हणजे ज्या होर्डिंगसाठी ही झाडे कापली गेली, त्या होर्डिंगवर मुंबई महापालिकेच्याच स्वच्छ भारत सर्वेक्षणाची जाहिरात आहे. ही झाडे कापण्यामागे शिवसेनेशी जवळीक असलेल्या होर्डींग मालकाचे आर्थिक हित बिघडू नये, असा उद्देश असल्याचंही सूत्रांकडून समजतंय. त्यामुळे आपल्या मतदारसंघातच झाडं तोडण्याच प्रकार उघडकीस होत असेल तर पर्यावरण मंत्री काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.
शिवसेनेकडून बीएमसी आयुक्तांच्या अधिकारावर कुऱ्हाड, परवानगीशिवाय एकही झाड तोडता येणार नाही
या ठरावाच्या सूचनेचे महापालिका आयुक्तांनीही स्वागत केले आहे. त्यांनी याची अंमलबजावणी करण्यासाठी आजच्या बैठकीपासून एका झाड तोडायचे असले तरी त्याचे प्रस्ताव वृक्षप्राधिकरण बैठकीत मंजुरीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. आजच्या बैठकीत 205 झाडे तोडण्याचे नऊ प्रस्ताव मांडण्यात आले होते. यामध्ये खासगी आणि काही आस्थापनांच्या कामासाठी ही झाडे तोडण्यात मंजुरी मागण्यात आली होती. मात्र रेल्वेच्या उपक्रमासाठी केवळ एक झाड तोडण्यास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे 205 झाडांची कत्तल टाळली आहे असे जाधव यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)