News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

दोनशेच्या नोटेसाठी ATM रिकॅलिब्रेशनचे आदेश, बँकांना खर्च....

दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: नोटाबंदीनंतर दोन हजाराच्या नोटेसाठी केलेल्या रिकॅलिब्रेशननंतर, आता पुन्हा एकदा बँकांना आपली एटीएम रिकॅलिब्रेट अर्थात करावी लागणार आहेत. दोनशेची नोट एटीएममधून वितरित व्हावी, यासाठी एटीएम रिकॅलिब्रेट करावी लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तसे आदेश बँकांना दिले आहेत. पण या रिकॅलिब्रेशनसाठी बँकांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. जवळपास 2 लाख 20 हजार एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी 5 ते 6 महिने लागू शकतात. नोटाबंदी, थकीत कर्ज या आणि अन्य कारणांमुळे बँका आधीच अडचणीत असल्याचं सांगत आहेत. त्यात एटीएम रिकॅलिब्रेट करण्याचा खर्च बँकांना करावा लागणार आहे. सध्या एटीएममध्ये 100, 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटा मिळतात. मात्र नोटाबंदीनंतर दोनशेची नवी नोट बाजारात आली. या नोटेच्या रचनेमुळे ती नोट एटीएममध्ये मिळत नाही. ती केवळ बँकेतच मिळते. त्यामुळे ही नोटही एटीएममधून मिळावी, यासाठी एटीएमच्या रचनेत बदल करण्याचे आदेश आरबीआयने दिले आहेत. दोन हजारऐवजी छोट्या-छोट्या नोटा चलनात आणण्याचा बँकांचा उद्देश आहे. त्यासाठीच आरबीआय हे पाऊल उचलत आहे.  दरम्यान, एटीएम रिकॅलिब्रेट करण्यासाठी बँकांना किमान 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोटाबंदीनंतर एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा उपलब्ध झाल्याने, एटीएममधून पैसे काढण्याचं प्रमाण वाढलं आहे. दोनशेच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध झाल्याने ते प्रमाण कमी होईल, असा विश्वास आरबीआयला आहे. संबंधित बातम्या दोनशे रुपयांची नोट लवकरच चलनात, केंद्राची अधिसूचना 200 रुपयांची नोट चलनात आणण्याची तारीख ठरली!
Published at : 04 Jan 2018 08:33 AM (IST) Tags: RBI आरबीआय bank ATM एटीएम बँक

आणखी महत्वाच्या बातम्या

BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबई महापालिका महापौरपदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढणार; पण ती चिठ्ठी निघताच भाजप-शिंदे गटाला धक्का बसणार!

BMC Election 2026 Mumbai Mayor: मुंबई महापालिका महापौरपदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढणार; पण ती चिठ्ठी निघताच भाजप-शिंदे गटाला धक्का बसणार!

Devendra Fadnavis At Davos: 35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्ससिटी, मेडिसिटी प्रकल्प; दावोसमधून देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईला काय काय मिळालं?

Devendra Fadnavis At Davos: 35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्ससिटी, मेडिसिटी प्रकल्प; दावोसमधून देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईला काय काय मिळालं?

Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून आदेश आला, शिंदे सेनेच्या आकांक्षांना सुरुंग लागणार?

Mumbai Mayor BMC Election 2026: मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून आदेश आला, शिंदे सेनेच्या आकांक्षांना सुरुंग लागणार?

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

Avinash Jadhav: 'भाजप जिंकत नाही, तर तिथले पारंपारिक उमेदवार जिंकतायत', भाजप फक्त स्टॅम्प मारतेय; मनसे नेते अविनाश जाधवांचा भाजपवर हल्लाबोल

Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?

Mumbai Mayor Election 2026: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता; उद्धव ठाकरेंचं वक्तव्य जाणीवपूर्वक?

टॉप न्यूज़

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?

Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?

Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता

Maharashtra Live blog: मुंबईच्या महापौरपदाच्या आरक्षणाच्या सोडतीमधील 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, भाजपला फटका बसण्याची शक्यता