एक्स्प्लोर

ठाणे-बेलापूर रस्ता 4 दिवस, तर नेरुळ-पनवेल रेल्वे 3 दिवस बंद

नवी मुंबई-ठाणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे 4 दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

ठाणे : नवी मुंबई-ठाणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुढचे 4 दिवस वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. कारण रस्ते दुरुस्तीसाठी बेलापूर-ठाणे मार्ग सोमवारपर्यंत बंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हार्बर मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. कारण उरण-बेलापूर या रेल्वेमार्गाच्या कामासाठी तीन दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांना चार दिवसांसाठी नो एण्ट्री असल्याने सोमवारपर्यंत रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळणार आहे. कळवा- विटावा रेल्वे ब्रीजखालील खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतल्याने ही पुरिस्थिती उद्भवलीय आहे. या मार्गांवरील वाहतुकीत बदल रस्ता दुरुस्तासाठी नवी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने होणारी वाहतूक पटनी कंपनीपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहन धारकांना ऐरोली आणि पुढे मुलुंडमार्गे ठाणे गाठावं लागणार आहे. या फेऱ्यामुळे ऐरोली आणि मुलुंड या दोन्ही ठिकाणी टोलचा भुर्दंड बसणार आहे. मनसेने टोलवसुली बंद पाडली ऐरोलीमार्गे वाहतूक वळवण्यात आल्याने प्रवाशांना नाहक टोलचा भुर्दंड बसत आहे. शिवाय वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. मनसेने याविरोधात आंदोलन करत ऐरोली टोलनाक्यावरील टोल वसुली बंद पाडली आहे. हार्बर मार्गावर तीन दिवसांचा मेगाब्लॉक हार्बर रेल्वे मार्गावरील पनवेल ते नेरुळ दरम्यान तीन दिवस मेगाब्लॉक आहे. त्यामुळे चाकरमान्यांना वाहनाने ठाणे-मुंबई गाठावं लागणार आहे. नेरुळ ते ठाणे हा ट्रान्सहार्बर मार्ग चालू राहिल. पण पनवेल ते सीवूड्स-दारावे या स्टेशनवरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेरुळला यावं लागणार आहे. कोणत्याही नवीन रस्ताचं मूळ रुप अवघ्या काही वर्षांत उघड पडतं. त्यासाठी कोण जबाबदार असतं हे सर्वश्रूत आहे. मात्र त्याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आणि अशातच लाखो जण प्रवास करत असलेला रस्ता चार दिवस बंद ठेवणं हे कितपत योग्य आहे, याचा प्रशासनाने सारासार विचार करणं आवश्यक आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला

व्हिडीओ

John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report
Ahilyanagar Leopard : अहिल्यानगरात बिबट्याची दहशत कधी संपणार? Special Report
Shivsena BJP Seat Sharing : पालिका निवडणुकीसाठी 50-50 फॉर्म्युल्यासाठी शिवसेना आग्रही Special Report
Devendra Fadnavis Vidhan Sabha : विरोधकांची नाराजी, सत्ताधाऱ्यांची जोरदार टोलबाजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंडेंचा घणाघात
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Hardik Pandya : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत चार जणांना जमलेली कामगिरी हार्दिक पांड्यानं केली, पहिलाच भारतीय ठरला
हार्दिक पांड्याच्या नावावर नवा विक्रम, टी 20 मध्ये 'ही' कामगिरी करणारा भारताचा पहिलाच खेळाडू ठरला
IND vs SA : शुभमन गिलला सूर गवसला, टीम इंडियाचा तिसऱ्या टी 20 मध्ये दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी
भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, मालिकेत 2-1 अशी आघाडी, शुभमन गिलला सूर गवसला
IND vs SA : अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
अर्शदीप सिंगचं दमदार कमबॅक, गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 117 धावांवर रोखलं, एकटा एडन मारक्रम लढला
IND vs PAK Asia Cup U19 : भारताच्या पोरांनी पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
भारतानं पाकिस्तानला लोळवलं, आशिया कप अंडर 19 स्पर्धेत आयुष म्हात्रेच्या टीमचा दणदणीत विजय
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Embed widget