एक्स्प्लोर

पश्चिम बंगालमधले शिखंडी कोण आहेत?; ममता बॅनर्जींवर प्रचारबंदीच्या निर्णयानंतर संजय राऊत आक्रमक

पश्चिम बंगाल निवडणुकींमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर लावण्यात आलेल्या प्रचारबंदी संदर्भात बोलताना पश्चिम बंगालमधले शिखंडी कोण आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु असून लोकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच पश्चिम बंगाल निवडणुकींमध्ये ममता बॅनर्जी यांच्यावर लावण्यात आलेल्या प्रचारबंदी संदर्भात बोलताना पश्चिम बंगालमधले शिखंडी कोण आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसेच पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारसभेत बोलताना या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर बोलताना फडणवीस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व्यक्तीगत शत्रू नसतात. राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू. त्यामुळे विरोधी पक्षांना आमच्या शुभेच्छा आहेत, असं संजय राऊत म्हणाले. 

संजय राऊत म्हणाले की, "मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात निर्बंध लादण्यात आले, तर आश्चर्य वाटायला नको. काल हरिद्वारमध्ये लाखो लोक एकत्र आले. पश्चिम बंगालमध्ये लाखो लोकांच्या सभा होत आहेत. त्यामानाने महाराष्ट्रात या गोष्टींवर खूप नियंत्रण आहे. गुढीपाडवा आहे, लोक फिरत आहेत, मार्केटला गेले आहेत, हे तुम्ही चित्र दाखवत आहात. पण ते अपरिहार्य आहे. लोकांनी स्वतः शिस्त पाळली पाहिजे. लोकं शिस्त पाळत आहेत, हेसुद्धा तितकंच खरं आहे. पण सरकार आणि प्रशासन या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करत आहेत." 

"पश्चिम बंगालमध्ये ज्या प्रकारचं युद्ध सुरु आहे ते नवं महाभारत आहे. जसं त्या महाभारतात युद्धाचे कोणतेही नियम पाळले नाही. अगदी शिखंडीला पुढे करुन युद्ध जिंकण्याचा प्रयत्न झाला. पश्चिम बंगालमध्ये हे शिखंडी कोण आहेत? ज्यांना पुढे करुन हे युद्ध खेळलं किंवा लढलं जात आहे, हे पाहावं लागेल. ममता बॅनर्जी यांनी नियमभंग केला असेल तर कोणीही कायदा आणि आचारसंहितेच्या वर नाही. पण पश्चिम बंगालमध्ये फक्त ममता बॅनर्जी यांनीच नियमभंग केला आहे का? दिल्ली तसंच देशभरातून जे नेते येत आहेत त्यांनी कोणीच नियमभंग केले नाही का? की त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय आहे हे स्पष्ट झालं पाहिजे.", असं संजय राऊत म्हणाले. 

पंढरपूरच्या पोटनिवडणूकीच्या प्रचार सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस याच्या वक्तव्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, "आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षाचे नेते व्यक्तीगत शत्रू नसतात. राजकारणात वैचारिक लढाई असते ती आम्ही निवडणुकीत लढू. त्यामुळे विरोधी पक्षांना आमच्या शुभेच्छा आहेत. जर त्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याची नवीन तारीख त्यांनी ठरवली असेल तर त्यासाठीही आमच्या शुभेच्छा आहेत."

"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोरोना विरोधात 24 तास काम करत आहेत. त्यांचं कॅबिनेट काम करतंय, त्यांचं प्रशासन काम करतंय. आणि पुढली गुढी ही आरोग्यदायी आणि मोकळ्या वातावरणात उभारण्यात येईल, असा विश्वास आपण सर्वांनी व्यक्त केला पाहिजे." , असंही संजय राऊत म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget