एक्स्प्लोर

Aditya Thackeray: मुंबईतील रस्त्यांमध्ये 40 टक्के कमिशन खाता... ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार; आदित्य ठाकरेंचा भाजप- एकनाथ शिंदेंना इशारा

Aditya Thackeray On BJP : मुंबईतील रस्त्यांची काम ही पाच लोकांसाठी केली जात असून त्या माध्यमातून 40 टक्के कमिशन खाल्लं जातंय असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबई: मुंबईतील रस्त्यांची काम सुरू करायच्या आधीच काँन्ट्रॅक्टरला 600 कोटी रुपये देण्याची तयारी असलेल्या खोके सरकारने मुंबईच्या रस्त्यात घोटाळा केला आणि 40 टक्के कमिशन खाल्लं असा घणाघाती आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. खोके सरकारच्या चोरीची फाईल तयार असून ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी तुमची जागा दाखवणार असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईतील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबईतील रस्त्यांच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, आम्ही मुंबईचे रस्ते काँक्रिटीकरण करणार असल्याचं खोके सरकारने सांगितलं. एखादा रस्ता खोदायला गेला किंवा तयार करायला गेला तर एकून 42 प्रक्रियातून काम केलं जातं. वाहतूक पोलिसांनाही विचारावं लागतं, तसेच राज्य सरकारच्या आणि केंद्राच्या 16 एजन्सी आहेत, त्यांना विचारावं लागतं. पण घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात की मुंबईत 400 किमीचे रस्ते तयार करणार. 

पाच लोकांसाठी ही कामं 

मुंबईतील रस्ते हे पाच लोकांसाठी तयार करण्यात येत असून पाच लोकांना त्याचं काम दिलं जात आहेत असा आरोप करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांचं काम हे पाच झोनमध्ये केलं जात आहे. पाच लोकांना काम दिलं जाऊन त्यामध्ये कमिशन खाल्लं जात आहे. रस्त्यांच्या किमती वाढवल्या, टेंन्डरमध्ये घोटाळा केला. पाच हजार कोटींच्या रस्त्याची किंमत 6080 कोटी रुपये वाढवली. 40 टक्के कमिशन खाल्लं.

आदित्य ठाकरे म्हणाले की, हा आक्रोश आणि ही गर्दी पाहिल्यावर समझने वालों को इशारा काफी है हा संदेश जातोय. ही जी गर्दी आहे, जे भगवं वादळ दिसत आहे ते बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं आहे. इकडचा आवाज आता दिल्लीलाही ऐकायला लागतोय.  आजूबाजूंच्या भुतांना गाढायचं आहे, या खोके सरकारला गाढायचं आहे. 

आम्ही जी 20 वर्षात कामं केली ती आता दाबली जात आहेत. एक वर्ष झालं अजून महापालिकेला महापौर नाही, नगरसेवक नाहीत, समित्या नाहीत, त्यामुळे कामं खोळांबळी आहेत असं आदित्य ठाकेर म्हणाले. 

आदित्या ठाकरे म्हणाले की, अलिबाबा आणि चाळीच चोरांनी या मुंबईला लुटलं, त्यांच्या मित्रांना आणि बिल्डरना काम दिली जात आहेत, भ्रष्टाचार केला जात आहे. खोके सरकारचा फोन आला की त्यांची कामं होतात पण सर्वसामान्यांची कामं होत नाहीत हे दुर्दैव. महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याची चौकशी केली जावी अशी मागणी आम्ही राज्यपालाकडे केली आहे. 

खोके सरकारने काम न करता फोडाफोडीचं काम केलं. आता एकदोन नगरसेवकांनी सांगितलं की त्यांना आयपीएस अधिकाऱ्यांचा फोन येतो की मुख्यमंत्र्यांची ऑफर आहे, शिंदे गटात जा असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget