एक्स्प्लोर

संभाजीराजेंची आज पत्रकार परिषद, मराठा आरक्षण प्रश्नी कोणती भूमिका मांडणार?

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर खासदार संभाजीराजे छत्रपती आज आपली भूमिका मांडणार आहेत. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आणि नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे मराठा समाजासह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : मराठा आरक्षण प्रश्नी राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती आज (28 मे) आपली भूमिका मांडणार आहेत. मुंबईत आज संध्याकाळी पाच वाजता संभाजीराजे छत्रपती आणि मराठा क्रांती मोर्चा यांची पत्रकार परिषद होणार आहे. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आणि नेत्यांच्या भेटीनंतर संभाजीराजे आता नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे मराठा समाजासह सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांची भेट
तत्पूर्वी खासदार संभाजीराजे आज दुपारी 12 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर एक वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काय करता येईल यासंदर्भात ही भेट होणार आहे. याशिवाय संभाजीराजे बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेणार असल्याचं समजतं, परंतु भेटीची वेळ अद्याप निश्चित झालेली नाही.

शरद पवारांसोबतच्या बैठकीत काय झालं?
मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजेंनी काल (27 मे) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 13 मिनिटांच्या या भेटीत मराठा समाजाची अस्वस्थता शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा दावा संभाजीराजेंनी केला. सोबतच आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याचं आवाहन पवारांना केल्याचं त्यांनी सांगितलं.

गरीब, गरजू मराठा समाजाला न्याय मिळावा ही राज ठाकरेंची भूमिका
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचीही भेट घेतली. भेटीनंतर संभाजीराजे म्हणाले की, "राज ठाकरे जात पात मानत नाहीत. त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. पण गरीब आणि गरजू मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही त्यांची भूमिका आहे." तसंच राज ठाकरे यांचे आजोबा आणि माझे आजोबा यांचे असणारे संबंध, शिवाय गडकिल्ल्यांचं संवर्धन यावरही चर्चा केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. 

महाराष्ट्र दौऱ्यानंतर संभाजीराजेंच्या गाठीभेटी 
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. रस्त्यावर येऊन मोर्चा, आंदोलन करण्याचा इशारा काही मराठा संघटनांनी दिला आहे. परंतु सध्या कोरोनाची परिस्थिती पाहता आंदोलन, मोर्चे टाळण्याचं आवाहन संभाजीराजेंनी केलं आहे. त्यामुळेच संभाजीराजे राज्यभर दौरा करुन मराठा समाजाची म्हणणं, त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर ते विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवं असं आवाहन करत आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला संभाजीराजेंचं उत्तर
खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली होती. पण मोदींनी भेट नाकारली असं माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, "संभाजीराजेंनी 4 वेळा भेट मागण्याच्या आधी 40 वेळा मोदींजींसोबत त्यांची भेट झाली आहे. राजे भेट मागतात मोदीजी भेट द्यायचे. पण त्यानंतर 4 वेळा भेट नाकारण्याचं कारण कोविड पराकोटीला गेला आहे आणि ज्यासाठी ते भेट मागत आहे, तो विषय केंद्राचा नाही, राज्याचा आहे." तसंच भाजपने किती सन्मान दिला, हे संभाजीराजे छत्रपती सांगत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती.

त्यावर उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले की, "मला कोणाच्या पाठिंब्याची गरज नसून आरक्षणाच्या लढाईसाठी मला समाजाचा पाठिंबा आहे. मी अचानक येऊन टपकलो नाही." तसंच "आरक्षणाच्या लढाईत विनायक मेटे आणि माझी तुलना करु नका, मेटे मेटे असून मी संभाजी छत्रपती आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द
राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह असल्याचं न्यायालयाने म्हटलं. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना 2018 साली करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीनुसार, कलम 342 अ समाविष्ट करण्यात आलं होतं, त्यानुसार मराठा समाजाला आरक्षण देताना योग्य पद्धतीचा अवलंब करण्यात आला नसल्याचा युक्तीवाद न्यायालयाने खोडून काढला. मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका योग्य असल्याचं ठरवत मराठा आरक्षणाची तरतूद फेटाळून लावली आहे. आता राज्य सरकार या सर्वातून काय मार्ग काढतं ते पाहणं औत्सुक्याचं आहे. 

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget