एक्स्प्लोर

पाडणं सोडून द्या, आधी सरकार चालवून तर दाखवा : देवेंद्र फडणवीस

सामनातील मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला सरकार पाडण्याचं आव्हान दिलं होतं. याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहेत. सरकार पाडण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही, तुम्ही सरकार चालवून तर दाखवा, असं फडणवीस म्हणाले.

मुंबई : "माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडा," असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तील मुलाखतीमध्ये भाजपला दिलं होतं. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "वारंवार म्हटलं जातं की आमचं सरकार पाडून दाखवा. आधी सरकार चालवून दाखवा. पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की सरकार चालवून तर दाखवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

भाजप प्रदेश राज्यकार्यकारिणीची आज बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते. या बैठकी फडणवीस यांच्यासह प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयातून बैठकीला उपस्थित होते. तसेच कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य विनोद तावडेही मंचावर उपस्थित होते. याशिवाय राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीतून आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

उद्धव ठाकरे यांचं आव्हान "ही जण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरकार पडणार असं म्हणत आहेत. माझी मुलाखत सुरु असताना सरकार पाडा. काही जणांना घडवण्यात आनंद असतो, काही जणांना बिघडवण्यात. बिघडवायचं असेल तर बिघडवा. या सरकारचं भवितव्य विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून नाही," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले की, "वारंवार म्हटलं जातं की आमचं सरकार पाडून दाखवा. आधी सरकार चालवून दाखवा. पाडणं सोडून द्या, आम्हाला इंटरेस्ट नाही. माझं तुम्हाला आव्हान आहे की सरकार चालवून तर दाखवा. तुमचं सरकार एवढ्या अंतर्विरोधाने भरलेलं आहे की आम्हाला पाडायची आवश्यकता नाही. एकमेकांच्या तंगड्या तोडायला तुम्हीच सज्ज व्हाल आणि तेच तुम्ही रोज करता. अंतर्विरोधानेच एक दिवस तुमचं सरकार कोसळणार आहे. आम्ही तोपर्यंत वाट पाहायला तयार आहोत. त्यानंतर महाराष्ट्राचं भवितव्य काय आहे हे आम्ही निश्चितपणे ठरवू."

कुठे जायचं हे चालक ठरवत नाही, प्रवासी ठरवतात! महाविकास आघाडीचं सरकार हे तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी शेरेबाजी केली आहे. ते म्हणाले की, "ऑटो रिक्षाचे स्टेअरिंग उद्धवजी यांच्या हातात आहे हे खरं आहे. पण ते एक गोष्ट विसरले की रिक्षा कुठे जाईल हे चालक ठरवत नाही तर त्यामध्ये बसलेले प्रवासी ठरवतात. प्रवाशांनी ठरवलेल्या ठिकाणी रिक्षा गेली नाही तर चालकाला रोजगारही मिळत नाही. या रिक्षात बसलेल्या प्रवाशांचंही समजत नाही, एक जण उत्तरेकडे जा म्हणतो, दुसरा दक्षिणेकडे चला म्हणतो. मध्येच कोणीतरी ब्रेक मारतं, कोणीतरी हॉर्न वाजवतं. त्या रिक्षाची परिस्थिती अशी झालीय की नेमकं कुठल्या दिशेला आणि कोण घेऊन चाललंय हे ठरवता येत नाही. यामुळे नुकसान जनतेचं होतं."

राज्यात कोरोनाची टेस्टिंग कमी राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरुनही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात टेस्टिंग होत नाही. यामुळे मृत्यूदर आटोक्यात येत नाही. मुंबईत 15 ते 30 हजार टेस्टिंग केलं तर महिन्याभरात परिस्थिती नियंत्रणात येईल याचा मला विश्वास आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच पुण्यात टेस्टिंग वाढल्यामुळे रुग्ण वाढले तरी याचा फायदा पुण्याला होणार आहे. पण पुण्यावर अन्याय होत आहे. आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी एक पैसा अनुदान पुणे, पिंपरी-चिंचवडला दिलेला नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "एमएमआर परिसरात संकट मोठं आहे. आम्ही 25 कोविड सेंटरला भेटी दिल्या. आज अवस्था अतिशय वाईट आहे. क्वॉरन्टाईनमध्ये महिला सुरक्षित नाहीत. महिलांसादर्भात राज्य सरकारने SOP तयार करावी ही आमची मागणी आहे. सरकारने लपवालपवी थांबवावी. संकट गंभीर आहे. आम्ही सरकारसोबत आहोत."

संबंधित बातम्या

'माझी मुलाखत चालू असताना सरकार पाडा', मुख्यमंत्री ठाकरेंचं आव्हान

सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
सिद्धेश्वर एक्सप्रेस 7 तास उशिरा, आजची वंदे भारतही रद्द; पुण्यात कोच घसरल्याने मुंबई सोलापूरच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Mumbai Family death Watermelon: मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे 'फुड पॉयझनिंग'ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज
मुंबईतील कलिंगड- बिर्याणी खाऊन मृत्यू झाल्याच्या घटनेमागे 'फुड पॉयझनिंग'ची शक्यता; आयुर्वेद तज्ञांचा अंदाज

व्हिडीओ

Devendra Fadnavis PC : शिवरायांचा कुणीही अपमान करू शकत नाही, गरज नसताना वाद सुरू करण्यात आला
Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप
Vishal Patil Speech On Ramdas Athawale : आठवलेंची राज्यसभेवर फेरनिवड, विशाल पाटलांचं जोरदार भाषण!
Auto Driver On Pratap Sarnaik : मराठी सक्तीचा मुदतीवर उद्या निर्णय, सरनाईक काय निर्णय घेणार?
Mumbai Food Poison Case : कलिंगडमुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026: मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
मोठी बातमी, म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे 2640 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ, सोडत कधी?
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
महिलेला जमिनीवर पाडून अश्लील चाळे, महिलेची कंपनीतील बॉसविरुद्ध तक्रार; म्हणाला, तू मला खुश कर, 10 दिवस सुट्टी देतो
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
अनंत अंबानी यांचं कोलंबियातील पाणघोड्यांचे प्राण वाचवण्याचं आवाहन, वनतारामध्ये आश्रयस्थान निर्माण करुन देण्याचा प्रस्ताव
Eknath Shinde : विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी दोन दिवस बाकी, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, शिवसेना कोणाला संधी देणार?
पक्षांतर्गत नाराजी, नेत्यांची वक्तव्य ते विधानपरिषदेची उमेदवार निवड, एकनाथ शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; 75 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू, अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 एप्रिल 2026 | मंगळवार
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
संतापजनक! बँकेच्या एजंटकडून कर्जदार दाम्पत्यास लाथा-बुक्क्यांनी मारहाण, पुण्यात कायदा-व्यवस्थेचे धिंदवडे
Parth Pawar : एकीकडे रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, दुसरीकडे पार्थ पवारांचा VSR च्या विमानातून मुंबई ते पुणे प्रवास, कारण समोर
रोहित पवार व्हीएसआर विरोधात आक्रमक, पार्थ पवारांकडून VSR च्याच विमानाचा वापर, मुंबई ते पुणे प्रवास
Embed widget