एक्स्प्लोर

नयनतारा सहगल यांच्या अपमानाचे साहित्य विश्वात पडसाद

सहगल यांना संमेलनात परत बोलवलं जात नाही, तोपर्यंत संमेलनाला जाणार नाही, अशी भूमिका एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी घेतली आहे. तर असे प्रकार सुरुच राहिले तर संमेलनाला जाण्यात अर्थ नाही, असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं.

मुंबई : ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलन आयोजकांनी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. सहगल यांना संमेलनात परत बोलवलं जात नाही, तोपर्यंत संमेलनाला जाणार नाही, अशी भूमिका एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी घेतली आहे. तर असे प्रकार सुरुच राहिले तर संमेलनाला जाण्यात अर्थ नाही, असं मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं. ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या निमंत्रणाला शेतकरी न्याय हक्क समिती आणि मनसेनं विरोध केल्यानं आयोजकांनी त्यांचं निमंत्रण रद्द केलं आहे. यानंतर अनेक मान्यवरांनी आयोजकांनी घेतलेल्या निर्णयाचा विरोध करत संमेलनावर बहिष्कार टाकला आहे. साहित्य क्षेत्राचीच नव्हे तर मराठी समाजाचीही बदनामी : राजीव खांडेकर ज्या प्रकारे आयोजकांनी नयनतारा सहगल यांना आंमत्रण दिलं आणि नंतर दहशतीखाली येऊन आमंत्रण रद्द केलं. त्यामुळे साहित्य क्षेत्राचीच नव्हे तर मराठी समाजाचीही बदनामी झाली आहे. नयनतारा यांचे वडील रणजीत पंडित हे मराठी होते, कोकणाचे होते. संस्कृतचे ते गाढे अभ्यासक होते. तसेच ते स्वातंत्र्य सैनिकही होते. महाराष्ट्राच्या कन्येला आमंत्रण देणं आणि नंतर त्यांना अपमानित करणं ही शरमेची बाब आहे. आयोजकांना अजूनही संधी आहे, त्यांनी आपली चूक सुधारावी. सहगल यांची माफी मागावी आणि सन्मानाने त्यांना संमेलनाला येण्याची विनंती करावी. ज्या प्रकारे सहगल यांचा अपमान झाला आहे, एक मराठी माणूस म्हणून या गोष्टीचा निषेध म्हणून संमेलनाला न जाण्याचा मला निर्णय घ्यावा लागेल, असं राजीव खांडेकर म्हणाले. शुद्रातील शुद्र घटना : गिरीश कुबेर कोणीतरी धमकी देतो म्हणून आमंत्रण मागे घेणे ही शुद्रातील शुद्र घटना आहे. एक कवियत्री संमेलनाची अध्यक्ष असताना, दुसऱ्या लेखिकेला असं अपमानित करणं महाराष्ट्राच्या मराठी मातीसह अरुणा ढेरे यांचाही हा अपमान आहे. असे प्रकार सुरुच राहिले तर संमेलनाला जाण्यात अर्थ नाही, अशी भूमिका लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. राजीव खांडेकर आणि गिरीश कुबेर यांच्यासह ज्येष्ठ लेखिका आणि संपादिका विद्या बाळ यांनीही तीव्र शब्दात आयोजकांच्या निर्णयाचा विरोध केला. तसेच ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी आपण राजीव खांडेकर यांच्या मताशी सहमत असून आपणही संमेलनाला जाणार नाही, अशी भूमिका घेतली.

नयनतारा सहगल यांची प्रतिक्रिया

मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी घेतलेल्या निर्णयावर नयनतार सहगल यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. ज्या पद्धतीचे वाद समोर येत होते त्या पार्श्वभूमीवर जावं की नाही याचा विचार मी करत होते. मात्र मी यावं असा आयोजकांचा आग्रह होता. मात्र आयोजकांनी स्वत:च निर्णय घेत मला येऊ नका असं पत्राने कळवलं आहे, याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं.

मी माझं भाषण आधीच आयोजकांना पाठवलं होतं. मुख्यमंत्री माझ्याच व्यासपीठावर असणार आहेत हे मला माहीत नव्हतं. भाजपशासित राज्य आहे, त्यामुळे कदाचित मुख्यमंत्र्यांना माझं भाषण आवडलं नसेल. माझ्या शब्दांमध्ये जरुर काही त्यांना घाबरवणारं असावं, असा अंदाज सहगल यांनी व्यक्त केला.

मी साहित्यिकांना आता देशात काय चाललंय, स्थिती का बिघडत चालली आहे, द्वेषाचं वातावरण का पसरवलं जातं आहे, हे हिंदू राष्ट्र आहे असं का सांगितलं जात आहे याबद्दल मी सांगणार होते, असं सहगल यांनी सांगितलं. कदाचित हे सगळं बोलणं आपल्या व्यासपीठावरुन ऐकणं मुख्यमंत्र्यांना सहन झालं नसतं, असंही सहगल म्हणाल्या

आयोजकांना वाईट परिस्थितीमध्ये हा निर्णय घ्यावा लागत आहे, हे मी समजू शकते. यापुढेही मी महाराष्ट्रात येईल अशी मला आशा आहे. एखाद्या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने यायला आवडेल, अशी इच्छाही सहगल यांनी व्यक्त केली.

कोण आहेत नयनतारा सहगल? लेखिका नयनतारा सहगल या देशात 'पुरस्कार वापसी'ची सुरुवात करणाऱ्या लेखिका आहेत. मात्र नंतर नयनतारा सहगल यांच्यासह 10 दिग्गज साहित्यिकांनी पुरस्कार पुन्हा स्वीकारले होते. साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याची कोणतीही तरतूद नसल्याने आपण हा पुरस्कार पुन्हा स्वीकारत असल्याचं सहगल यांनी म्हटलं होतं. नयनतारा सहगल या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत. नयनतारा सहगल यांना त्यांच्या ‘रिच लाईक अस’ (Rich Like Us) या पुस्तकासाठी राजीव गांधीच्या कार्यकाळात म्हणजे 1986 साली साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. मात्र दिल्लीनजीक दादरी गावात गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून बिसारा गावातील काही हिंदू तरूणांनी मोहम्मद अखलाख नावाच्या इसमाला ठार मारलं, म्हणून नयानतारा यांनी हा पुरस्कार परत केला होता.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!
शेतकरी कर्जमाफीसाठी कोण पात्र, कोण अपात्र, सरकारचे सर्व निकष सोप्या शब्दात!
Abdul Sattar On Eknath Shinde And Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी चर्चा करावी; अब्दुल सत्तारांचं बेधडक विधान, ठाण्यातील बैठकीनंतर काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी चर्चा करावी; अब्दुल सत्तारांचं बेधडक विधान, ठाण्यातील बैठकीनंतर काय काय म्हणाले?
Vadar Samaj News : मोठी बातमी! वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ; मंत्री अतुल सावेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मोठी बातमी! वडार समाजासाठी फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बेघर कुटुंबांसाठी घरकुल योजनेच्या निधीत वाढ; मंत्री अतुल सावेंकडून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

व्हिडीओ

Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2026 : अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
अर्ज माघारी.. सोलापुरात राजेंद्र राऊत अन् अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरेंविरुद्ध मविआचा उमेदवार कोण? आज निर्णय होणार
Delhi's Malviya Nagar Fire: दिल्लीत भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू, लोकांचा जीव वाचवायला स्थानिकांनी जमिनीवर गाद्या अंथरल्या अन्....
दिल्लीत भीषण अग्नितांडवात 21 जणांचा मृत्यू, लोकांचा जीव वाचवायला स्थानिकांनी जमिनीवर गाद्या अंथरल्या अन्....
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
मविआला दे धक्का.. विधानपरिषद निवडणुकीत भाजप महायुतीचा विजयी चौकार? 4 मतदारसंघात तगडे उमेदवारच 'आऊट'
Tukaram Mundhe Beed FDA Raid: तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
तुकाराम मुंढेंच्या एफडीएच्या कारवाईचा धडाका कायम, बीडमध्ये लस्सीने भरलेल्या टाक्या अधिकाऱ्यांनी ओतल्या
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Delhi's Malviya Nagar Fire: मोठी बातमी : दिल्लीत हॉटेलमध्ये भीषण आग, आतापर्यंत 21 जणांचा होरपळून मृत्यू
Ankita Walawalkar On Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
कॉकरोच जनता पार्टीबाबत अंकिता वालावलकरला काय वाटतं? कोणतेही आढेवेढे न घेता स्पष्टच म्हणाली...
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
Kerala Crime:आईच्या बॉयफ्रेंडकडून अमानुष छळ, डोकं भिंतीवर आपटून संपवलं; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
जेवताना खोकला, आईचा बॉयफ्रेंड चिडला, पाय देऊन चिमुकल्याची हाडं मोडली; केरळमधील दीड वर्षांच्या बाळाचा अंगावर शहारे आणणारा शेवट
Embed widget