एक्स्प्लोर

तुमच्या खिशातले पैसे मोदी उद्योगपतींना देणार : राहुल गांधी

भिवंडी : रा. स्व. संघावर गांधीहत्येचा आरोप केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींचं कर्ज माफ करणार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला. 'सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी बड्या उद्योगपतींचं कर्ज माफ करणार आहेत. मोदी केवळ 15 जणांचं सरकार चालवत आहेत' असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर कोर्ट परिसरातच राहुल गांधींनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. 'हजारो कोटी रुपये असलेली एक तरी व्यक्ती बँकेच्या रांगेत दिसते का?' असा सवाल गांधींनी विचारला. 'मोदींनी तुम्हाला रांगेत उभं केलं, मात्र तुमच्या खिशातले पैसे याच श्रीमंतांकडेच जाणार. सामान्य नागरिक रांगांमध्ये उभे राहून त्रस्त असताना तिकडे मोदी कधी हसत आहेत, कधी रडत आहेत', असा टोला राहुल यांनी हाणला. 'गांधीजींच्या विचारधारेनं देशाला स्वातंत्र्य मिळालं. माझी लढाई ही गांधीजींच्या विचारधारेसाठी आहे. देशात एकीकडे स्वातंत्र्याची विचारधारा आहे आणि दुसरीकडे पारतंत्र्याची विचारधारा आहे. मी ज्या विचारांशी लढत आहे, ते विचार देशाला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा देश कोणापुढे झुकणार नाही', असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या हमीवर राहुल गांधींना जामीन मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल केलेल्या विधानामुळे राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींची हत्या केली, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागावी नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असं संघाने म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी माफी न मागितल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी आज सकाळी दहा वाजता भिवंडी कोर्टात हजर राहिले होते. 1 सप्टेंबर रोजी राहुल गांधी म्हणाले होते की, “मी अब्रुनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यास तयार आहे. महात्मा गांधी हत्यासंदर्भातील माझ्या वक्तव्यातील प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे.” तक्रारदाराची अट गांधी हत्येच्या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी, तसंच यापुढे असं विधान करणार नाही, याची हमी द्यावी, तरच खटला मागे घेऊ, असं तक्रारदाराने कोर्टात सांगितलं. मात्र राहुल गांधींच्या वकिलाने पुढील तारखेची मागणी केली. काय आहे प्रकरण? 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, भिवंडी येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या लोकांचा हात होता, असा सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र हा खटलाच रद्द करावा, अशी याचिका राहुल गांधी यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. यानंतर राहुल यांच्या वकिलांनी त्यांना या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. मात्र हायकोर्टाने ती मागणीही अमान्य करत, भिवंडी कोर्टातच दाद मागण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

माफी मागा किंवा खटल्याला सामोरे जा, राहुल गांधींना कोर्टाने फटकारलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा
मंत्रालयातील दुसरे पंत गो.श्री. पंतबाळेकुंद्रींचं निधन; मनोहर जोशींच्या कार्यकाळात दबदबा, आठवणांनी उजाळा

व्हिडीओ

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
Dog Attack Vastav EP 273: भटक्या कुत्र्यांनी महिलेला फाडून खाल्लं, चाकणमधील घटनेनंतर डोळे उघडणार का?
Sunetra Pawar Speech :दादांनी खडसावलेलं तेच वहिणींनी सांगितलं, बीडीडीवासियांना पवारांचा मोलाचा सल्ला
Prakash Abitkar on Mahatma Phule Yojana : रुग्णालयांकडून लूट, महात्मा फुले योजनेत पात्र कोण?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
पुणेकरांना गुडन्यूज, गॅस बुकींगनंतर 96 तासांत सिलेंडर घरपोच; जिल्हाधिकारी डुडींचे एजन्सींना आदेश
Share Market : शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 75 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात अखेरच्या एका तासात चित्र पालटलं, सेन्सेक्स 938 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार
Embed widget