एक्स्प्लोर

तुमच्या खिशातले पैसे मोदी उद्योगपतींना देणार : राहुल गांधी

भिवंडी : रा. स्व. संघावर गांधीहत्येचा आरोप केल्याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी उद्योगपतींचं कर्ज माफ करणार असल्याचा घणाघात राहुल गांधींनी केला. 'सर्वसामान्यांच्या खिशातून पैसे काढून मोदी बड्या उद्योगपतींचं कर्ज माफ करणार आहेत. मोदी केवळ 15 जणांचं सरकार चालवत आहेत' असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर कोर्ट परिसरातच राहुल गांधींनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. 'हजारो कोटी रुपये असलेली एक तरी व्यक्ती बँकेच्या रांगेत दिसते का?' असा सवाल गांधींनी विचारला. 'मोदींनी तुम्हाला रांगेत उभं केलं, मात्र तुमच्या खिशातले पैसे याच श्रीमंतांकडेच जाणार. सामान्य नागरिक रांगांमध्ये उभे राहून त्रस्त असताना तिकडे मोदी कधी हसत आहेत, कधी रडत आहेत', असा टोला राहुल यांनी हाणला. 'गांधीजींच्या विचारधारेनं देशाला स्वातंत्र्य मिळालं. माझी लढाई ही गांधीजींच्या विचारधारेसाठी आहे. देशात एकीकडे स्वातंत्र्याची विचारधारा आहे आणि दुसरीकडे पारतंत्र्याची विचारधारा आहे. मी ज्या विचारांशी लढत आहे, ते विचार देशाला झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा देश कोणापुढे झुकणार नाही', असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींना भिवंडी कोर्टाकडून जामीन मंजूर

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मानहानी खटल्याप्रकरणात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भिवंडी कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. काँग्रेस नेते शिवराज पाटील यांच्या हमीवर राहुल गांधींना जामीन मिळाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जानेवारी 2017 रोजी होणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबद्दल केलेल्या विधानामुळे राहुल गांधींविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यावर आज भिवंडी कोर्टात सुनावणी झाली. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संघाच्या लोकांनीच महात्मा गांधींची हत्या केली, असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. त्यानंतर राहुल गांधींनी माफी मागावी नाही तर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, असं संघाने म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी माफी न मागितल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्याने अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यावरील सुनावणीसाठी राहुल गांधी आज सकाळी दहा वाजता भिवंडी कोर्टात हजर राहिले होते. 1 सप्टेंबर रोजी राहुल गांधी म्हणाले होते की, “मी अब्रुनुकसानीच्या खटल्याचा सामना करण्यास तयार आहे. महात्मा गांधी हत्यासंदर्भातील माझ्या वक्तव्यातील प्रत्येक शब्दावर मी ठाम आहे.” तक्रारदाराची अट गांधी हत्येच्या वक्तव्याबाबत राहुल गांधींनी माफी मागावी, तसंच यापुढे असं विधान करणार नाही, याची हमी द्यावी, तरच खटला मागे घेऊ, असं तक्रारदाराने कोर्टात सांगितलं. मात्र राहुल गांधींच्या वकिलाने पुढील तारखेची मागणी केली. काय आहे प्रकरण? 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, भिवंडी येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधींच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसच्या लोकांचा हात होता, असा सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केला होता. राहुल गांधींच्या या आरोपावर आक्षेप घेत, त्यांच्याविरोधात भिवंडी कोर्टात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. मात्र हा खटलाच रद्द करावा, अशी याचिका राहुल गांधी यांनी मुंबई हायकोर्टात केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. यानंतर राहुल यांच्या वकिलांनी त्यांना या सुनावणीसाठी गैरहजर राहण्याची मुभा द्यावी अशी मागणी कोर्टाकडे केली. मात्र हायकोर्टाने ती मागणीही अमान्य करत, भिवंडी कोर्टातच दाद मागण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

माफी मागा किंवा खटल्याला सामोरे जा, राहुल गांधींना कोर्टाने फटकारलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मिलिंद नार्वेकरांचा मध्यरात्री फोन, देवेंद्र फडणवीसांचा पहाटे रिप्लाय, मग ठाकरे फडणवीसांची फोनाफोनी, BMC च्या प्रस्तावावर काय घडलं?
मिलिंद नार्वेकरांचा मध्यरात्री फोन, देवेंद्र फडणवीसांचा पहाटे रिप्लाय, मग ठाकरे फडणवीसांची फोनाफोनी, BMC च्या प्रस्तावावर काय घडलं?
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'
आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, मुंबई महापालिकेतील 'त्या' 4 प्रस्तावास स्थगिती; शिंदे गटाला 'दे धक्का'

व्हिडीओ

Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं
Sunil Tatkare and Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवार यांच्यासमोरच सुनिल तकरे भडकले,राष्ट्रवादीच्या बैठकीत तटकरे-भुजबळ आमनेसामने
Mira Road Bakri Eid Row : कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यांवरुन वाद-राडा Special Report
Fuel Shortage : महाराष्ट्रातील इंधन टंचाई हे साठेबाजीमुळे, देवेंद्र फडणवीस यांचा दावा; थेट कारवाईचा इशारा | ABP Majha
Onion Agitation : कांद्याचा वांदा नेमका कशामुळे होतोय? कांद्याचा दर्जा घसरल्यामुळे? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदीकंडून देशवासियांना उष्णतेच्या लाटेत विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
मोठी बातमी! विधानपरिषदेचा तिढा मुंबईतच सुटणार, दोन जागांवरुन अडलंय; देवेंद्र फडणवीसांनी सगळं सांगितलं
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
गर्लफ्रेंडला शेकडो पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं; 487 जणांनंतर पीडितानं मोजणं सोडून दिलं, कधी कधी 24 तासात 14 जण आले, नराधम प्रियकराला आता..
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
पुण्यातील आंदेकर टोळीच्या 5 जणांना अहिल्यानगरमधून अटक; 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देशातील पहिली तृतीयपंथीयांची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, जामीन रद्द करा, तुरुंगात टाका; पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप
Embed widget