एक्स्प्लोर

PFI Ban: महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेणार? PFI नंतर या संघटनेवर बंदी येण्याची शक्यता

Raza Academy: केंद्राने पीएफआयवर बंदी घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकार रझा अकादमीवर बंदी घालण्याची शक्यता आहे.

Raza Academy: केंद्र सरकारने  पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (Popular Front Of India-PFI) या संघटनेवर बंदी घातल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारकडून रझा अकादमीवर (Raza Academy) बंदी घातली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे बंदीबाबत नवरात्रोत्सवानंतर निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.  मागील काही वर्षांपासून रझा अकादमी चर्चेत आहे. 

सोशल मीडियावर भाजप समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  समीत ठक्कर यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. ठक्कर हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्यासोबतही संपर्कात असल्याची चर्चा सुरू असते. समीत ठक्कर यांनी रझा अकादमीवर बंदी येणार असल्याचे ट्वीट केले आहे. त्यामुळे रझा अकादमीवर बंदी येणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी याआधीदेखील रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. राज्यातील हिंसाचारामागे रझा अकादमी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 


समीत ठक्कर यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि नितीन राऊत यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या पोस्टवरून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी ठक्कर तुरुंगात होते. हायकोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली.

रझा अकादमी आहे काय?

1978 मध्ये अलहाज मोहम्मद सईद नूरी यांनी रझा अकादमीची स्थापना केली होती. नूरी हे 1986 पासूनचे रझा अकादमीचे अध्यक्ष आहेत. रझा अकादमीचे इमाम-ए-अहमद रझा खान कादरी आणि इतर सुन्नी विद्वानांची पुस्तके प्रकाशित करण्यात येतात. अकादमीने आतापर्यंत उर्दू, अरबी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पुस्तके प्रकाशित केली आहेत. 

रझा अकादमी ही आंदोलनांमुळेही चर्चेत आली आहे. 11 ऑगस्ट 2012 रोजी, रझा अकादमीने आसाममधील दंगली आणि म्यानमारमधील मुस्लिमांवरील हल्ल्यांविरोधात मुंबईतील आझाद मैदान येथे इतर काही मुस्लिम गटांसह आंदोलन केले होते. या आंदोलनात मोठा हिंसाचार झाला होता. यात दोन ठार आणि 50 हून अधिक जखमी झाले होते. नुकत्याच, काही महिन्यांपूर्वी अमरावतीत झालेल्या दंगलीतही रझा अकादमीचा हात असल्याची चर्चा होती. 

त्याशिवाय, रझा अकादमीने संगीतकार ए.आर. रहमान आणि इराणी चित्रपट निर्माता माजिद माजिदी यांच्याविरुद्ध मुहम्मदवर चित्रपट बनवल्याबद्दल फतवा जारी केला होता. त्याशिवाय, इतर काही मुद्यांवर रझा अकादमीने घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली असल्याचे दिसून आले. 

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget