एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या बड्या नेत्यांना पराभूत केल्याचं चित्र सध्या तयार झालंय : जितेंद्र आव्हाड

अजित पवारांचा शपथविधी टीव्हीवर पाहिला त्यावेळी आपलं राजकीय आयुष्य संपलं असं वाटलं होतं. तसेच भाजपचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकत नाही. जितेंद्र आव्हाड एबीपी माझाच्या 'ऐसपैस' या कार्यक्रमात बोलत होते.

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून भाजपच्या बड्या नेत्यांचा पराभव केला, असं चित्र सध्या तयार झालं आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच हे चित्र सावरताना भाजपला त्रास होईल, असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड एबीपी माझाच्या 'ऐसपैस गप्पा' या कार्यक्रमात बोलत होते.

भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपचा पाया हलला आहे. विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागाला. यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचं चित्र सध्या तयार होत आहे. भविष्यात भाजपसाठी हे जड जाणारं आहे. भाजपमधील मोठे ओबीसी नेते आज एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पंकजा मुंडेंनी जर वेगळी भूमिका घेतली तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या परिश्रमाने या सर्वांना एकत्र आणलं होत. हे सगळे नेते आज अस्वस्थ असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.

अजित पवार पुन्हा तशी भूमिका घेणार नाहीत

राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यादरम्यान अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका अॅक्शनला रिअॅक्शन होती. कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करायला मी सांगितलं नव्हतं. कार्यकर्ते चुकले, असं मी मानत नाही. शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ती भावना होती. अजित पवारांचा शपथविधी टीव्हीवर पाहिला त्यावेळी आपलं राजकीय आयुष्य संपलं, असं वाटलं होतं. मात्र पवार साहेबांनी काही वेळातच आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार आणि भाजप हे समीकरण कधीही जुळणार नाही, असंही जितेंद्र आव्हान यांनी सांगितलं. तसेच आताची परिस्थिती पाहता अजित पवार पुन्हा असा निर्णय घेतील, असं वाटत नाही, असंही आव्हाडांनी सांगितलं.

कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही

भाजपचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकत नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत फरक आहे. महाराष्ट्राचं राजकारण खरेदी-विक्री महासंघ होऊ शकत नाही. कर्नाटक, बिहार, आंध्रप्रदेश तामिळनाडूमध्ये असं अनेकदा घडलं आहे. एखाद्या माणसाला खरेदी करुन सरकार स्थापन करणे महाराष्ट्रात कधीही घडलेलं नाही आणि आताही तसं होणार नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE: मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; तर पुढील दोन दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढणार
Maharashtra Rain LIVE: मुंबईत पुढील 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज; तर पुढील दोन दिवसांत विदर्भात पावसाचा जोर वाढणार
Heavy Rain Speedy Wind in Mumbai: मुंबईकरांनो सावधान! 90च्या स्पीडने वारे वाहणार, बंगालच्या उपसागरातील एका बदलामुळे नक्की काय घडलं?
मुंबईकरांनो सावधान! 90च्या स्पीडने वारे वाहणार, बंगालच्या उपसागरातील एका बदलामुळे नक्की काय घडलं?
Mumbai Local Train Rain: मोठी बातमी: कांजूर-विक्रोळीदरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल ट्रेन एकाच जागी थांबल्या, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
मोठी बातमी: कांजूर-विक्रोळीदरम्यान तांत्रिक बिघाड, लोकल ट्रेन एकाच जागी थांबल्या, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
Mumbai Local Train Rain: देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प
देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jamun Rain: मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
मुंबईच्या पावसात जांभळाचंही झाड पडलं; सोशल मीडियातही ट्रेंड, जांभळाच्या नावाने व्हायरल होतायत मिम्स
Mumbai Pune Missing Link Land Slide: 13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
13. 3 किमी रस्त्यांसाठी 7120 कोटींचा चुराडा; अरे प्रतिदिन 100 कोटींप्रमाणे किमान 70 दिवस तरी काढायचे होते; मिंसिंग लिंकला भगदाड पडताच सुषमा अंधारेंनी गणित मांडलं
Pune Visapur Landslide: पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
पहाटे 4 वाजता दिसलं, पण 4.05 वाजता घर ढासळलेल्या मातीच्या ढिगाऱ्यात आढळलं; विसापुरमध्ये निसर्गाचा प्रकोप, अंगावर काटा आणणारे 10 फोटो
Pune Landslide Rain: 'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
'माळीण'च्या भयावह आठवणी पुन्हा जाग्या झाल्या, मावळच्या विसापूर किल्ल्याचा तुकडा घरावर कोसळला, अख्ख कुटुंब एका क्षणात ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं
Kolhapur Rain Update: कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
कृष्णा आणि पंचगंगा, वारणा नदीच्या पाणीपातळीत वेगाने वाढ, गगनबावड्यात धुवाधार; नृसिंहवाडीत मंदिराच्या सभामंडपापर्यंत पाणी
Pune Rain Ashadhi Wari: पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
पुण्यात प्रचंड पाऊस, इंद्रायणीला पूर, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
Devendra Fadnavis On Maharashtra Rain: रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
रस्ते जलमय, नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली; मुंबई, पुण्यासह अनेक जिल्हे ठप्प; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं एकमेव कारण!
Mumbai Rain: मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
मुंबईत पर्यटन करू नका, ऐकलं नाही तर सक्ती करावी लागेल; मंत्री गिरीश महाजनांचा मुंबईकरांना कडक इशारा
Embed widget