एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या बड्या नेत्यांना पराभूत केल्याचं चित्र सध्या तयार झालंय : जितेंद्र आव्हाड

अजित पवारांचा शपथविधी टीव्हीवर पाहिला त्यावेळी आपलं राजकीय आयुष्य संपलं असं वाटलं होतं. तसेच भाजपचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकत नाही. जितेंद्र आव्हाड एबीपी माझाच्या 'ऐसपैस' या कार्यक्रमात बोलत होते.

मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहे. एकीकडे ही चर्चा सुरु असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाणूनबुजून भाजपच्या बड्या नेत्यांचा पराभव केला, असं चित्र सध्या तयार झालं आहे, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसेच हे चित्र सावरताना भाजपला त्रास होईल, असंही जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं. जितेंद्र आव्हाड एबीपी माझाच्या 'ऐसपैस गप्पा' या कार्यक्रमात बोलत होते.

भाजपची राज्यात सत्ता आल्यानंतर गेल्या पाच वर्षात भाजपचा पाया हलला आहे. विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागाला. यामागे देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचं चित्र सध्या तयार होत आहे. भविष्यात भाजपसाठी हे जड जाणारं आहे. भाजपमधील मोठे ओबीसी नेते आज एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, राम शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. पंकजा मुंडेंनी जर वेगळी भूमिका घेतली तर भाजपला मोठा धक्का बसू शकतो. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मोठ्या परिश्रमाने या सर्वांना एकत्र आणलं होत. हे सगळे नेते आज अस्वस्थ असल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.

अजित पवार पुन्हा तशी भूमिका घेणार नाहीत

राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यादरम्यान अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यावेळी कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका अॅक्शनला रिअॅक्शन होती. कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करायला मी सांगितलं नव्हतं. कार्यकर्ते चुकले, असं मी मानत नाही. शरद पवारांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची ती भावना होती. अजित पवारांचा शपथविधी टीव्हीवर पाहिला त्यावेळी आपलं राजकीय आयुष्य संपलं, असं वाटलं होतं. मात्र पवार साहेबांनी काही वेळातच आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवार आणि भाजप हे समीकरण कधीही जुळणार नाही, असंही जितेंद्र आव्हान यांनी सांगितलं. तसेच आताची परिस्थिती पाहता अजित पवार पुन्हा असा निर्णय घेतील, असं वाटत नाही, असंही आव्हाडांनी सांगितलं.

कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही

भाजपचा कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात यशस्वी होऊ शकत नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत फरक आहे. महाराष्ट्राचं राजकारण खरेदी-विक्री महासंघ होऊ शकत नाही. कर्नाटक, बिहार, आंध्रप्रदेश तामिळनाडूमध्ये असं अनेकदा घडलं आहे. एखाद्या माणसाला खरेदी करुन सरकार स्थापन करणे महाराष्ट्रात कधीही घडलेलं नाही आणि आताही तसं होणार नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक

व्हिडीओ

Ashish Shelar PC : भ्रष्ट आणि अकार्यक्षण ठाकरे बंधूंना धडा शिकवण्याची ही शेवटची निवडणूक
Devendra Fadnavis On Voting : माझ्या हातावरील मार्कर पुसून दाखवा, राज ठाकरेंना फडणवीसांचं उत्तर
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Ambadas Danve on BJP : भाजपला पैशांची मस्ती, उन्माद, संभाजीनगरात दानवेंच्या भावाचा संताप अनावर
Murlidhar Mohol : पुणेकरांचं पूर्ण समर्थन सोबत राहिल असा मुरलीधर मोहोळ यांना विश्वास

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
'शहा सेनेचे' लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, आम्ही मुंबई आणि मराठी रक्षणासाठी रस्त्यावर आहोत; सीएम फडणवीसांच्या ‘ठेचून काढू’वर राऊतांचा गर्भित इशारा
Election Commission Voter Ink: बोटावरील शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
शाई पुसली जातेय, राज ठाकरे संतापले; निवडणूक आयोग म्हणाले, पुन्हा मतदान करता येणार नाही, कारण...
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
अकोल्यात पडदाशीन यंत्रणेचा बोजवारा, बुरखाधारी महिलांना ओळख न पटवताच सोडलं; मतदान केंद्रावर गोंधळ
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
निवडणूक आयुक्त कसला पगार घेता? दादागिरी करणारे हे भाईलोग नऊ वर्ष काय करत होते? राज्यात निवडणूक याद्यांचा गोंधळ, शाई सुद्धा पुसली जाते; राजनंतर उद्धव ठाकरेंचा सुद्धा संतापाचा उद्रेक
Chhatrapati Sambhajinagar Voting 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अतुल सावेंच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मराठी माणसासाठी, महाराष्ट्राच्या मुंबईसाठी सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडा, बाहेर पडा मतदान करा, 10 वर्षांनी आलेली संधी चुकवू नका; हेमंत ढोमेची भावनिक साद
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
मुंबई जिंकणं मराठी माणसाची पहिली लढाई, अशा अनेक लढायांना तोंड द्यावं लागेल, राज-उद्धव ठाकरेंच्या वादळाने मराठी माणूस जागा झाला, अस्मितेसाठी मतदान करेल; संजय राऊतांचा 'मनसे' विश्वास
Devendra Fadnavis BMC Election Voting: फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं, तुच्छतेने म्हणाले, 'हे काय दहशत निर्माण करणार, यांच्यात क्षमता तरी उरलेय का?'
फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं, तुच्छतेने म्हणाले, 'हे काय दहशत निर्माण करणार, यांच्यात क्षमता तरी उरलेय का?'
Embed widget