एक्स्प्लोर

नाणार प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनस्थळी जाण्यापासून पत्रकारांना रोखलं!

आंदोलकांशी संवाध साधणाऱ्या पत्रकारांना पोलीस हुसकावून लावत आहेत. त्यामुळे सरकारच्या या दडपशाहीचा जोरदार निषेध केला जात आहे.

मुंबई : नाणार प्रकल्पग्रस्तांनी आपल्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थेट विधानभवनात धडक दिली. विधानसभेच्या गॅलरीत चार प्रकल्पग्रस्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी या 4 प्रकल्पग्रस्तांना रोखत त्यांना ताब्यात घेतलं.

या आंदोलनकर्त्यांमध्ये 2 महिला आणि 2 पुरूषांचा समावेश आहे. रत्नागिरीतल्या राजापूर तालुक्यात नाणार रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा सरकार तिथल्या जमीनी अधिग्रहण करत आहे, मात्र शेतकऱ्यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाविरोधात सुमारे दोन हजार आंदोलकांचं कालपासून (27 नोव्हेंबर) मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र आंदोलन मागे घेऊन परत जावी, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तसंच प्रसार माध्यमांनाही आंदोलनस्थळी जाण्यास बंदी घातली आहे. आंदोलकांशी संवाध साधणाऱ्या पत्रकारांना पोलीस हुसकावून लावत आहेत. त्यामुळे सरकारच्या या दडपशाहीचा जोरदार निषेध केला जात आहे.

नाणार प्रकल्प होऊ नये, तसंच या प्रकल्पासाठी भूसंपादनाबाबत जारी केलेला अध्यादेश रद्द करा अशी या आंदोलकांची मागणी आहे.  नाणारवासियांचं बुधवारी (27 नोव्हेंबर) सकाळी दहा वाजल्यापासून आझाद मैदानात धरणं आंदोलन सुरु आहे. उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी अध्यादेश रद्द करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी पत्र लिहूनही निर्णय का झाला नाही, असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.

नाणार प्रकल्प लादणार नाही : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री जोपर्यंत भेट देणार नाहीत तोपर्यंत धरण्यावरुन उठणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी केला आहे. तर दुसरीकडे रात्री दहा वाजेपर्यंत आंदोलन स्थगित न केल्यास आंदोलकांवर गुन्हे दाखल करावेत, असा आदेश सरकारने पोलिसांना दिल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

शिवाय एरव्ही नाणार प्रकल्पावरुन रान उठवणाऱ्या शिवसेनेचा एकही आमदार आंदोलकांची भेट घेण्यासाठी फिरकला नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

ग्राऊंड झीरो रिपोर्ट : नाणार प्रकल्प काय आहे?

नाणार प्रकल्प

‘रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) च्या वतीने ग्रीन फील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

या प्रकल्पाची निर्मिती आणि विकास करण्यासाठी सौदी अरामको कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्यकार्यकारी अधिकारी अमीन एच. नसीर  आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) चे राज्यमंत्री आणि एडनॉक समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुल्तान अहमद अल जबेर यांनी धर्मेंद्र प्रधान आणि युएईचे परराष्ट्र व्यवहार मंत्री शेख अब्दुल्ला बिन जायेद बिन सुल्तान अल नहयान यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर झाला.

काय आहे नाणार प्रकल्प?

खनिज तेलावरचा प्रक्रिया उद्योग नाणार परिसरात उभारला जाणार आहे

जगातली सगळ्यात मोठी रिफायनरी असेल, असा दावा सरकारतर्फे करण्यात येतोय

ही ग्रीन रिफायनरी असेल, असा दावाही सरकारतर्फे करण्यात आला आहे.

प्रति दिन 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर या प्रकल्पात प्रक्रिया होईल

या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2500 मेगावॅटचा औष्णिक विद्युत वीज प्रकल्प उभारण्यात येणार

रिफायनरीला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या ठिकाणी निःक्षारीकरण प्रकल्पाचीही उभारणी करण्यात येणार आहे.

नाणार प्रकल्पाला विरोध का?

रिफायनरी म्हणजे प्रदूषण हे साधं सरळ समीकरण जगभर आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचं धाबं दणाणलं आहे. या प्रकल्पामुळे काही हजार कलमांचे मालक असलेले अनेक शेतकरी एका दिवसात भूमीहीन होणार आहेत. शेतकऱ्याचा तोंडचा घास तोंडातच अडकला आहे.

या प्रकल्पग्रस्त भागात जवळपास 12 लाख आंब्याची झाडं आहेत. तितकीच काजू आणि नारळाची झाडंही आहेत. त्याशिवाय काही हजार एकर भागात भातशेती होते.  याशिवाय नाचणी, वरी, कुळीथ, भाजीपाला याचंही उत्पन्न इथला शेतकरी दरवर्षी घेतो. इथल्या समृद्ध जंगलात वावडिंग, हरडा, चारोळे यांसारख्या अनेक औषधी वनस्पती सापडतात, त्यावर इथल्या भटक्या आणि आदिवासी समाजाचा उदरनिर्वाह चालतो.

माधव गाडगीळ समितीने या परिसरातील अनेक गावं ही इको सेन्सेटिव्ह झोन म्हणून घोषित केली आहेत. हा प्रकल्प या गावात नसला तरी या प्रकल्पामुळे नैसर्गिदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशावर विपरित परिणाम होणार आहे. या रिफायनरीमुळे या गावांमधील पिण्याच्या पाण्यावरसुद्धा संकट उभं राहिलंय, अशी भीती गावकऱ्यांना वाटायला लागली आहे.

प्रस्तावित नाणार प्रकल्पाची वैशिष्ट्ये

जगातील सर्वात मोठा रिफायनरी कम पेट्रोकेमिकल प्रकल्प

जवळपास 2.90 लाख कोटी रुपयांची योजना

वर्षाला सहा कोटी टन उत्पादन करण्याची क्षमता

पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

दुसरी गुंतवणूकदार एडनॉक अबूधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी

भारतात एवढी मोठी गुंतवणूक कशामुळे? इतर तेल उत्पादक कंपन्यांप्रमाणेच एडनॉक आणि सौदी अरामकोलाही भारतात आपली पकड मजबूत करण्याची इच्छा आहे. भारत जगातील सर्वात मोठा तिसरा इंधनाची गरज असणारा देश असून एकूण गरजेपैकी 80 टक्के तेलाची आयात केली जाते. 2016-17 पर्यंत सौदी अरेबिया भारताचा सर्वात मोठा क्रूड ऑईल पुरवठादार देश होता, मात्र गेल्या वर्षी इराकने सौदीची जागा घेतली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
Mahapalikecha Mahasangram Bhandara : भंडारा नगर परिषदेत गुलाल कुणाचा? नागरिक काय म्हणाले?
Mahapalikecha Mahasangram Gondia : तरुणांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर, गोंदिया करांचा कौल कुणाला?
Supreme Court On Election : स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका अजूनही टांगणीलाच, कोर्टाची पुढील सुनावणी शुक्रवारी
Baramati Ganesh Market : कोटींची मंडई,भाजी विक्रेत्यांचे हाल; रोखठोक बारामतीकारांशी संवाद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
माजी आमदार निर्मला गावित यांना कारने उडवले, अपघाताची भीषण घटना; रुग्णालयात उपचार सुरू
Embed widget