एक्स्प्लोर

झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली बँकांचे तब्बल 40 हजार कोटींचे कर्ज विकासकांनी थकवलं

Mumbai Slum : विकासकांनी ज्या कारणासाठी हे कर्ज घेतलेलं होतं त्यासाठी पैशाचा उपयोग करण्यात आला नसून इतर ठिकाणी हे पैसे वापरले असल्याचं ही निदर्शनास आलं आहे. राज्य सरकार यावर कारवाई करणार आहे.

मुंबई : दाटीवाटीच्या मुंबई शहरात वसलेल्या झोपडपट्टीला मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन योजना आणली. मात्र या योजनेची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे अनेक कुटुंबांना बेघर होण्याची वेळ आली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्याचे मुख्य सचिव, म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

मुंबईत झोपडपट्टी पुनर्विकासाचे जे प्रकल्प रखडलेले आहेत, त्या विकासकांनी विविध बॅंकांकडूनजवळपास 40 हजार कोटी कर्ज घेतलेलं आहे. मात्र ज्या कारणासाठी हे कर्ज घेतलेलं होत त्याचा उपयोग या प्रकल्पासाठी करण्यात आला नसून इतर ठिकाणी हे पैसे वापरले असल्याचं ही निदर्शनास आलं असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. या सर्व विकासकांवर कारवाई केली जाणार आहे.

मुंबई शहर आणि आणि आजूबाजूच्या परिसरात तब्बल 300 हून अधिक प्रकल्प रखडलेले आहेत. या सगळ्या प्रकल्पाचा पुनर्विकास आता म्हाडा आणि एसआरएच्या माध्यमातून केला जाणार आहे. ज्या विकासकांनी हे प्रकल्प घेतलेले होते त्यांच्यावर कारवाई करून सरकार आता या प्रकल्पांचा पुनर्विकास करणार आहे. त्यासाठी लागणारा खर्च म्हाडा आणि एसआरए उभा करणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर विक्रीसाठी असलेला भाग विक्री करून त्यातून एसआरए आणि म्हाडा गुंतवलेले पैसे काढून घेतील. त्यामुळे सरकारवरही मोठा बोजा पडणार नाही आणि प्रकल्पही मार्गी लागतील असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

अनेक प्रकल्पांमधील रहिवाशांना अनेक वर्षापासून घरभाडे देण्यात आलेलं नाही. त्याचीही जबाबदारी राज्य सरकार उचलणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

विशेषत: मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडलेले आहेत. अनेक रहिवाशांना त्या ठिकाणावरुन स्थलांतरित करण्यात आल आहे. परंतु त्या रहिवाश्याना घरभाडे ही देण्यात आलं नाही. त्यामुळे अनेक कुटुंब बेघर झालेले आहेत. या सगळ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील काही दिवसांमध्ये हे सर्व प्रकल्प मार्गी लावणार असल्याच जितेंद्र आव्हाड यांनी म्हटल आहे. त्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या सर्व प्रकल्पांना अधिक गती मिळण्याची दाट शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget