एक्स्प्लोर
सणासुदीला मुंबईकर वेठीला, 29 ऑगस्टपासून रिक्षा-टॅक्सीचा बेमुदत संप

मुंबई : ऐन सणासुदीच्या काळात रिक्षा आणि टॅक्सीचालक मुंबईकरांना वेठीला धरण्याच्या तयारीत आहेत. ओला, उबर टॅक्सींवर नियंत्रण आणण्याचं आश्वासन राज्य सरकारने न पाळल्याने, जय भगवान टॅक्सी व रिक्षा महासंघाने संपाचा इशारा दिला आहे. खासगी टॅक्सी सेवा देणाऱ्या ओला-उबरवर कारवाई न झाल्यास 29 ऑगस्टपासून रिक्षा आणि टॅक्सीचा बेमुदत संप पुकारण्यात यईल, असं जय भगवान टॅक्सी-रिक्षा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी जाहीर केलं आहे. संपादरम्यान महासंघाचे 70 ते 80 हजार टॅक्सी आणि रिक्षा रस्त्यावर उतरणार नाहीत. जवळचं भाडं नाकारणं, अरेरावी, उर्मटपणा रिक्षा-टॅक्सीचालकांच्या वर्तनाने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना ओला आणि उबरकडून अल्प दरात चांगली सेवा मिळते. मात्र यामुळे टॅक्सी-रिक्षाचालकांचा व्यवसाय घटत असून ओला-उबरवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
भारत























