एक्स्प्लोर

CM Uddhav Thackeray : मुंबई मेट्रो कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणातील 10 ठळक मुद्दे

CM Uddhav Thackeray : मुंबई मेट्रो 7 आणि मुंबई मेट्रो 2 ए च्या लोकापर्ण कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजपवर टीकास्त्र सोडले. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील 10 मुद्दे

CM Uddhav Thackeray Speech points : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A'या मार्गाचे लोकापर्ण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,  पालक मंत्री अस्लम शेख, आमदार सुनील प्रभू, रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भाजपवर निशाणा साधताना राज्य सरकार लोकांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले. जाणून घेऊयात त्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे :

> आज चार कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यापैकी राष्ट्रवादीकडे असलेल्या खात्यांच्या कार्यक्रमात ऑफलाइन आणि शिवसेनेकडे असलेल्या खात्याच्या कार्यक्रमांना ऑफलाइन हजेरी लावली. पण आमच्या लाइन सरळ आहे, त्यात कोणतीही लाइन वाकडी नाही. 

> राजकारणात एक नवीन साथ आली आहे. या व्हायरसची लक्षणे दिसत नाही. या व्हायरसची लागण झाल्यानंतर आरोप सुरू होतात. एकतर इतरांनी केलं नाही, जे केलं ते आम्हीच केलं आणि इतरांनी नवीन केलं तर त्यात भ्रष्टाचार झाल्याची बोंब मारत असल्याचे दिसते. 

> राज्य सरकारची अडवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहे. आम्ही तुमच्यासारखी आडमुठी भूमिका घेत नाही. संघर्ष करण्याची वेळ आमच्यावर आणू नका. 

> पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याचे सरकारचे धोरण; याआधी मुंबईकरांनी रात्रीच्या वेळी झाडे कापली जात असल्याचे पाहिले आहे. 

> मुंबईकडून सर्वाधिक कर दिला जातो. मात्र, त्याबदल्यात मुंबईला काय मिळतं? 

> मुंबई मेट्रोसाठी कांजूरची ओसाड जमीन का दिली जात नाही, मुंबईच्या पम्पिंग स्टेशनसाठी जमिनीची मागणी करूनही ती जमीन दिली जात नाही. धारावीच्या विकासासाठी रेल्वेची जमीन दिली जात नाही.

> मुंबई वाढत आहे, बदलती मुंबई पाहिली आहे. नागरिकांना मुंबईत अनेक सुविधा दिल्या आहेत, काळानुसार शहर बदलत असताना आणखी किती सुविधा द्यायचा हा प्रश्न उभा राहतो.

> मुंबई-अहमदाबाद या बुलेट ट्रेनचा फायदा राज्याला किती होईल असा प्रश्न उपस्थित करत मुंबई-नागपूर अशी बुलेट ट्रेन झाली असती तर राज्याच्या विकासात हातभार लागला असता.

> मुंबई मेट्रोच्या कामाचे श्रेय सर्व मुंबईकरांना दिले पाहिजे. मुंबईकरांच्या सुरक्षितेसाठी, विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध. 

> महागाई, लोकांच्या प्रश्नावरील लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Virar Rain : वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
वसई-विरार नालासोपारा पाण्यात, रेल्वे ठप्प; जीव मुठीत धरून रेल्वे ट्रॅकवरून नागरिकांचा पायी प्रवास!
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत, राज्यात आत्तापर्यंत 9 जणांचा बळी, तर 4 जण जखमी
Raigad News : कोकणात जाताय? मग सावधान! पावसामुळे रायगडची नाकाबंदी, दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग 30 तासांपासून बंद
कोकणात जाताय? मग सावधान! पावसामुळे रायगडची नाकाबंदी, दरड कोसळल्याने मुंबई गोवा महामार्ग 30 तासांपासून बंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget